tag:blogger.com,1999:blog-90852869412589274222024-03-05T18:59:55.655+05:30अंतर्नाद..!maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.comBlogger35125tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-64349348038616926522024-01-09T23:59:00.012+05:302024-01-10T16:12:05.839+05:30आना भरी बरसातों में..<p>'अलबेला सजन आयो रे..’ हे उस्ताद राशिद खान यांचं पाहिलेलं अन् ऐकलेलं पहिलंवहिलं गाणं. तेव्हापासूून या माणसाने काळजात घर केलं ते कायमचं. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटासाठी विक्रम गोखले यांच्याकरिता त्यांनी आवाज दिलेला. तेव्हापासून आजतागायत अगणित वेळा हे गाणं ऐकलंय..<br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><img border="0" data-original-height="168" data-original-width="300" height="168" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEieG7HmovOTy8X0vRjELhJtF3lqQMnVo_ZbR9wFDgEKvfnKVuJX6rPGzOArYktQl_9IdLJh-hcniDQIbldj7i7Q4liZxJbjkjd1jq_zrAISgSZCEI_SATiwO9S7hUIm0ETOAF6VspGSmdqMKlDGDEBdN0vgBo6wCAS-0p_4sZc6SG5SMUGmThQE4_gBwHY/s1600/ustad%20rashid%20khan.jpg" width="300" /></div><p>या वर्षाची पहिली पहाट उजाडत असताना जमलेल्या मैफिलीतही अहिर भैरवी रागावर आधारित असलेलं हेच गाणं ऐकलं. अगदी परवा मध्यरात्री मित्रांसोबत लाँग ड्राईवला गेलो तेव्हा 'ट्रान्स म्युझिक' ऐकता ऐकता सर्वांकडून 'अलबेला सजन'ची फर्माईश आली, म्हणून पुन्हा एकदा ऐकलं.</p><p></p><blockquote><span style="color: #990000;"><b>हे गाणं जितक्या वेळा ऐकलं तितक्या वेळा अंंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. हा आवाज जवळचा वाटला.. उस्ताद राशिद खान आपले वाटले. त्यांच्या आवाजात नेमकं काय होतं शब्दात सांगता येणार नाही पण त्यांना पुन्हा पुन्हा ऐकत रहावंं वाटायचं.. ‘अलबेला सजन’ फक्त ऐकू येत नाही तर काळजात घुसतं. त्यांनी जे गायलंय ती अनुभूती शब्दात व्यक्त करणं अशक्यंय.</b></span></blockquote><p></p><p>पुढे चार-पाच वर्षांनी 'आओगे जब तुम ओ साजना.. अंगना फुल खिलेंगे..' म्हणत ‘जब वी मेट’ मध्ये तेे पुन्हा भेटले. या गाण्याने तर वेड लावलं. काही गाणीं तुम्हाला प्रेमात पाडतात. रिपीट मोडवर महिनोंमहिने ते एकच गाणं आपण ऐकत रहातो. तरीही बोर होत नाही. उलट पुन्हापुन्हा ऐकत असताना ते गाणं आपल्यात मुरत जातं. तसंच याही गाण्याचं होत गेलं. ही जादू देखील उस्ताद राशिद खान यांचीच. </p><p></p><blockquote><span style="color: #990000;"><b>‘नैैना तेरे कजरारे है, नैनोंपे हम दिल हारे है.. अंजाने ही तेरे नैैनो ने, वादे किए कई सारे है..’ या ओळी असो की ‘चंदा को ताकूँ रातों में, है ज़िन्दगी तेरे हाथों में.. पलकों पे झिलमिल तारें हैं, आना भरी बरसातों में..’. उस्ताद राशिद खान यांचा भारदस्त आवाज काळजाला हात घालतो. सिनेमात अभिनेत्रीच्या वाट्याला आलेली वेदना गाण्यात दिसते, तर उस्ताद यांच्या आवाजात ती थेट काळजात आरपार जाते..</b></span></blockquote><p></p><p>आश्चर्य म्हणजे ही गाणी आवडली तेव्हा फक्त गायकाचं नाव ऐकलेलं. त्यांना पाहण्याचा योग, निमित्त, कारणही कधी आलं नाही. पुढे यु-ट्युबवर त्यांना पाहिलं. अन् फारसं कळत नसूनही शास्त्रीय संगीत ऐकावसं वाटलं. उस्तादांच्या आवाजातलं ‘मेरे नैना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा..’ हे गाणंही ‘लता’ व ‘किशोरदां’इतकंच काळजाला घरं पाडतं. अगदी अलीकडे ‘मी वसंतराव’मध्ये त्यांनी ‘मारवा’ गायलं.</p><p></p><blockquote><span style="color: #990000;"><b>उस्ताद राशिद खान यांच्या बहुतांश मैैफिली ‘युट्युब, गाना डॉट कॉम, विंक म्युजिक’वर उपलब्ध आहेत. कित्येक रात्री त्यांनी मंत्रमुग्ध केल्यात.. पण हा मंत्रमुग्ध करणारा शास्त्रीय संगीतातील स्वर आज कायमचा हरपला. शास्त्रीय गायकीच्या विश्वात कायम तळपत राहणारा तारा निखळला. ‘पद्मभूषण’ उस्ताद राशिद खान वयाच्या ५५ व्या वर्षी हे जग सोडून गेले..</b></span></blockquote><p></p><p>आजारी असूनही त्यांच्या दिनचर्येत कोणताही बदल झालेला नव्हता. हॉस्पिटलमध्ये ते रियाज करायचे असं डॉक्टरांनी सांगितलंं. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीवर प्रेम करावं तर असं आणि इतकं, हेही जाता जाता शिकवून गेले. </p><p></p><blockquote><span style="color: #990000;"><b>शास्त्रीय संगीतातलंं त्यांचं योगदान मोठं असलं तरी ज्या गाण्यांमुळे उस्ताद आपले वाटले त्या इथे नमूद केलेल्या दोन-तीन गाण्यांच्या मैफिलीत ते अखेरपर्यंत असतील. तेे नसले तरी त्यांचा आवाज कायम कानात घुमत राहिल. उस्ताद राशिद खान यांना भावपूर्ण आदरांजली. 🙏</b></span></blockquote><p></p>maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-14376579540048283702021-06-25T20:41:00.028+05:302021-06-25T20:48:11.333+05:30 ..आणि आता 'डॉक्टर' सूर्यकांत मोहनराव वरकड.<p>आमचे मित्र, बंधु, प्रभातचे पत्रकार सूर्यकांत मोहनराव वरकड यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी विषयातील पीएच. डी. पदवी जाहीर केली आहे. अहमदनगर कॉलेजातील मराठी संशोधन केंद्रातून त्यांनी 'निवडक संतांच्या अंधश्रद्धा निर्मूलनविषयक अभंगांचा अभ्यास' या विषयावरील प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. </p><p><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgsdIEoIlDaBXhyNyEgdvZv6XFYoad3j2lLF62KdmIwkPJnyP9iV2dGZzRnrB5iwI6NHTSIs46gxYg5HB8kN_WJ6CEikJy2o6IhLc9X4haVUgLNeoPrvgWTfQxs6_kDSX9asQ2nO6tjUpU/s1600/1624634283592701-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgsdIEoIlDaBXhyNyEgdvZv6XFYoad3j2lLF62KdmIwkPJnyP9iV2dGZzRnrB5iwI6NHTSIs46gxYg5HB8kN_WJ6CEikJy2o6IhLc9X4haVUgLNeoPrvgWTfQxs6_kDSX9asQ2nO6tjUpU/s1600/1624634283592701-0.png" width="400">
</a>
</div><span style="letter-spacing: 0.2px;">खरं तर त्यांनी प्रबंधासाठी निवडलेला हा विषय.. त्यांची स्वतःची विचारधारा.. अन् त्यांचे आजपर्यंतचे आचरण हे एकच आहे. आणि हा काही योगायोग नाही. आपल्या आजूबाजूला संतांचे पाठ केलेले अभंग घोकून शहाणपण मिरवणारे अनेक जण आहेत. पण त्याप्रमाणे कृती आणि आचरण करणारे विरळच असतात. सूर्यकांत वरकड हे दुसऱ्या प्रकारातले आहेत. </span><br></p><p></p><blockquote><span style="color: #0c343d;"><b>खरं तर एकीकडे संसार सांभाळत, फिल्डवर पत्रकार म्हणून नोकरी करत ही पीएचडी प्राप्त करणे तशी साधी गोष्ट नाही. ती एक तपश्चर्याच म्हणावी लागेल. आणि ही डॉक्टरेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून असेल तर त्या व्यक्तीबद्दल आणखीनच आदर निर्माण होतो.</b></span> </blockquote><p></p><p>एरवी कोणी डॉक्टरेट मिळवली तर ४-५ ओळींच्या बातमी व पासपोर्ट फोटोशिवाय आम्हाला घेणं नसतं. पण सूर्यकांतभाऊच्या पीएचडीच्या तपश्चर्येला अनेक पदर आहेत. या माणसाला ज्यांनी ज्यांनी जवळून पाहिलंय त्यांनाच ही खरोखर मोठी 'अचिव्हमेंट' असल्याचे माहित आहे. </p><p></p><blockquote><span style="color: #0c343d;"><b>एकीकडे संसार, दुसरीकडे वर्तमानपत्रातील बातमीदारीची जबाबदारी (प्राणपणाने आणि मनापासून करणे), अन् तिसरीकडे वेळ येईल तेव्हा हे सगळं सांभाळत भोवती जपलेल्या गोतावळ्याच्या मदतीला धावून जाणे.. या चक्रातून अभ्यासाला वेळ काढत ही डॉक्टरेट मिळवणं, ही निश्चितच मोठी अभिमानाची गोष्ट आहे.</b></span></blockquote><p></p><p>सूर्यकांत वरकड. आम्हा सगळ्या मित्रांचा सुर्याभाऊ. हातोळण (ता. आष्टी, जि. बीड) येथून नगरमध्ये आलेला हा माणूस काय-काय नाही ते विचारा. तो सगळाच आहे. तो जिज्ञासू, चिकित्सक वृत्तीने बातम्या वेचणारा शोधपत्रकार आहेच. पण त्याहून अधिक एक ‘संवेदनशील' मनाचा माणूस आहे. </p><p></p><blockquote><span style="color: #0c343d;"><b>एकदा सहज रस्त्यात ओळख झाली तेव्हा 'भाऊ' म्हणून संबाेधणारा हा माणूस खरंच आजपर्यंत मोठ्या भावासारखा पाठीराखा म्हणून उभा आहे. पत्रकार म्हणून प्रतिस्पर्धी वर्तमानपत्रात काम करत असलो तरी या माणसाने कोणाशीही, कसलीही स्पर्धा कधीच केली नाही. प्रत्येकाच्या चांगल्या गुणांचे तोंडभरुन कौतुक करणारा हा दिलदार माणूस. </b></span></blockquote><p></p><p>साधंसुधं गाव सोडून शहरात आला तरी आपल्या गावात एसटी बससेवा सुरु व्हावी, गावाच्या विकासाची वाट सोपी व्हावी म्हणून आपल्या लेखणीतून सतत पाठपुरावा करणारा बातमीदार.. अन् ही सेवा सुरु झाल्यानंतर 'आपण फक्त आपले काम केले', हे सांगून श्रेय नाकारत नामानिराळा होणारा मोठ्या दिलाचा माणूस. </p><p></p><blockquote><span style="color: #0c343d;"><b>नसते ताण नको म्हणून आपण ओळखीचे फोन उचलायला, भेटायला टाळतो. अन् हा माणूस हातातलं काम साेडून गावातल्या दोस्तांना भेटायला, गावकऱ्याला गरज आहे म्हणून तेथे हजर होतो. गावातल्या कोणत्याही माणसाचं नगरमध्ये कोणत्याही शासकीय कार्यालयात काम अडले असेल, अन त्याचा फोन आला की हा माणूस जाणार म्हणजे जाणार. आणि ते काम मार्गी लावल्याशिवाय परतणारही नाही.</b></span> </blockquote><p></p><p>"भाऊ तुम्ही एक काम करा. राजकारणात जा, आरामात निवडून याल", असे टोमणे आम्ही मारायचो. काही वेळा या माणसाला ‘प्रॅक्टिकल’ व्हायचा सल्ला दिला. पण काही उपयोग झाला नाही. ‘आपण जर कोणाच्या कामी पडत असू, आपल्यामुळे एखाद्याचे रखडलेले काम मार्गी लावता येत असेल, तर काय हरकत आहे त्याच्यासाठी आटापिटा करायला’, असं म्हणत हा अवलिया नेटाने अहोरात्र पळत राहिलाय. काय बोलावं अजून?</p><p></p><blockquote><span style="color: #0c343d;"><b>पीएचडीचा अभ्यास करताहेत हे कळलं आणि त्यांच्या अभ्यासाचा विषय विचारला, तेव्हा आम्ही मित्र त्यांची चेष्टा करायचो. ‘वा रे पठ्ठ्या ! हा माणूसही सगळ्या जगाचा भार वाहणारा संतच आहे, अन याच्या अभ्यासाचा विषयही संतांच्याच कार्यावर आधारलेला.’ जसजसा हा माणूस उलगडत गेला, तसतसं कळत गेलं आपण आपल्या आयुष्यात संत नाही पाहिले, पण सूूर्यकांत वरकड पाहिलाय.</b></span> </blockquote><p></p><p>संतांच्या विचारसरणीवर खरोखर चालणारा, ती आनंदाने जगणारा. आभाळातला नाही, पण हा सूर्य मी जवळून पाहिलाय. समाजातील अनिष्ट प्रथांवर कडाडून तूटून पडणारा, तो फक्त वाचाळवीर नाही, तर सतत स्वत:च्या आचरणातून, लेखणीतून, कृतीतून काव्यातून, पोवाड्यातून खड्या आवाजात उभं अनिष्ट प्रथांविरुद्ध उभं राहणारा, त्याविरुद्ध बोलण्याचं, लिहिण्याचं धाडस करणारा.. प्रत्येकाचं आत्मभान जागृत करणारा व योग्य दिशा दर्शवणारा 'सूर्य' आहे.</p><p></p><blockquote><span style="color: #0c343d;"><b>एकदा मुलाच्या वाढदिवसाला या माणसाने गावात कविसंमेलन आयोजित केलं. तेव्हा थेट गावी जाऊन जे पाहिलं त्याने अक्षरश: भारावून गेलो. आताशा गावात तमाशा फड, ऑकेस्ट्रा आल्यावरच गर्दी गोळा होते. किर्तनालाही माणसं गोळा करावी लागतात. पण त्या दिवशीचा 'माऊली'चा वाढदिवस म्हणजे जणू काही हातोळणचा गावाचा सण होता. साध्या मातीच्या घरात राहणाऱ्या या माणसाची गावाशी जशी नाळ तुटलेली नाही, तसा गावकऱ्यांनाही या माणसाचा प्रचंड अभिमान आहे. </b></span></blockquote><p></p><p>समदं गाव त्या कवि संमेलनाला गोळा झालेलं. मोठ-मोठे कविवर्य आलेलेच, पण आपला उद्धव काळापहाड, सागर शिंदे, महेश महाराज यांनीही जान आणली. आणि उत्तरोत्तर ही काव्य-मैफिल रंगत गेली. 'आता खरोखर ही शेवटची कविता', म्हणून मैफिल संपल्याचं जाहीर झालं तरी लोकं उठायला तयार नव्हते. यानंतर भाऊंच्या घरातलं दाळ-बट्टीचं गावजेवण. आम्ही खरोखर तृप्त झालो. हे सगळ्यांच्या नशीबी नसतं. तुम्ही प्रचंड श्रीमंत आहात भाऊ. </p><p></p><blockquote><span style="color: #0c343d;"><b>गावकऱ्यांचे, मित्रांचे, स्नेहीजनांचे हेच प्रेम सूर्याभाऊंना मिळालेल्या 'प्रेस क्लब'चा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यातही दिसले. आपल्या सूर्यकांताचा पुरस्कार सोहळा याचि देही याचि डोळा पहायला समदे गावकरी पदरमोड करून टेम्पो, गाड्या करुन नगरला आले. आपल्यासाठी गावाहून आलेल्या या सगळ्यांना पाहून सूर्यकांतभाऊंचे डोळे पाणावले. अन आमचेही डोळे भरून आले.</b></span></blockquote><p></p><p>एकदा सायंकाळी काम उरकल्यावर ‘काय भाऊ आटोपलं का काम?’ या प्रश्नावर दाटून आलेला कंठ ऐकून पुढच्या मिनिटाला ऑफिसखाली हजर झालेला हा माणूस. त्या दिवशी हक्काने डोकं टेकवायला खांदा देत मन मोकळं करु देणारा, तितकंच हक्काने ठणकावून समजून सांगणारा मोठा भाऊ. असंख्य रुपं आहेत या सूर्यकांतची. </p><p></p><blockquote><span style="color: #0c343d;"><b>ज्या संतांच्या कार्यावर या माणसाने प्रबंध सादर केला, त्या संतांची शिकवण हा माणूस स्वत: सदोदित जोपासत आलाय. आणखी वेगळं काय सांगायचं. मी आठ दहा दिवस आजारपणामुळे रुग्णालयात होतो तेव्हाही ऑफिसची डेडलाईन न चुकवता तेथून घरी, घरुन जेवणाचा डबा घेऊन मला द्यायला दवाखान्यात, आणि पुन्हा ऑफिसात, अशी तिहेरी कसरत या माणसाने केली. नको नको म्हणत असताना..</b></span> </blockquote><p></p><p>बरं हे माझ्याच बाबतीत नाही, तर गावातला, ओळखीचा कोणीही नगरमध्ये दवाखान्यात दाखल आहे कळलं, तर त्याच्यासाठीही असाच आटापिटा करणारा हा माणूस. परवडत नसताना अनेकांना रुग्णालयात पैैशांअभावी उपचार थांबवू न देणारा हा माणूस. याचा साक्षीदार असताना भाऊ हे कोणालाही सांगू नका, म्हणणारा हा माणूस.</p><p></p><blockquote><span style="color: #0c343d;"><b>एक हाडाचा बातमीदार, शोधपत्रकार, संवेदनशील माणूस, साप्ताहिक सुटीला गावाकडे जाऊन काळ्या मातीत राबणारा कष्टकरी शेतकरी, मित्रांच्या मदतीला धावून जाणारा दोस्त, आदर्श मुलगा, पती, पिता, भाऊ, अशी असंख्य नाती मनापासून आणि उत्कृष्टपणे कशी जपायची हे लख्खपणे सांगणारा ‘सूर्य’ हा आहे.</b></span> </blockquote><p></p><p>आणि आता आमचे 'डॉक्टर' सूर्यकांत मोहनराव वरकड. खूप खूप अभिमान आहे भाऊ तुमचा. लिहित राहिलो तर ग्रंथ होईल इतक्या उंचीचा हा माणूस. त्याला शब्दात मांडण्याची माझी पात्रताही नाही. जे जे प्रसंग पाहिले, अनुभवले तेच आठवले तसे लिहेित गेलो. कुठलीही अपेक्षा न ठेवता इतरांसाठी धावणारा हा खरा भास्कर आहे. </p><p></p><blockquote><span style="color: #0c343d;"><b>अहमदनगर महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांनी सूर्यकांत भाऊंना मार्गदर्शन केले. आई-बापाचा आशिर्वाद, आमच्या वहिनींची भक्कम साथ, ऑफिसातल्या सहकाऱ्यांची सोबत, अन् सर्वांच्या सदिच्छेच्या बळावर ही पदवी मिळवू शकलो, असे भाऊ सांगतात. </b></span></blockquote><p></p><p>जेव्हा केंव्हा कोणी समोर रडगाणं गायला सुरुवात केली, तेव्हा या माणसाने एकच सांगितलंय. रडायचं नाई, लढायचं. हे फक्त सांगून नाही, तर लढून अन जिंकूनही दाखवलं. काल दुपारी ही शुभवार्ता समजली तेव्हा दीडेक मिनिटं फोनवर बोललो आपण. पण ते फक्त तेवढं कौतुक पुरेसं नाही. जवळच्या अनेकांना या तपश्चर्येची कल्पना असली तरी तुमचा इथपर्यंतचा प्रवास समोर यायलाच हवा. म्हणून हा पोस्टप्रपंच.</p><p></p><blockquote><span style="color: #0c343d;"><b>प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस, प्रा. डॉ. शिरीष लांडगे, डाॅ. संदीप सांगळे, डॉ. प्रकाश सूर्यवंशी, प्रा. डॉ. पोपट सिनारे, प्रा. डॉ. महेबूब सय्यद, दैनिक प्रभातचे निवासी संपादक विठ्ठल लांडगे, आणि मित्र परिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा मुसळधार वर्षाव सुरु आहे. आणि तो कायम होत राहावा, हीच सदिच्छा. खूप खूप मोठ्ठे व्हा भाऊ.</b></span></blockquote><p></p>maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-7017189221169313102019-02-26T08:59:00.062+05:302021-05-03T20:40:39.413+05:30जाने भी दो यारों.. <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;"><span style="color: #990000;"><span>सा</span>हेब, आपली न्यायव्यवस्था आदर्श आहे. कारण ती प्रत्येकाला म्हणणं मांडायची संधी देते. त्यामुळे एकवेळ हजार आरोपी मोकाट सुटले तरी चालतील, पण एखाद्या निरपराध्याला शिक्षा होता कामा नये", युक्तीवाद पूर्ण करुन विधिज्ञ खाली बसतात.. दोन्ही बाजूंच्या युक्तीवाद वाचून साक्षीपुरावे ग्राह्य धरुन, कोर्ट आरोपींना दोषी ठरवून शिक्षा ठोठावते. अन् </span><b><span style="color: red;">अवघे </span></b><span style="color: #990000;">आठ वर्षे चाललेला खटला अखेर संपतो. </span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #990000;"><br /></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #990000;">निकाल ऐकून सगळेच सुस्कारा सोडतात. चला आठ वर्षे चाललेला एक खटला अखेर एकदाचा निकाली निघाला. त्या खटल्याच्या निकालाची प्रेसनोट वाचून याला उगाचच वाटतंय, की चुकलंय का काहीतरी ?.. आणि कोणीतरी ?.. पण नेमकं कोण आणि कसं ??</span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #990000;"><br /></span></div>
<div style="text-align: justify;"><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgFpNWBe396aRgrLlfgXp5G2DjRwqZMbj7PxT8IkIRbmns5_EHbfw_8jBVZ4dfWekwQTxLt2i9f4GEtjtR_J1L96XJkPj9oTYvJu5kEjcI67dlF2aEzwK09zXCpJ2Wzmd48ET3vtSp96AE/s1600/jbdy.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="443" data-original-width="336" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgFpNWBe396aRgrLlfgXp5G2DjRwqZMbj7PxT8IkIRbmns5_EHbfw_8jBVZ4dfWekwQTxLt2i9f4GEtjtR_J1L96XJkPj9oTYvJu5kEjcI67dlF2aEzwK09zXCpJ2Wzmd48ET3vtSp96AE/s200/jbdy.jpg" width="151" /></a></div>
<br /></div>
<div style="text-align: justify;">
गौण खनिजाचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर वाळूचा ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न. घटनेनंतर <b>तब्बल </b>८ वर्षांनी या खटल्याचा निकाल. या आठ वर्षात सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासले जातात. याच काळात प्रशासकीय नोकरीचा ठराविक कार्यकाळ संपल्यामुळे न्यायाधीश आणि सरकारी वकील बदलत राहतात. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">आठ वर्षांनी २०-२५ हल्लेखोरांपैकी मुख्य वाळूतस्कर व तत्कालीन माजी सरपंच असलेल्या आरोपीसह आणखी एक, असे दोघेजण दोषी ठरतात, आणि या आरोपींना शिक्षा ठोठावली जाते. शिक्षा काय? तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून (फक्त) १० दिवसांची कैद व ५ हजार रुपयांचा दंड, तर तहसीलदार, नायब तहसीलदार व त्यांच्या पथकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून (फक्त) १० दिवसांची कैद व ५ हजार रुपयांचा दंड. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">चक्क तहसीलदार (सध्या जिल्हाधिकारी) फिर्यादी असलेल्या खटल्यात आरोपींना शिक्षा (?) होते. त्याच वर्षात (दोन-तीन महिने आधी) शेजारच्या जिल्ह्यात वाळूमाफिया एका उपजिल्हाधिकाऱ्याला जिवंत जाळून मारतो. यानंतरही अशा घटना घडत राहतात. शासकीय अधिकारी कर्मचारी निषेध करत राहतात.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #990000;"><b>फ्लॅशबॅक (आठ वर्षांपूर्वी) </b>- </span>जीव तोडून कष्ट करणाऱ्या एका टेलरचा आणि रोजंदारीवर शेतीच्या कामाला जाणाऱ्या आईचा मुलगा, घरातील प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत, मनापासून अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देतो, जिद्द व चिकाटीच्या बळावर सेल टॅक्स इंस्पेक्टर होतो. पुन्हा स्पर्धा परीक्षा देऊन ते तहसीलदार होतात. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">एक दिवस वाळुतस्करीची माहिती मिळाल्याने चार-पाच शासकीय कर्मचार्यांच्या पथकासह <b>डाकू </b>नावाच्या गावात कारवाई करायला जातात. पण तब्बल २० ते २५ जण त्यांच्यावर हल्ला करतात. तहसीलदाराच्याच अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांचा जीव घ्यायला उठतात. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">हा हल्ला झाल्याच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत स्थानिक पोलिस घटनास्थळी गेले नसल्याने तत्कालीन <b>'सिंघम' </b>पोलिसप्रमुख स्वतः टीम घेऊन जातात. काही आठवड्यांनी वाळूतस्कर व त्याचे साथीदार जेरबंद होतात. गुन्ह्याचा तपास होऊन न्यायालयात दोषारोपपत्र येते व पुढची प्रक्रिया सुरु होते..</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #990000;"><b>आठ वर्षांनंतर </b>-</span> आता ते तहसीलदार भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा देऊन आयएएस अधिकारी आहेत. उत्तरेकडील राज्यात असलेल्या एका छोट्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून आदर्शवत आणि उत्कृष्ट कारभार सांभाळताहेत. ते 'सिंघम' अधिकारी यशाची शिखरे गाठत खात्यातील उच्चपदे पादाक्रांत करत आहेत. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">आता १० दिवसांची शिक्षा भोगून तो वाळूतस्कर पुन्हा आपल्या कामधंद्याला लागेल. (विक्रूतपणे हसत आणि तुम्ही आमचं काय वाकडं केलं ? असं मनातल्या मनात म्हणत..) आता कदाचित त्याच्या ट्रॅक्टरची जागा डंपर आणि जेसीबीने घेतली असेल. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">आठ वर्षांपूर्वी त्याने अधिकाऱ्यांवर ट्रॅक्टर घातला, आता त्याच्या कमरेला गावठी कट्टा असेल.. पुढच्या वेळी तो नाही तर त्याची पंटर लोकं अधिकाऱ्याला मारतील. अन कदाचित ती पुराव्याअभावी निर्दोषही सुटतील.. (कारण आता सर्वाार्थाने वजनही वाढलं असेलच).</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #990000;"><b>बरं. मग ?? -</b> </span>आठ वर्षांपूर्वी तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्याची बातमी दैनिकाच्या पहिल्या पानावर कंपोज करणारा तो बातमीदार, आज सहकारी क्राईम रिपोर्टरने शंका उपस्थित केली म्हणून खटल्याच्या निकालाची प्रेसनोट वाचतो. अन् त्याला आठवायला लागतो आजवर खटल्यांचे वार्तांकन करताना त्याने अनेकदा ऐकलेला विधीज्ञांचा पठडीतला युक्तिवाद.. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">"साहेब, आपली न्यायव्यवस्था आदर्श आहे. कारण ती प्रत्येकाला म्हणणं मांडायची संधी देते. त्यामुळे एकवेळ हजार आरोपी मोकाट सुटले तरी चालतील, पण एखाद्या निरपराध्याला शिक्षा होता कामा नये".. अन् पलीकडच्या डेस्कवरुन आवाज येतो, "पान एक भरायचंय, दोन सिंगल दे रे.. !</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<b><span style="color: #990000;">खैर, जाने भी दो यारो..</span></b></div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-32342249520576964462018-05-09T21:18:00.069+05:302021-05-03T20:48:19.848+05:30आठवणीतली गाणी - मेरे नैना सावन भादो..<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;"><span>म</span>ध्यंतरी एका फेसबुक ग्रुपवर एका लेखिकेची शंकर जयकिशन आणि भैरवी रागावर आधारित गाण्यांची पोस्ट वाचण्यात आली. तसं सिनेमा आणि गाण्यांचे पडद्यामागचे किस्से भारीच असतात. कारण प्रत्येक सिनेमा आणि गाण्याच्या निर्मितीच्या वेळी काही गोष्टी घडलेल्या असतात. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh8uVwNX7Kr0MrjIbC_NjWCh6v5eb_EpZQIwWM1ppbkJlSByrMZwWSXsa7tNBBghWtaEh_Wd05Ycoqjs-TOi5PCbRyBkKmwyGae5OTL_SKmw3JnBEEv__0-rOFGlJIPICLHd-eCjVi5yBk/s1600/mehbooba.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="313" data-original-width="245" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh8uVwNX7Kr0MrjIbC_NjWCh6v5eb_EpZQIwWM1ppbkJlSByrMZwWSXsa7tNBBghWtaEh_Wd05Ycoqjs-TOi5PCbRyBkKmwyGae5OTL_SKmw3JnBEEv__0-rOFGlJIPICLHd-eCjVi5yBk/s200/mehbooba.jpg" width="155" /></a></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br /></div>त्यामुळे ती गाणी त्यातील कलाकार, गायक, संगीतकार, दिग्दर्शक किंवा निर्मिती प्रक्रियेतील इतर घटकांच्या कायमची लक्षात राहतात. असे किस्से एेकायला विशेष आवडतं मला.. कारण त्यातून अशी गाणी किंवा सिनेमे आपल्याही मनात घर करुन राहतात. ही गाणी आपोआप आठवणीतली गाणी बनून जातात...</div><div style="text-align: justify;"><br /></div>
<div style="text-align: justify;"><blockquote><span style="color: #0c343d;"><b>
सुप्रसिद्ध निवेदक व कलाकार अनु कपूर, अमीन सयानी यांसारखे निवेदक नामांकित, आघाडीच्या एफएम व काही म्युजिक चॅनल्सवर जेव्हा असे पडद्यामागचे किस्से सांगतात. शिवाय ते ज्या प्रकारे सांगतात, ते तर भारीच. मी वाचलेल्या फेसबुक पोस्टमध्ये शिवरंजनी रागाचा उल्लेख आलेला होता.</b></span> </blockquote></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">वैयक्तिक खरं सांगायचं तर शास्त्रीय संगीत हा माझ्या आकलनासाठी जड विषय. पण आपण नेहमी ऐकत आलेलो, आपल्याला आवडलेली अनेक गाणी ही कुठल्या रागांवर आधारित आहेत, किंवा होती, हे माझ्या कधीही गावी नव्हते. आज अशीच एक आठवण शेअर करतोय.. <br />
<br />
<span style="font-size: large;"></span><blockquote><span style="color: #0c343d;"><b><span style="font-size: large;">मा</span>झे सख्खे छोटे मामा मुंबईच्या शिरोडकर शिक्षण संस्थेतून काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. तिथे ते मराठी आणि इतिहास विषय शिकवायचे. पएा सिनेमा, गाणी, आणि संगीत म्हणजे त्यांचं जीव की प्राण. त्याविषयी त्यांचं अवांतर वाचन आणि ज्ञानही अफाट व सखोल आहे. </b></span></blockquote></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">ते स्वतः लतादीदी आणि महंमद रफिंचे निस्सीम चाहते आहेत. त्यांची कित्येक गाणी अजूनही त्यांच्या ओठांवर रुळलेली अाहेत. तर या सिताराम मामांच्या आणि माझ्या गाण्यांच्या चॉईसही बहुतांशी सेम सेम आहेत. असेच एकदा आम्ही सोबत असताना राजेश खन्ना आणि हेमा मालिनीचा 'मेहबुबा' हा सिनेमा टीव्हीवर सुरू होता. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><blockquote><span style="color: #0c343d;"><b>या सिनेमाचं कथानक जितकं गूढ आणि उत्कंठावर्धक आहे, तितकीच त्यातली गाणीही कर्णमधूर व अवीट आहेत. या सिनेमात 'मेरे नैना सावन भादो..' हे गाणं दोन वेळा पूर्ण आणि मध्ये मध्ये काही ओळींचं आहे. या गाण्याबद्दल मामांनी त्यावेळी सांगितलेली आठवण अशी... की हे गाणं शिवरंजनी रागावर आधारित आहे.</b></span> </blockquote></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">मी म्हणालो कसं काय? हे तर साधं सरळ साेपं गाणं आहे, यात राग कुठून आला? माझा भाबडा प्रश्न त्यांना साहजिक होता कारण मला शास्त्रीय संगीताचं कसलही ज्ञान नव्हतं. आणि अजूनही नाहीय. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे क्लासिकलच गाणं आहे. गंमत अशीय की ते गायलंय लता दीदी आणि किशोर कुमारने. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><blockquote><span style="color: #0c343d;"><b>किशोर कुमारने एकही क्लासिकल गाणं गायलेलं नव्हतं. किंबहुना त्यांना येतंच नव्हतं. दिग्दर्शक शक्ती समंथ यांना मात्र ते किशोरजी यांच्याच आवाजात हवं होतं. स्वतः किशोरजी यांनी तेवढं गाणं रफी साहेबांकडून गाऊन घ्या, अशी विनंती केली. पण दिग्दर्शक त्यांच्या निर्णयावर ठाम होते.</b></span></blockquote></div><div style="text-align: justify;">
<br />
हे गाणं सिनेमात दोनदा आहे. त्यामुळे शेवटी असा तोडगा निघाला की, आधी हे गाणं लता दिदींकडून गाऊन घ्यायचं. 'ते ऐकून ऐकून जसंच्या तसं मी म्हणेन' असे किशोरजी म्हणाले. त्याप्रमाणे दोन्ही गाणी कंपोज झाली. अन अशा प्रकारे किशोरजी यांनी त्यांचं पहिलंवहिलं क्लासिकल गाणं गायलं. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><blockquote><span style="color: #0c343d;"><b>माझ्या व्यक्तीगत माहितीनुसार बहुधा हे किशोरजींनी गायलेलं एकुलतं एक क्लासिकल गाणं असावं.. त्यांना स्वतःला विश्वास नव्हता की, हे गाणं रसिक स्वीकारतील की नाही.. पण हे गाणं प्रचंड हिट ठरलं. इतकंच नाही तर अनेकांनी त्याबद्दल किशोरजी यांचं विशेष कौतुक केलं.</b></span> </blockquote></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">कारण किशोरजी यांचं आजवरची गाणी कुठल्याच शास्त्रीय प्रकारात बसणारी नव्हती. तरीही ते हिट होते, त्यांची गाणी लोकांनी डोक्यावर घेतलेली होती. मामांनी त्यावेळी मला शिवरंजनी या रागावर आधारित आणखी काही गाणी उदाहरणादाखल सांगितली. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><blockquote><span style="color: #0c343d;"><b>'एक दुजे के लिये' मधलं 'तेरे मेरे बीच में, कैसा है ये बंधन' हे गाणंही याच रागावर आधारित आहे, असं ते म्हणाले. हे गाणंही सिनेमात दोनदा आहे. एकदा लतादिदी व एसपी बालसुब्रमण्यम या जोडीच्या आवाजात, तर एकदा एसपी बालसुब्रमण्यम यांच्या एकट्याच्या कातर, मनात काहूर उठवणाऱ्या आवाजात.</b></span></blockquote></div><div style="text-align: justify;">
<br />
मामांनी सांगितलेला हा किस्सा मला कायमचा लक्षात राहिला. त्यातली सत्यता किंवा संदर्भ मी पडताळून पाहिले नाही. तशी गरजही कधी वाटली नाही. पण एक मात्र खरंय की, मला स्वतःला देखील लता दिदींपेक्षाही किशोरजी यांच्या आवाजातलं 'मेरे नैना सावन भादो' अधिक आवडत आलंय. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><blockquote><span style="color: #0c343d;"><b>तितकंच 'तेरे मेरे बीच में' त्यांच्या आवाजातील ती आर्तता प्रचंड जीवघेणी आहे. गाणं संपेपर्यंत कोणीतरी काळीज चिरतंय असं वाटत राहतं. शास्त्रीय संगीत आणि कुठलं गाणं कुठल्या रागावर आधारित आहे, हे अजूनही कळत नाही मला. पण मोठ्या लांबलचक दमात एक ओळ असलेलं गाणं ऐकलं की शिवरंजनी राग आठवतो.</b></span> </blockquote></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhf96bLLKkflz3jhwxMHpzEOzHzDN7YfzSyvI7fv2eNw1TJ6K-AieyYyZZIvG7tIiyygYovK6p51SyNt4ZOQ-6t7iE3calHadTGyAhbczdqhm64q2AWJaSk1Qo6WO_XMhjwl0IbOc5tAO0/s1600/x720-eF6.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="720" data-original-width="1280" height="225" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhf96bLLKkflz3jhwxMHpzEOzHzDN7YfzSyvI7fv2eNw1TJ6K-AieyYyZZIvG7tIiyygYovK6p51SyNt4ZOQ-6t7iE3calHadTGyAhbczdqhm64q2AWJaSk1Qo6WO_XMhjwl0IbOc5tAO0/s400/x720-eF6.jpg" width="400" /></a></div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-16149592672759415652018-03-18T20:55:00.054+05:302021-05-03T20:54:56.666+05:30सफरनामा..<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;"><span>रो</span>ज सकाळी घरातून निघून हायवेवरुन ऑफिसला येतो आणि रात्री परत जातो. ३२ किलोमीटरचं अंतर. आधी मोटारसायकलवर, अन आता कारने. नऊ वर्षांमध्ये एवढाच फक्त बदल. प्रवास सुरु झाला की म्युझिक असतं सोबतीला. क्वचित कधी फोनवर बोलत येतो. रस्ता कधी संपतो कळत नाही. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg6DFZAfvfF_AWU7ffsZvkI1M8vN92GTHpOrNyCx4tqBQVjvc43spJ3nKzXrDGpESu23CH8IkI3KIj_Bpyp__dr3KMIU_o8-CnwgocIi0CcYF840hjWdvtWMiFlvQKoPeMpRqe4wZFx-4Y/s700/large.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="700" data-original-width="484" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg6DFZAfvfF_AWU7ffsZvkI1M8vN92GTHpOrNyCx4tqBQVjvc43spJ3nKzXrDGpESu23CH8IkI3KIj_Bpyp__dr3KMIU_o8-CnwgocIi0CcYF840hjWdvtWMiFlvQKoPeMpRqe4wZFx-4Y/s320/large.jpg" /></a></div><div style="text-align: justify;">रोजचा रस्ता तोच असतो. मीही तोच असतो. समोरुन येणारी किंवा मला ओलांडून पुढे निघून जाणारी वाहनंही तीच, म्हणजे तशीच असतात. येतात. जातात. समोरची काच म्हणजे जग दिसणारी फ्रेम. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
या फ्रेममध्ये रोज त्याच-त्याच किंवा कधीतरी नवनव्या गोष्टी नजरेस पडतात. म्हणजे रस्त्यावरचे खड्डे. बाजूची शेती. घरं. हॉटेलं. एखाद्या गावाचं बसस्टँड. त्यावरचं अतिक्रमण आणि वाहनांची गर्दी. एक टोलनाका. तेथील माणसं. ऊन. वारा. पाऊस. अंधार. स्पीड ब्रेकर्स. वगैरे वगैरे.<br />
<br />
धड गावही नाही अन दाट वस्तीही नाही, असा एक नाका. म्हणजे एका गावाकडे जाणारा फाटा. त्या फाट्यावर असलेल्या काही टपऱ्या. हॉटेलं नाहीत टपऱ्याच. कारण तेथे असलेली गिऱ्हाईकं म्हणजे अत्यंत गरीबीतली, कष्ट उपसणारी, रस्त्याकडेच्या स्टोन क्रशरवर, बांधकाम साईट्सवर कामगार म्हणून, भंगाराच्या दुकानात, पेट्रोल पंपावर साफसफाईच्या कामाला असलेली ही माणसं. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">त्या टपऱ्यांवरचा चहा, क्रीमरोल, वडा, पाव,मिसळ खाऊन तृप्तीचा ढेकर देणारा हा वर्ग. हे रोजचंच चित्र. त्यातलीच एक टपरी. तिथली जाडजूड खाष्ट बाई. एक गोरीपान शाळकरी मुलगी. हे नऊ वर्षांपूर्वीचं चित्र.</div><div style="text-align: justify;">
<br />
येस्स. ही मुलगीच कारण होतं दररोज नित्याने आणि नकळत तिकडे नजर जाण्याचं. खरं तर आठ वर्षांत कधी तिथे (मुद्दामून) थांबलोही नाही. अन् मुद्दामूनच आपल्याकडे लक्ष जावं म्हणून हॉर्न वाजवणं किंवा सावकाश नजर टाकत जाणंही नाही. तरीही ही टपरी आली की आपोआप उजवीकडे पाहून एकदा लक्ष जातंच. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">ती बाई अन ती मुलगी. बहुधा या दोघीच त्या टपरीच्या मालकीणी. ती मुलगीच कारण होतं तिकडे पाहण्याचं. तीच मुलगी व तिचं सौंदर्यच खरं कारण होतं त्या हाटेलात बाजूच्या दोन-चार टपरीवजा हाटेलांपेक्षा अधिक गिऱ्हाईकं यायचं. आणि विनाकारण रेंगाळायचं. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">नाहीतर होतं तरी काय त्या टपरीवजा हाटेलात? कळकट, मळकट, दमलेले काळवंडलेले चेहरे दररोज लक्ष वेधून थोडी घेतात कोणाचं? ८ वर्षांत त्या दोघींसोबत कसलाही संवाद नसला, तिथं कधीच थांबणं नसलं तरी या हॉटेलासोबत आणि तेथल्या त्या कमालीच्या सौंदर्यवान मुलीबद्दल एक अनामिक औत्सुक्य निर्माण झालं. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">अशा रस्त्याकडेच्या कचऱ्यासारख्या जागेत असलेली ती टपरी. दोन बाकं आणि एक दोन खुर्च्या. टपरीतल्या दोरीला लटकावलेल्या गुटख्याच्या पुड्यांच्या माळा. बरण्यांमध्ये ठेवलेली गोळ्या, बिस्किटं. घरापातून ३२ किलोमीटर अंतर कापताना कितीतरी हॉटेलं आहेत. दुकानं आहेत. घरं आहेत. माणसं आहेत. जी तिथंच आहेत. असतात. त्यातलीच ही एक टपरी. यातलं कधी कुणी नसलं तर आपोआप चुकचुकल्या सारखं वाटतं.<br />
<br />
चारेक वर्षांपूर्वी त्या परिसरातल्या एका टपरीचालक महिलेचा खून झाल्याची ब्रेकिंग न्यूज कानावर आली. माझी शंका खरी निघाली. ती जाडजूड, चेहऱ्यावरुन खाष्ट वाटणारी महिला एका दारुड्याने कायमची वर पोचवली. रिपोर्टिंग करताना खुपदा क्राईम स्पॉटवर जावंच लागतं. पण यावेळी नाही गेलो. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">तपासी अधिकारी मित्रच होते. त्यांनीच माहिती दिली. महिलेला दोन मुली व एक मुलगा होता. मोठी मुलगी विवाहित तर मुलगा व्यसनी आणि कधीही घरी न येणारा. त्यामुळे टपरीवर दिसणारी ती गोरीपान मुलगी अन ती महिला दोघीचंच घर. त्याच परिसरात असलेल्या एका कामगारासोबत महिलेचे अनैतिक संबंध होते. त्या कामगारानेच दारुच्या नशेत महिलेला यमसदनी धाडले.<br />
<br />
तेव्हापासून ते टपरीवजा हाटेल बंद झालं. मध्ये तीन चार वर्षे निघून गेली. ती मुलगी कुठे गेली असेल, तिचं काय झालं असेल, हे प्रश्न त्या हाटेलाकडं नजर गेली की मनात यायचे. काही सेकंदापुरते. अशाच कितीतरी सेकंदांनी एकत्रित मिळून त्या टपरीवजा हाटेलानं, त्या मेलेल्या महिलेनं अन त्या गोऱ्यापान मुलीनं मनात अनामिक औत्सुक्य निर्माण केलं होतं. पण बंद पडलेल्या त्या टपरीवजा हाटेलानं या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला होता.<br />
<br />
आता ती मुलगी कशाला इथं येईल? आली तरी ती कशाला एकटी हाटेल चालवेल? बरं चालवलं तरी ज्या घरात तिच्या आईचं शीर धडावेगळं झालं त्या घरात ती एकटी कशी राहिल? या शंकाही अशाच सेकंदापुरत्या मनात यायच्या. ही मुलगी इथं, या घरात, या बाईच्या पोटी का जन्माला आली असेल? </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">ती एखाद्या चांगल्या घरात असती तर आज कुठं असती? सौंदर्याच्या बळावर नक्कीच तिला चांगला जोडीदार, घर, वैभव मिळालं असतं. असो. आपल्याला काय करायचंय?? चार पाच सेकंदासाठी डोक्यात आलेले हे विचार थोडं पुढे आलं की गायब व्हायचे.<br />
<br />
गेल्या आठवड्यात मात्र एक वेगळंच चित्र दिसलं. रस्त्याने ऑफिसला येत असताना कारच्या समोरच्या काचेतून दुरुनच त्या टपरीवजा हाटेलात काही माणसं दिसली. मी कारचा वेग जरा मंदावला. जवळ आल्यावर पाहतो तर ते हाटेल सुरू झालेलं. तिथं तीच गोरीपान मुलगी. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">पण आता निर्विकारपणे गिऱ्हाईकांना चहाचे कप देत होती. एकटीच. हो. ते हाटेल सुरू झालंय. तेच हाटेल. जिथं ती गोरीपान मुलगी तिच्या तोऱ्यात आईसोबत काम करायची. एक वर्तुळ पूर्ण झालं. ती मुलगी आता युवती झालीय. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">मध्यंतरी या मुलीचं काय झालं असेल? तिला पुन्हा इथंच का यावं लागलं? इतर सगळे रस्ते बंद झाल्यानंतर तिला इथंच यावं लागलं ना? शेवटी हे टपरीवजा हाटेलच तिचा आधार ठरलं का? नियतीनं तिला पुन्हा तिथंच आणून आपलं वर्तुळ पूर्ण केलं का ?....</div><div style="text-align: justify;">
<br />
त्या टपरीवजा हाटेलानं, आणि त्या मुलीनं गेल्या नऊ वर्षांमध्ये मनात असे असंख्य प्रश्न निर्माण केले. त्यांची उत्तरं शोधण्यासाठी कधीही तिथं थांबलो नाही. किंबहुना थांबावसं वाटलंच नाही कधी. आणि का थांबावं? या प्रश्नांची उत्तरं शोधून काय करणारे मी? </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">अशी कितीतरी माणसं, लोकं रोज दिसतात. त्यांना थोडीच मी रोज भेटतो. घरातून निघून पाऊण तासात ऑफिसात जायचं असतं. वेळ कुणाला आहे ? त्या टपरीवजा हाटेलाकडं पाहून जसं प्रश्नांचं मोहोळ उठतं तसंच हसायलाही येतं स्वतःचं. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं साक्षीदार व्हावं म्हणून पत्रकारिता हे क्षेत्र निवडलं. पण मग ही काय स्टोरी आहे? हा काय भविष्यातला इतिहास आहे? त्या टपरीवजा हाटेलात अन तिथल्या माणसांमध्ये कसलं आलंय औत्सुक्य? जाऊ देत.. आपल्याला वेळेत सकाळच्या मिटिंगला पोचायचंय..</div><div style="text-align: justify;">
<br />
<span style="color: #cc0000;"><b><span style="color: #990000;">तुमचंही होतं का असं कधी ?</span></b></span><br /></div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-36000520165151398552018-02-13T15:43:00.050+05:302021-05-03T21:04:25.292+05:30पुत्र व्हावा 'राजु' जैसा..!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
<span style="color: #990000;"><span>गे</span>ल्या आठवड्यात 'दिव्य मराठी'त प्रसिद्ध झालेल्या या स्टोरीला चार वर्षे पूर्ण झाली. फेसबुक मेमरीजमध्ये ती दिसल्याने एका मित्राने व्हॉट्स अॅप ग्रुप्सवर शेअर केली. त्यामुळे सकाळपासून फोन यायला लागले. स्टोरी छान केलीयेस रे, पण आजच्या अंकात कुठे दिसत नाहीय. एकेकाला स्पष्टीकरण देत बसण्यापेक्षा हे सगळं लिहून काढायचा खटाटोप केला.</span>.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ही चार वर्षांपूर्वीची (जानेवारी २०१४) गोष्ट आहे. त्याच्या दोन वर्षे आधी (ऑगस्ट २०१०) मी 'लोकमत'मध्ये होतो. आणि त्याच्या कित्येक वर्षे आधीपासून, लहानपणापासून पेपरात फोटो ओळींमध्ये <b>छाया : राजू शेख</b> हे नाव वाचायचो. तेव्हापासून या व्यक्तीबद्दल प्रचंड कुतुहल व आदर होता. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">'लोकमत'मध्ये काम करताना त्यांच्यासह साजिद-वाजीदही ओळखीचे झाले. प्रेस फोटोग्राफीमध्ये या बाप-लेकांनी जी ओळख निर्माण केली, ती अद्वितीयच आहे. पण दिलात माणुसकी जीवंत असलेला माणूस म्हणूनही यांचा वेळोवेळी प्रत्यय आला. ईद-निमित्त शिरकुर्मा घ्यायला घरी जायचो. त्यामुळे संपुर्ण फॅमिली ओळखीची झाली. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">पण २०१२ मध्ये मी दिव्य मराठीत आलो. अन भेटीगाठी कमी झाल्या. तरीही ऋणानुबंध मात्र आधीइतकेच घट्ट होते. पण कामाच्या व्यापात अडकल्याने कुठेतरी फिल्डवर साजिद-वाजीद भेटायचे. आत्ता एक-दोन आठवड्यांपूर्वी साजिदचा वाढदिवस झाला. तसाच चार वर्षांपूर्वी होऊन गेलेला होता. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">त्या वाढदिवशी त्याला फोनवर शुभेच्छा दिल्या. आपण इतरांना सहज म्हणतो तसं त्यालाही 'पार्टी कब देगा' म्हणालो. तो हो-हो म्हणाला. अन फोनवरचा विषय तिथंच संपला. एक दोन दिवसांनी एका कार्यक्रमाची फोटो व बातमी द्यायला तो कार्यालयात आला. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">तेव्हा वाढदिवसाची पार्टी नाही दिली, म्हणून मी त्याला पुन्हा सहज छेडले. तेव्हा त्याने सांगितलं 'दादी की मौत हुई इसलिये हमने इस साल जनमदिन नहीं मनाया।" मीही सहजच बोलून गेलेलो असल्याने तो विषय तिथंच सोडला. <br />
<br />
पण एक दोन दिवसांनी एका कार्यक्रमाच्या रिपोर्टिंगला गेलो तेव्हा अब्बा (राजु शेख सर) भेटले. मी लोकमत सोडलं, तेव्हापासून तेही फिल्डवर कमीच दिसायचे. त्यामागे त्यांच्या नाजूक तब्येतीचं कारणही होतं. कारण अब्बांना त्यावेळी मोठ्या आजाराला सामोरं जावं लागलं होतं. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">मग सर्वांनीच त्यांना सक्तीची विश्रांती घ्यायला लावली. अन धावपळ कमी करायला लावली. पण नेमके त्या कार्यक्रमाचे फोटो काढायला ते आले, अन आमची भेट झाली. त्यांच्या डोक्यावर हिवाळ्यात घालतात ती लोकरीची विणलेली टोपी होती. बऱ्याच महिन्यांनी भेटल्याने आम्ही बाजुला जाऊन एकमेकांची विचारपूस केली. <br />
<br />
अब्बांनी टोपी काढली तेव्हा त्यांनी पूर्णपणे टक्कल केल्याचं दिसलं. मला वाटलं आजारपणामुळे केलं असेल. पण बोलण्याच्या ओघात त्यांनी 'आईचं निधन' झाल्याचं सांगितलं. मला कळेना. प्रेस फोटोग्राफरच्या आईचं निधन झालं तर ही बातमी पेपरला कशी नाही आली? अन अब्बा मुस्लिम असुनही त्यांनी टक्कल का केलं? </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">विचारलं तर त्यांनी 'आई हिंदु होती' असं सांगितलं. अजुन चौकशी केली तर अब्बांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांचं बालपण सांगितलं.. बालपणीच सख्खी आई अल्लाला प्यारी झाली. आशा टॉकीज परिसरात बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासोमर भाड्याच्या पत्र्यांच्या खोलीत ते राहायचे. शेजारी राहणाऱ्या, मुलबाळ नसलेल्या सुलोचना आजींनी त्यांना पोटच्या लेकरासारखा जीव लावला. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">त्या माऊलीने अब्बांना आईची उणीव केंव्हाही भासू दिली नाही. स्वतः धुणीभांडी करुन उदरनिर्वाह करायची. पण मला जेवू-खाऊ घालायला कधीही कसर केली नाही. मानलेला असलो तरी सख्ख्या लेकरासारखी माया केली. आजारी असलो की तिच्या डोळ्याला डोळा नसायचा. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">कदाचित सख्ख्या अम्मीनेही गरिबीमुळे जीव लावून वाढवलं नसतं, इतकं सुलोचना आईने सांभाळलं.. हे सांगताना अब्बा ढसाढसा रडायला लागले. मी त्यांना सावरत दुःखाला आवर घाला म्हणालो. वेगळा विषय काढून त्यांना सावरलं. कार्यक्रम संपल्यावर ऑफिसला आलो, पण अब्बांचा चेहरा डोळ्यासमोरुन जाईना. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">साजिदला फोन लावला अन बोलावून घेतलं. त्याला विचारपूस केली. तर त्यानेही दादीच्या आठवणी सांगितल्या. अन मग दादी देवाघरी गेल्यानंतर तिच्या मागे कोणीच नसल्याने अब्बांनी अन आणखी ओळखीच्या लोकांनी तिचा अंत्यविधी आणि दशक्रिया विधी कसा केला ते सांगितलं. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">मी अब्बाच्या घरी गेलो. तेथे पुन्हा <b>अब्बा, अम्मी, साजिद, वाजीद, हीनाभाभी (वाजिदची बायको) अन शाहरुख </b>यांनी दादीच्या आठवणी सांगितल्या. सुलोचना आजी अखेरपर्यंत त्याच पत्र्याच्या खोलीत राहिल्या, अन तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण अब्बा वारुळाचा मारुती परिसरात राहायला गेले. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">फोटोग्राफी आवडायची म्हणून संधी मिळेल तिथे त्यांनी हौस भागवून घेतली. त्यांची ही हौस पाहून आमदार अरुणकाका जगताप यांनी अब्बांना स्वतःचा एक कॅमेरा भेट दिला. बस्स. अब्बांची फोटोग्राफी सुरु झाली, अन त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पोरांनीही तीच आवड जोपासली अन तेच करिअर निवडलं. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">पोटचा गोळा नसला तरी आत्म्याचं अन जिव्हाळ्याचं नातं असलेल्या राजुचा अन त्याच्या कुटुंबाचा हा प्रवास सुलोचना आजींना समाधानाचा ढेकर द्यायचा. आजीने राजुचा संसार भरल्या डोळ्यांनी पाहिला. राजुच्या घरी आली सगळ्यांकड पाहून आजी तृप्त व्हायची.<br />
<br />
साजिद, वाजीद पोरं घरातून बाहेर पडतानाच दादीचा डबा घेऊन निघायचे. आधी दादीचा डबा द्यायचा, अन मग बातमीदारीला निघायचं. पोरांनी या दिनक्रमात कधीही आळस केला नाही, अन खंडही पडला नाही. आईने लेकराला जीव लावला, तर त्या माऊलीला फार फार तर लेक जीव लावतो. (हल्लीचं चित्र विदारक आहे).</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">पण इथं अब्बाच नाही, सकिना अम्मीनेही तितकाच जीव लावला. सख्खी सासू नव्हती, त्यामुळं सासूरवासाचा प्रश्नच नाही. पण सुलोचनाआई घरी आली की माझी अम्मी घरात असल्यासारखं वाटायचं, असं त्या म्हणाल्या. मला कौतुक यापुढं अधिक वाटलं. ते हिनाभाभीचं. सासू सुनेला, अन सून सासुला पाण्यात पाहणाऱ्या जगात या नातसुनेनेही दादीला किती जीव लावला. <br />
<br />
दादीला आवडेल ते जेवण बनवून द्यायचं. न कुरबुर करता.. या दोघींचं वेगळंच मैत्रीचं जग होतं.. मध्यंतरी चोरी झाली तेव्हा दादी या सगळ्यांना तुम्ही पुन्हा गावात राहायला चला म्हणाली. खरं तर यावेळी दादीने असं म्हणणं ही बाब सगळ्यांनी हसण्यावारी नेत खिल्ली उडवली असती. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">पण दादीचा लेकराच्या संसारात किती जीव अडकलाय हे पाहून सर्वांचे डोळे पाणावले.. अब्बा अन घरातला एकेक जण दादीची एकेक गोष्ट, एकेक आठवण सांगत होते.. अन डोळे पुसत होते. मी माझ्या अश्रुधारा मनसोक्त वाहू दिल्या. अल्बममधले आजीचे फोटो पाहताना मला माझी आज्जी आठवत होती..<br />
<br />
ऑफिसात आलो. मिटिंगच्या वेळी <b>ब्युरो चिफ मिलिंद बेंडाळे</b> सरांना ही कहानी ऐकवली. खरं तर ही स्टोरी प्रसिद्ध करण्याचा आग्रह त्यांनीच केला. प्रतिस्पर्धी वर्तमानपत्राचे फोटोग्राफर असल्याने आपण त्यांची स्टोरी कशी करावी, असा प्रश्न मी उपस्थित केला होता. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">पण माणुसकीचं जिवंत उदाहरण जगलेल्या कुटुंबाला जगासमोर आणणं हे आपलं कर्तव्य आहे. अन आपण ते आणूयात, असं ते म्हणाले. तसं झालं नसतं तर अब्बा आणि त्यांच्या कुटुंबाने जपलेलं माणुसकीचं जिवंत उदाहरण त्यांच्यापुरतं, अन 'ऑफ द रेकॉर्ड'च राहिलं असतं. जगासमोर आलंच नसतं.<br />
<br />
मी पुन्हा अब्बांकडे गेलो. आजीचा आणि शेख कुटुंबाचा फोटो मागायला. अब्बांनी प्रसिद्धीच्या झोतात यायचं नाही असं सांगितलं. मी हट्टाने आजीचा फोटो मिळवला. ते अखेरच्या क्षणापर्यंत नको-नको म्हणत होते, पण माझ्या हट्टापुढे हतबल झाले. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">नंतर अमरधामातील पुरोहितांना भेटलो तेव्हा त्यांनीही अब्बा आणि इतर लोकांचं कर्तव्य अधोरेखित केलं. प्रवरासंगमच्या ब्राम्हणाशी मोबाईलवर बोललो, तेव्हा त्यानेही लगेचच ओळखलं. इतकंच नाही तर अब्बांनी पिंडदान केलं तेव्हा त्या पिंडाला काकस्पर्श किती लौकर झाला, हल्लीच्या मुलांपेक्षा राजू कसा, अन किती कृतज्ञ आहे, हे त्याने जसंच्या तसं नमूद केलं.<br />
<br />
रविवारच्या अंकात ही स्टोरी आली, अन सकाळपासून अब्बांना फोन सुरु झाले. माणसं फोनवर अब्बाचं कौतुक करायची. ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी फोन केला. 'राजु' म्हणाले, अन ढसाढसा रडायला लागले. अब्बांनीही अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. पंधरा एक मिनिटं दोघंही फोनवर फक्त रडत होती. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">दुपारी अब्बांचा फोन आला. "आयुष्यात कधी नाही तितकं रडवलंस म्हणाले. आजवरच्या कारकिर्दीत नाही आले तेवढे फोन आज सकाळपासून घरात खणखणताहेत" म्हणाले. "खुप मोठं केलं मला.." म्हणून पुन्हा रडायला लागले. इकडं मी निःब्द होतो. <br />
<br />
"पोटच्या लेकरासारखं मला तिने जीव लावला. माझ्यावर जीव ओवाळून टाकताना तिचा धर्म कधीही तिच्या आड आला नाही. मग तिची उत्तरक्रिया करताना माझा धर्म तरी मला कसा आड येईल?" हा सवाल तुम्ही विचारला होतात अब्बा. त्याचं उत्तरही तुम्हीच दिल होतं. तुमचं कर्तव्य पार पाडताना, "रक्ताचं नसलं, तरी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, अन हृदयात खोलवर रुजलेलं प्रेमाचं, मायेचं रोपटं जगवायला कसली आली जात अन धर्म ?" </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">आज जात-पात, धर्म, भाषा, प्रांत, उच्च, नीच, राष्ट्रवाद, पोकळ अस्मितांच्या, कट्टरतेच्या दगडांच्या भिंती अधिकच कट्टर होताना पाहतोय. क्षुल्लक कारणांमुळे दोन गटात, समुहात टोकाची तेढ निर्माण होते. पण तुमच्यात वाहणारा माणुसकीचा खळाळता झरा प्रचंड आशादायी आहे.<br />
<br />
नगरच्या फोटोग्राफी क्षेत्रात तुमच्यासारखे आणखीही जिंदादिल माणसं आहात. आणि खरं तर आमच्यापेक्षा लोकांमध्ये तुम्ही जास्त असल्याने बरेचदा तुमच्यामुळच आमच्यापर्यंत संवेदनशील बातम्या पोचतात. पण तुमच्यासारख्या संवेदनशील फोटोग्राफर किंवा पत्रकारांची बातमी कधी प्रसिध्द होत नाही. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">कारण इथं <b>ब्रँड</b> आडवा येतो. अगदी अलीकडलंच उदाहरण ताजं आहे. आपल्या प्रेस क्लबच्या अध्यक्षांनी रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या महिलेला रुग्णालयात नेलं. पण दुर्दैवाने तिचे प्राण वाचू शकले नाही. अध्यक्षांनी दाखवलेलं प्रसंगावधान सोडाच, पण त्या महिलेच्या मृत्यूच्या सिंगल बातमीलाही (अपवाद वगळता) कुठे जागा मिळाली नाही. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">अन मी या तीनशे शब्दांच्या बातमीत तुमचं मोठेपण कसं जगासमोर मांडू अब्बा..? तुम्ही, तुमचं कुटुंब आकाशाएवढं आहे..! देव तुम्हा सगळ्यांना उदंड आयुष्य देवो. अगदी माझंही. 🙏</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhjGvudjlZaNjTvRiwsA8tsOB-Z5aJKCAX1VUdNhQ3ZgMWV0F7BnwpiarVQtqRVesw8qKoU3YQ7z-FaMRkFPEOKdewxu0ehZ4DjjxFnXmUWAGFHrcqIRtDJZ0-MG0N65qfE8Qt8GV6-pNc/s1600/raju+shaikh+spacial+story.jpg" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="550" data-original-width="1600" height="136" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhjGvudjlZaNjTvRiwsA8tsOB-Z5aJKCAX1VUdNhQ3ZgMWV0F7BnwpiarVQtqRVesw8qKoU3YQ7z-FaMRkFPEOKdewxu0ehZ4DjjxFnXmUWAGFHrcqIRtDJZ0-MG0N65qfE8Qt8GV6-pNc/s400/raju+shaikh+spacial+story.jpg" width="400" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">'दिव्य मराठी'मध्ये प्रकाशित झालेली मूळ बातमी.</td></tr>
</tbody></table>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-9170482228768387872015-08-03T21:39:00.036+05:302021-05-03T21:12:51.766+05:30वासेपूर - ए नेव्हर एंडिंग स्टोरी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="color: #660000;">गुन्हेगारी संपलीच पाहिजे. खरंय. पण मग संपवायची कोणी? पोलिसांनी? केला त्यांनी प्रयत्न गुन्हेगार संपवण्याचा. मोठमोठ्या टोळ्या नेस्तनाबूत करण्याचा. भले प्रतिस्पर्धी टोळ्यांकडून सुपाऱ्या घेऊन, टीप देवून टपकावले असेल. कोणी शंभरी तर कोणी अर्धशतक गाठले असेल. पण, संपली का खरंच गुन्हेगारी?</span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="color: #660000;"><br /></span><span style="color: #660000;"><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh82nEANRUYCnReNw6V9fBRd_YJFEaNslS8ua2af4cvTtH6brrtQP-aPgKkA8wn0Qf7plHIV0uWmrvhjN-xSXuw_LN6XyoKYGhgsJyL3gX7ZCO1jxig15UOBsh2GJ0xm8w-BC6pC6GTrCE/s1600/gangs-of-wasseypur.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="146" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh82nEANRUYCnReNw6V9fBRd_YJFEaNslS8ua2af4cvTtH6brrtQP-aPgKkA8wn0Qf7plHIV0uWmrvhjN-xSXuw_LN6XyoKYGhgsJyL3gX7ZCO1jxig15UOBsh2GJ0xm8w-BC6pC6GTrCE/s320/gangs-of-wasseypur.jpg" width="320" /></a></div></span><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><br /></div>नाहीच संपली. कशी संपणार? आता तर पोलिसांचे हातही 'ह्युमन राईट्स'ने बांधलेत. मग ही गुन्हेगारी संपणार कशी? आणि ती संपवण्याची जबाबदारी काय एकट्या पोलिसांचीच आहे? ज्या समाजात ही गुन्हेगारी फोफावली, त्यांचे काय? ज्यांनी खतपाणी घातले त्या 'पांढऱ्या बगळ्यां'चे काय? </div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><br /></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">दोन वर्षांपूर्वी 'गॅग्ज ऑफ वासेपूर' आला. कथानकाची गरज असल्यामुळे दोन भागात आला. पण, चित्रपट संपला? नाही. तो अजूनही सुरुच आहे. वासेपुरात नव्हे तर हर एक राज्यात, गावागावात.. गल्लोगल्ली..<br /><br /><div style="text-align: center;">माना की 'शाहिद खान' जैसे लोग..</div><div style="text-align: center;">परिस्थिति की वजह से बनते गए..</div><div style="text-align: center;">जितने भी 'सरदार खान' थे, मारे गये।</div><div style="text-align: center;"><br /></div><div style="text-align: center;">अब बदला लेनेकी ठानकर</div><div style="text-align: center;">'फैजल खान' बड़े हो रहे है..</div><div style="text-align: center;">कोई जेल में, तो कोई तड़ीपार बनकर।</div><div style="text-align: center;"><br /></div><div style="text-align: center;">'रामाधिर सिंग' न तो मरे, नाही मारे जायेंगे..</div><div style="text-align: center;">ये तो साले किसी ना किसी रूप में जिन्दा ही रहेंगे..</div><div style="text-align: center;">गुन्डोंको पालपोसकर बड़ा करते रहेंगे।</div><div style="text-align: center;"><br /></div><div style="text-align: center;">'सुलतान', 'शाहीद', 'असगर' और 'एहसान कुरैशी' जैसे..</div><div style="text-align: center;">कई सारे दिखाई देंगे।</div><div style="text-align: center;"><br /></div><div style="text-align: center;">हममेसे तो कई लोग 'फरजान' बनकर बैठे है,</div><div style="text-align: center;">आन्खोंपे पट्टी बांधे हुये..</div><div style="text-align: center;">इनके साथ चल रहे है..</div><div style="text-align: center;">हम हमेशा कमजोर पडे हें...</div><div style="text-align: center;"><br /></div><div style="text-align: center;">'मोहसिना', 'नगमा', 'शमा', 'शमशाद' और 'दुर्गा'</div><div style="text-align: center;">कभी अपनी ताकद पहचान ही नही पायी।</div><div style="text-align: center;">इसीलिए तो आज गली गली में..</div><div style="text-align: center;">'परपेंडीकूलर', 'दानिश', 'गुड्डू' और 'डेफिनाइट' पैदा हो रहे है।</div><div style="text-align: center;"><br /></div><div style="text-align: center;">अब तो हर कोई 'डेफिनाइट' बनने पर तुला हुआ है।</div><div style="text-align: center;">आजतक पुलिस भी इनका कुछ बिगाड नहीं पायी..</div><div style="text-align: center;">तो कोई क्या 'घंटा' उखाड़ेगा?</div><div style="text-align: center;">बस्स, यही तो जड़ है..</div><div style="text-align: center;"><br /></div><div style="text-align: center;">इसीके वजह से तो..</div>
<span style="color: #cc0000;"><div style="text-align: center;">'गॅग्ज ऑफ वासेपूर'</div></span><div style="text-align: center;">एक 'नेव्हर एंडिंग स्टोरी' बनी है।</div><div style="text-align: center;">साला जबतक 'सूरज', 'चाँद' रहेगा..</div><div style="text-align: center;">ये 'वासेपुर' जिन्दा रहेगा !</div></div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-25265361858160280972014-12-24T21:25:00.003+05:302018-06-18T20:34:24.500+05:30हा खेळ सावल्यांचा...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjNtrMMZ29brUow8AVyoU27OI1-8_bgy4sifQlDwqMjs_YnLs6CGdkXH6ZnoEhZIbI4b8SgfH6LMJFof8biCjQ2_0ar7MSVuIH5fJ189aUIO4Obqsir8kTPm644AGXV_ltX_nkQYneIxoE/s1600/koja-jpg.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="150" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjNtrMMZ29brUow8AVyoU27OI1-8_bgy4sifQlDwqMjs_YnLs6CGdkXH6ZnoEhZIbI4b8SgfH6LMJFof8biCjQ2_0ar7MSVuIH5fJ189aUIO4Obqsir8kTPm644AGXV_ltX_nkQYneIxoE/s1600/koja-jpg.jpg" width="200" /></a></div>
<br />
<br />
<span style="color: #990000;"> "कितीतरी वेळा असं झालांय.. पण छे ... स्वप्नच ती.. ऐनवेळी जाग
येते अन् शेवट हुकतो. साला स्वप्नातही 'त्याची'च दादागिरी. याला काय अर्थ आहे ? मान्य आहे तो 'ग्रेट' आहे. पण, आता
संपव ना म्हणा एकदाचं सगळं. सगळेच प्रश्न सुटतील..."</span></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;">मी -</span> ये. आलास ?</div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #20124d;">तो -</span> हो. </div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;">मी -</span> कसा आहेस ?</div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #20124d;">तो -</span> ( उगाचंच उसणं स्मित करीत) छान ए..</div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;">मी -</span> पण, वाटत नाही..</div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #20124d;">तो -</span> (गप्पच)</div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;">मी -</span> अरे काय झालं बोल ना. मला तरी सांग. कालही काहीच बोलला नाहीस फोनवर. बॅलन्स संपला माझा म्हणून फोन कट झालेला. तू परत केलाही नाहीस.. (तो गप्पच) अरे बोल ना..</div>
<div style="text-align: justify;">
</div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #20124d;">तो -</span> (जमिनीकडे पाहत खालच्या आवाजात) काहीच नाही रे...<br />
<span style="color: #660000;">मी -</span> असं कसं ? सांग ना, काय झालंय ?<br />
<br />
<span style="color: #20124d;">तो -</span> (थोडा वेळ शून्यात हरवून. मग, उगाचच अपराध्यासारखा खालच्या आवाजात) त्या कार अॅसिडेंटमध्ये, किंवा त्या गुंडांनी अडवलं तेव्हा रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली असती तर ? किती बरं झालं असतं ना ? सगळेच प्रश्न सुटले असते. थोडे दिवस वाईट वाटले असते काही जणांना. नंतर जो तो आपापल्या आयुष्यात अडकून जातो. (आकाशाकडे पहात) तो पण ना.. का असे खेळ खेळतो कुणास ठावूक? घरात सगळ्यांचं छान चाललंय. आता कसली म्हणजे कसलीच जबाबदारीही नाहीय. छे... कुठे थांबावं तेच कळत नाही कधी कधी..</div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;">मी -</span> तुला नेमकं काय म्हणायचंय ? </div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #20124d;">तो -</span> (त्याच्याच नादात) तुझ्या माझ्यातही कमालीचे अंतर आहे ना? 'काहीही झाले तरी शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना अंतर देणार नाही', हाच एक घट्ट विश्वास आहे. बाकी आपल्या फॅमिलीही कमालीच्या दोन टोकाला आहेत. तुझीही निष्कारण फरपट होतेय माझ्यासोबत ? त्यापेक्षा मीच नसतो तर ? हे प्रश्नच जन्माला आले नसते ना ?</div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;">मी -</span> (कावरी बावरी होत) अरे कसले प्रश्न ? काय बोलतोयंस तु ? आणि असे अचानक काय झालंय तुला ?</div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #20124d;">तो -</span> (अजूनही त्याच तंद्रीत) तुझ्या ममी पपांनाही तुझी काळजी वाटली नसती. तुझं सगळं छान सुरु होतं रे. अजून दोन वर्षांनी तुझ्या घरच्यांनी तुला हवा तसा राजकुमार तुला आणून दिला असता. मीच माझा निर्णय बदलायला नको होता त्यावेळी. तशी कल्पना होतीच मला, हे असेच होईल म्हणून. (थोडा चिडून) पण, फाजील आत्मविश्वास होता ना.. (पुन्हा शून्यात हरवत, मग थोडं स्मित करीत) खरंच ! सगळेच प्रश्न मिटले असते रे. (मग पुन्हा चिडून) पण, साला स्वप्नातही आपल्या नशिबी अंत नाही..</div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;">मी -</span> (शंकेखोर नजरेने त्याच्याकडे पहात) म्हणजे ?</div>
<div style="text-align: justify;">
</div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #20124d;">तो -</span> (वर पहात) खूप उंचावरुन खाली कोसळावं... अन् आता जमिनीवर पडून ठिकऱ्या ठिकऱ्या होणार.. सुटणार एकदाचं सगळ्यातून.. पण, अचानक दचकून जाग यावी. स्वप्नाच्याच ठिकऱ्या होवून जातात. कुणीतरी अंधारतून खूप गोळ्या झाडतंय.. अंगातून रक्त सांडतंय.. पण, पुढच्या मिनिटाला मांजराच्या पिलाने अंगावर उड्या माराव्यात.. गोळ्या लागलेल्या ठिकाणी गुदगुल्या जाणवतात.. कधी अथांग पाण्यात खोलवर बुडतोय.. नाकातोंडात पाणी जातंय.. श्वास गुदमरतोय.. आता तरी सुटका होईल.. पण, अंगावरच्या ब्लँकेटमुळे दम कोंडून जाग येते.. तो कार अॅसिडेंट जसाच्या तसा.. कितीतरी वेळा झालांय.. पण छे... स्वप्नच ती.. ऐनवेळी जाग येते अन् शेवट हुकतो. (पुन्हा वर पाहत चिडून) साला स्वप्नातही त्याचीच दादागिरी. याला काय अर्थ आहे ? मान्य आहे तो 'ग्रेट' आहे. पण, आता संपव ना म्हणा एकदाचं सगळं. सगळेच प्रश्न सुटतील...<br />
(उठून चालायला लागतो)</div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;">मी -</span> अरे थांब. कुठे चाललांय ? थांब ना... (तो माझा आवाज जूण ऐकायलाच येत नाही अशा अविर्भावात चालतोय अजूनही.. की माझा आवाजच त्याच्यापर्यंत पोचत नाहीय.. माझ्या अंगात त्राण का नाहीय ? त्याला थांबवायला हवंय.. कुठे चाललांय तो ? ) अरे थांब ना. प्लीज. असा अर्ध्यातच कुठे सोडून चाललांस... प्लीज...थांब ना.. अरे.. ऐक तर... (मी धडपडतेय.. पण, जागेवरुन हलता येत नाहीय.. आता माझाही जीव कासावीस होतोय.. डोळ्यापुढे अंधार दाटतोय....)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(काही क्षणांनी... कानावर आवाज येतोय.. अंधारात कोण गातंय ?..) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: center;">
आभास सावली हा</div>
<div style="text-align: center;">
असतो खरा प्रकाश<br />
जे सत्य भासती ते</div>
<div style="text-align: center;">
असती नितांत भास<br />
हसतात सावलीला</div>
<div style="text-align: center;">
हा दोष आंधळ्यांचा....</div>
<div style="text-align: center;">
<br /></div>
<div style="text-align: center;">
<span style="color: #660000;">(दरदरुन घाम फुटून मला जाग येते. अरे हे काय? गाणं अजूनही ऐकू येतंय.. ओह ! पलिकडच्या खोलीत बाबांनी रेडिओ लावलांय तर..)</span> </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;">मी -</span> (स्वत:शीच मनातल्या मनात थोडी सुखावलेय ) म्हणजे हे स्वप्न होतं तर... (पुढच्याच क्षणाला पुन्हा शंका येते) पण हे गाणं स्वप्नातही सुरू होतं का मग ? तो कुठं गेला ? माझा फोन कुठाय ? ...</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<div style="text-align: center;">
<span style="color: #660000;">(रेडिओ अजूनही सुरूच आहे. महेंद्र कपूर गातायेत...) </span></div>
<br /></div>
<div style="text-align: center;">
रात्रीस खेळ चाले</div>
<div style="text-align: center;">
या गूढ चांदण्यांचा</div>
<div style="text-align: center;">
संपेल ना कधीही</div>
<div style="text-align: center;">
हा खेळ सावल्यांचा</div>
<div style="text-align: center;">
हा खेळ सावल्यांचा...</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-51158515622243515842014-02-15T13:03:00.002+05:302014-02-15T13:03:36.855+05:30फसवीच खरी अंतरे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhg-Q0Z7sKZ8KKQRklCDjl9t1al6o86gl1f32KabgAxnh7nmEb67a-0Hew-1hKyo8CKHSRAjOVEbj2Jaar3NgR6BU8cuskCppKI18hP0gdSretSXZvDnGxbGnOGZp9y9dAFmyaYM5MbSRo/s1600/large.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhg-Q0Z7sKZ8KKQRklCDjl9t1al6o86gl1f32KabgAxnh7nmEb67a-0Hew-1hKyo8CKHSRAjOVEbj2Jaar3NgR6BU8cuskCppKI18hP0gdSretSXZvDnGxbGnOGZp9y9dAFmyaYM5MbSRo/s1600/large.jpg" height="152" width="200" /></a></div>
<div style="color: #660000;">
खर तर 'कविता' हा काही आपला प्रांत नाही.…</div>
</div>
<div style="color: #660000;">
पण, बरेचदा 'कविता' खेचून घेतात स्वत:कडे..<br />अस का व्हावं ?<br />मग उगाचच आवडलेल्या प्रत्येक कवितेचा जन्म वेदनेतूनच झालाय असा भास होत राहतो.<br />शब्द दुस-याचे असले तरी सल एकच असल्याचे जाणवते..</div>
</div>
<div style="color: #660000;">
<i><a href="http://mi-sayi.blogspot.in/" target="_blank">'सई'</a></i>च्या काही कविता अशाच…</div>
<div style="color: #660000;">
'सई'च्या पूर्वपरवानगी शिवाय 'ही' कविता येथे पोस्ट करतोय.<br />कारण, आत्ता याक्षणी जे वाटतंय, ते व्यक्त होण्यासाठी 'सई'च्या 'या' कवितेशिवाय दुसरे शब्दच नाहीत...</div>
<div style="color: #660000;">
शब्द आणू तरी कोठून ?</div>
<div style="color: #660000;">
म्हणून मूळ कवितेत उगाचच थोडा बदल केलाय.</div>
<div style="color: #660000;">
(या कवितेखाली 'सई'च्या मूळ कवितेचीही लिंक दिली आहे)</div>
<br />
<h3 class="post-title entry-title" itemprop="name">
</h3>
<h4 style="text-align: left;">
<i><span style="color: #0c343d; font-size: small;"><span style="font-weight: normal;">'अंतरे'</span></span></i></h4>
<h3 class="post-title entry-title" itemprop="name">
</h3>
<div class="post-header">
</div>
तुझ्या माझ्यातही आता...<br />
कधीही न संपवता येणार अंतरच निर्माण झालाय...<br />
मी सतत प्रयत्न करतो ते अंतर कमी करण्याचा...<br />
धावत राहतो उगाचच तुझ्या आठवणींच्या मागे...<br />
दुसरा पर्याय आहे का रे आता,<br />
आठवणीं शिवाय ?....<br />
तुलाही अन् मलाही...<br />
पण नाहीच पोहचत तुझ्यापर्यंत....<br />
फसवीच खरी अंतरे....<br />
:<br />
:<br />
:<br />
:<br />
पण,<br />
'अंत' झाला आपला तरी.....<br />
आपल्या दोघांच्याही 'अंत:करणात' कधी...<br />
'अंतरे' निर्माण होतील का ?<br />
<br />
<a href="http://mi-sayi.blogspot.in/2011/08/blog-post.html" target="_blank">('सई'च्या मूळ कवितेची लिंक)</a><br />
. </div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-33074215492610781022014-01-17T12:40:00.002+05:302020-06-20T18:18:17.463+05:30दिल ढूंढता है फिर वही...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEisQJ5XgM8w4bcrIjN_Fz5l_NdZ-y8uIf-fkNoISRg2AUW6Fo5tUuG1QGuM7UoBj9TWjwC2R_xQw7nG_wqbrtB1jjhjTOotd1_A3emWhZ3R-Ma9MLdilU1g9dcYWSeLmgbXaoSvIm4ffzk/s1600/With+Sujay.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEisQJ5XgM8w4bcrIjN_Fz5l_NdZ-y8uIf-fkNoISRg2AUW6Fo5tUuG1QGuM7UoBj9TWjwC2R_xQw7nG_wqbrtB1jjhjTOotd1_A3emWhZ3R-Ma9MLdilU1g9dcYWSeLmgbXaoSvIm4ffzk/s1600/With+Sujay.jpg" height="171" width="200" /></a></div>
<span style="font-size: small;"><span style="color: #990000;"><span lang="MR" style="font-family: Mangal; line-height: 115%;"><span style="font-size: small;">‘Thanks Sujay! you made my
day spacial today !’</span> </span></span></span><br />
<span style="font-size: small;"><span style="color: #990000;"><span lang="MR" style="font-family: Mangal; line-height: 115%;">आता भेट तर होईलच. कारण खूप गप्पा मारायच्यात.. पुन्हा नऊ
वर्षे मागे जाऊन ‘बॉम्बे ग्यारेज’च्या बस स्थानकावर बसायचंय... पुण्यातल्या
रस्त्यांवरून त्याच्या सोबत पायी चालायचंय.. छे ! आठवणींचा स्लाईडशो संपता संपत
नाहीय..</span></span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span style="font-size: small;"><span lang="MR" style="font-family: Mangal; line-height: 115%;"><br /></span></span>
<span style="font-size: small;"><span lang="MR" style="font-family: Mangal; line-height: 115%;"><br /></span></span>
<span style="font-size: small;"><span lang="MR" style="font-family: Mangal; line-height: 115%;"> आज ‘सुजय’ भेटला. तब्बल ९ वर्षांनी. हो. तोच
‘सुजय’. सुजय सुनील डहाके. ‘शाळा’चा दिग्दर्शक. आणखी काही सांगायला हवेच का?
‘शाळा’मुळे ‘सुजय डहाके’ मराठी मनामनात जाऊन पोचलाय. पहिल्याच कलाकृतीला
मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराने अन् घवघवीत यशाने त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
खोचलाय. ‘शाळा’मुळे ‘सुजय’ला मराठी चित्रपटसृष्टीत एक वलयांकित स्थान प्राप्त झालेय.
तो ‘सुजय’, माझा नऊ वर्षांपूर्वीचा ‘क्लासमेट’ आज प्रत्यक्ष भेटला. निमित्त होते
‘अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धे’चे. ‘सुजय’ या स्पर्धेला परीक्षक म्हणून आला
होता.. गेली तीन दिवस तो नगरमध्ये होता, पण भेटीचा योग मात्र आज जुळून आला.
मध्यंतरी त्याच्या ‘आजोबा’ या आगामी चित्रपटावर एक स्टोरी केली तेंव्हा आम्ही
फोनवर बोललेलो.. पण पुण्यात ‘बचलर ऑफ मास कॉम’ सोबत पूर्ण झाल्यानंतर २००५ मध्ये आमच्या
वाटा वेगळ्या झाल्या. त्यानंतरची ही पहिलीच भेट!</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span style="font-size: small;"><span lang="MR" style="font-family: Mangal; line-height: 115%;"> दुपारी परिसंवाद होता. कार्यक्रमस्थळी पोचल्यावर
तो कुठे दिसेना म्हणून मी त्याला फोन केला. “येतोच आहे” असे तो म्हणाला. पाच
मिनिटांनी तो आला. मी मागे जाऊन त्याला आवाज दिला. त्याने वळून मला पाहिले. दोघेही
ज्जाम खुश झालो. “मह्या, कित्ती वर्षांनी भेटतोयस” म्हणत पुढे येऊन त्याने कडकडून
मिठीच मारली. त्याच्या भेटीने मला जेवढा आनंद झाला तितकाच त्या भेटीचा आनंद
त्याच्या चेहऱ्यावरही ओसंडत होता. मी नकळत बोलून गेलो “सुजय, मोठ्ठा झालास रे
मित्रा!” त्यावर “कसला रे, अजून तसाच बारीक आहे मी” असे तो म्हणाला. मग “तू क्राईम
रिपोर्टर आहेस ना? कसं आहे? काय चाललंय?” वगैरे विचारणा केली. आम्ही बोलत होतो. मध्येच
त्याचे एक दोन चाहते येऊन भेटत होते. तिकडे परिसंवाद सुरु व्हायला आधीच उशीर
झालेला. म्हणून संयोजक त्याला बोलवायला आले. तेही ओळखीचे होते. तरी सुजयने मी
‘त्याचा’ मित्र असल्याचे त्यांना सांगितले आणि थोडा वेळ मागितला. त्यावेळीही
त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. मग मीच “परिसंवादाला उशीर होतोय
आपण पुन्हा भेटूच” म्हणून निरोप घेतला. पत्रकारितेत असल्यामुळे बरेचदा अनेक
सेलिब्रिटीना भेटण्याचा योग येतो. त्यातल्या अनेकांचा वैयक्तिक चाहता असूनही एक
पत्रकार म्हणून मी नेहेमी एक अंतर ठेवत आलोय. गेल्या वर्षी ‘गुलजार’ भेटले
तेंव्हाही असेच. तेंव्हाही ते अंतर कायम ठेवले. पण, आज मात्र प्रथमच मला ‘या’
अविस्मरणीय भेटीचा क्षण क्यामे-यात टिपण्याचा मोह आवरला नाही. सुजय आता सेलिब्रिटी
असला तरी पाय जमिनीवर असलेला मित्र आहे. आमच्या विनंतीवरून संयोजकांनीच तो क्षण
टिपला. मग “मी ‘आजोबा’च्या प्रमोशनसाठी पुढच्या महिन्यात नगरला येतोय तेंव्हा
भेटूच”, असे म्हणून तो स्टेजवर गेला.</span></span></div>
<span style="font-size: small;">
</span><br />
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span style="font-size: small;"><span lang="MR" style="font-family: Mangal; line-height: 115%;"> परिसंवाद सुरु झाला. रिपोर्टिंग करायचे होते म्हणून मी
पहिल्याच रांगेत बसलेलो. सुजयसोबत अभिनेता भरत जाधव आणि दिग्दर्शक केदार शिंदेही
स्टेजवर होते. मी मात्र भारावून सुजयलाच पहात होतो. तो बोलत होता, अन् मी नऊ वर्षे
मागे ‘फ्लशबक’ मध्ये गेलो.. त्या दोन तासांच्या कालावधीत आम्ही सोबत घालवलेल्या नऊ
वर्षांपूर्वीच्या आठवणींचा स्लाईडशो माझ्या मन:चक्षुंपुढे सरकायला लागला..</span></span></div>
<span style="font-size: small;">
</span><br />
<span style="font-size: small;">
</span><br />
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span style="font-size: small;"><span lang="MR" style="font-family: Mangal; line-height: 115%;"> घरचा विरोध पत्करून मी पुण्यात ‘मास कॉम’ला
घेतलेला प्रवेश.. तिथे भेटलेले ‘सुजय’, ‘महांतेश्वर’.. त्यांचा कल ‘फिल्म
प्रोडक्शन’कडे तर माझा ‘जर्नालिझम’कडे.. विचारांमध्ये, करिअरच्या आवडीनिवडीत
विरोधाभास असला तरी आमच्यात छान मैत्री झाली.. इतकी की त्यांच्या एखाद्या
‘स्क्रिप्ट’वर तासंतास गप्पा रंगत.. अन् मी सोबत बसून ऐकत असे.. कधी ‘बॉम्बे
ग्यारेज’च्या बस स्थानकावर तर कधी कॉर्पोरेशनच्या बस स्थानकावर.. गप्पा रंगायच्या
तसे त्यांच्या सिगारेट मागून सिगारेट संपायच्या.. मी ओढत नसलो तरी बरेचदा
सिगारेटचे सुट्टे पैसे मलाच द्यावे लागायचे.. तेंव्हा ज्जाम राग यायचा.. पण हाच
सुज्या (तेंव्हा आम्ही त्याला ‘सुज्या’ म्हणायचो) म्हणायचा.. “दे मह्या दे”.. आणि महान्तेश
म्हणायचा, “अरे जेंव्हा आम्ही मोठे दिग्दर्शक होऊ, तेंव्हा तूच लोकांना सांगशील,
कोणे एके काळी यांचे सिगारेटचे बॉयलर माझ्या पैशांनी पेटत होते”.. आणि माझ्याकडे
बघून ते दोघे एकमेकांना टाळ्या देत हसायचे.. कधी चिंचवडला पवनेकाठी झाडाखाली बसून,
कधी सुजयच्या घरी, तर कधी महान्तेशच्या घरी त्यांचे ‘स्क्रिप्ट’चे लिखाण चालायचे..</span></span></div>
<span style="font-size: small;">
</span><br />
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span style="font-size: small;"><span lang="MR" style="font-family: Mangal; line-height: 115%;"> त्यावेळच्या ‘अल्फा महाकरंडक’मध्ये आम्ही केलेली
एकांकिका.. त्या एकांकिकेची तयारी.. डेक्कनला रानडेच्या कट्ट्यावर बसून मारलेल्या
गप्पा.. एकांकिकेच्या तालमीला झालेल्या गमतीजमती आणि भांडणेही.. ‘माझ्या’ वाट्याला
आलेला ‘लीड रोल’ आपल्याला मिळावा असे त्याचे मागणे.. पण नंतर आपला अभिनय ‘वाईट’
असल्याचे मान्य करीत ‘तूच तो छान करशील’ म्हणून मला सांगणे अन् माघार घेणे...
‘व्हिक्टरी’, ‘प्रभात’, ‘वेस्ट एंड’ला सोबत पाहिलेले सिनेमे.. हॉलीवूडला ‘मनोज
नाईट श्यामलन’ म्हणून याचा आम्ही केलेला ‘सुजय डे डहाके’.. अखेरच्या दिवसांत आम्ही
मिळून बनवलेला ‘५०० रुपयांचे जग’ हा ‘लघुपट’.. त्याचे शुटींग.. मग ‘‘मह्या, तू
फिल्म प्रोडक्शनला का नाही येत?’’ म्हणून त्या दोघांनी घातलेली गळ... पण ‘पत्रकारिताच
करायची’ या निर्णयावर ठाम राहून मी घेतलेला निरोप.. मग काही वर्षांनी सुजय ‘शाळा’
काढतोय कळाले.. त्याच्या गुणवत्तेवर विश्वास होताच.. ‘शाळा’ पाहिल्यावर त्याला
भेटूनच बोलायचे ठरवले.. पण राहून गेले.. ‘शाळा’ प्रदर्शित झाला आणि दुसऱ्याच
आठवड्यात त्याचाच फोन आला.. नगर जिल्ह्यातील एका मुलाने ‘शाळा’ यु ट्यूबवर अपलोड केलाय..
त्याच्याविरुध्द आम्ही ‘सायबर क्राईम’चा गुन्हा नोंदवलाय, त्याविषयी बोलणे
झालेले.. आणि मग काही दिवसांनी ती बातमी झळकली.. ‘शाळा’ला राष्ट्रीय पुरस्कार
मिळाल्याची.. त्याक्षणी एवढा अभिमान वाटला म्हणून सांगू की.. आणि आज थेट त्याची
प्रत्यक्ष भेटच..!</span></span></div>
<span style="font-size: small;">
</span><br />
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span style="font-size: small;"><span lang="MR" style="font-family: Mangal; line-height: 115%;"> परिसंवाद संपल्यामुळे आमच्या ‘आठवणींचा
स्लाईडशो’ही तात्पुरता पॉज झाला..</span></span></div>
<span style="font-size: small;">
</span><br />
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span style="font-size: small;"><span lang="MR" style="font-family: Mangal; line-height: 115%;"> मला पुन्हा स्टेजच्या मागे येईस्तोवर तो भरत आणि
केदारसोबत निघून गेलेला. पुन्हा संध्याकाळी त्याच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक
वितरण होते. पण ‘डेडलाईन’चे भूत मानगुटीवर असल्याने मलाही निघून यावे लागले.
संध्याकाळी आम्हा दोघांचा फोटो त्याला पाठवला. त्यावर ‘पुढच्या महिन्यात पुन्हा
येईन तेंव्हा नक्की भेटू’ म्हणून त्याचा मेसेज आला..</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<br /></div>
<span style="font-size: small;"><span lang="MR" style="font-family: Mangal; line-height: 115%;"> ‘Thanks Sujay ! you made my
day spacial today !’ आता भेट तर होईलच. कारण खूप गप्पा मारायच्यात.. पुन्हा नऊ
वर्षे मागे जाऊन ‘बॉम्बे ग्यारेज’च्या बस स्थानकावर बसायचंय... पुण्यातल्या
रस्त्यांवरून त्याच्या सोबत पायी चालायचंय.. छे ! आठवणींचा स्लाईडशो संपता संपत
नाहीय..</span></span></div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-70521917020587355112013-12-19T15:41:00.003+05:302020-06-20T18:18:35.067+05:30'पत्र' <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
<div>
<div>
<div>
<div>
<div>
<div>
<div>
<div style="text-align: center;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjkbSCgKyWJhto0eGV-HXxxrP8voTsY_TJcRM_Yzom_PAjlMhF1NZAa5_Q7a9uWVTNvm2uQ9eJqE0OCY8aaCnYKV53rD3XtCGtQ7TBiXUKLSO0T4niOx-pzajBU7ZTJKbZP873sXClCznA/s1600/writing_a_letter.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="132" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjkbSCgKyWJhto0eGV-HXxxrP8voTsY_TJcRM_Yzom_PAjlMhF1NZAa5_Q7a9uWVTNvm2uQ9eJqE0OCY8aaCnYKV53rD3XtCGtQ7TBiXUKLSO0T4niOx-pzajBU7ZTJKbZP873sXClCznA/s1600/writing_a_letter.jpg" width="200" /></a></div>
!! श्री !!</div>
<br />
<br />
<br />
<br />
<br />
हाय एंजल ! :-)</div>
<div>
<br /></div>
कसा आहेस ?</div>
खूप दिवसांनी 'पत्र' लिहितोय तुला.<br />
असो.<br />
<br /></div>
तर पत्रास
कारण की, गेल्या आठवड्यात तुझे सर भेटले नगरमध्ये. अण्णांच्या
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यापासून ते इकडेच आहेत. मागच्या
गुरुवारी येथे आयोजित केलेल्या एका सभेसाठी ते आले होते. त्या निमित्ताने आमच्या भेटीचा योग आला आणि मग असंख्य आठवणीनी मनात गर्दी केली…<br />
<br />
गम्मतच आहे ना ! म्हणजे बघ ना, आपण सुरुवातीला बोलायचो तेंव्हा तुझ्या
बोलण्यात त्यांचा उल्लेख असायचा. पण तुझे 'बॉस' असल्यामुळे आणि ते ऑफिसात
असल्यामुळे आपल्याला निवांत बोलता यायचे नाही. म्हणून त्यांचा राग यायचा
तेंव्हा.. कितीदा तरी त्यांना 'खडूस' म्हणायचो आपण.. नंतर 'लेक सिटी'
प्रकरणामुळे त्यांचे नाव पुन्हा कानावर आले. मग एक सच्चा आणि चळवळीत काम
करणारा निर्भीड, तत्वनिष्ठ माणूस म्हणून त्यांची ओळख पटली. त्यांना ओळखायला
लागल्यानंतरच्या पहिल्या वाढदिवशी फोन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बोलण्यावरून ते सरळमार्गी असल्याची
खात्री पटली. नंतर कधी 'फेसबुक'वर तर कधी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत ते
दिसू लागले. मग हळूहळू नंतर त्यांच्याविषयीचे मत बदलले आणि आधी 'खडूस'
वाटलेल्या सरांबद्दल नंतर आदर वाटू लागला...<br />
</div>
खुपदा वाटले कि त्यांना प्रत्यक्ष भेटावे. प्रथमच फोनवर बोललो
तेंव्हा त्यांनीही भेटीचे निमंत्रण दिलेले. पण, तिथे येउन त्यांना भेटायचे
तेव्हा टाळलेच. त्यांना भेटायला का होईना, पण हा आपल्या ऑफिसात मुद्दामून
आलाय असे वाटायला नको, म्हणून मग 'परवा' पर्यंत वाट पाहत राहिलो.
मध्यंतरीही त्यांचे बरेचदा नगरला येणे झाले. पण, भेटण्याचा योग आला नाही.
परवा मात्र त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग जुळला. येथे झालेल्या सभेत
त्यांचे प्रोत्साहित करणारे विचार ऐकले आणि त्यांच्याविषयी वाटणारा आदर
आणखी दुणावला. सभा संपल्यानंतर एका स्वयंसेवी कार्यकर्त्याच्या घरी ते थोडा
वेळ थांबले होते. तेथेच आमची भेट झाली.<br />
</div>
त्यांना पुन्हा माघारी जाण्याची घाई होती. त्यामुळे आमचा संवादही
घाईघाईतच झाला. मी ओळख करून देण्यासाठी नाव सांगताच ते म्हणाले, मी ओळखतो
तुम्हाला. आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. मग मी तुझा मित्र असल्याचे सांगितले
तेंव्हा पुन्हा काहीसे आठवल्यागत ते खुश होऊन म्हणाले, ''अर्रे हो !
बरोब्बर'' तू माझ्याबद्दल त्यांना सांगितलेले आठवले असावे बहुधा
त्यांना. चालता चालताच आमचा संवाद सुरु होता. अलीकडच्या काळात ढासळत
चाललेला पत्रकारितेचा दर्जा, चळवळ, अण्णांचे आन्दोलन अशा विविध विषयांना
स्पर्श झाला. निरोप घेताना मी पुन्हा तुझ्याबद्दल बोललो. त्या दिवशी तुझा
वाढदिवस असल्याचे त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, ''अर्रे हो.
आंदोलनाच्या गडबडीत मी विसरूनच गेलो की. आता निघाल्यावर (तुला) फोन करतो''…
मग कारमध्ये बसून ते मार्गस्थ झाले.<br />
</div>
ते गेले. पण मी विचारात पडलो. त्यांनी खरच तुला फोन केला असेल
का? मी भेटल्याचे सांगितले असेल का? सांगितले असेल तर तुला काय वाटले
असेल? माझा राग तर आला नसेल ना? असे विचार मनात आले. पण मग वाटले
कि, तुझ्यामुळेच तर मी त्यांना ओळखायला लागलो ना? असो. खरे तर त्याच दिवशी
तुला फोन करून हे सगळे सांगायचे होते.. हेच काय आणखी खूप काही सांगायचे
असते. दोघांकडेही फोन आहेत. दोघेही रोज ऑनलाईन असतो. पण या निखळ मैत्रीच्या
नात्यातही एक पुसटशी सीमारेषा आहे. ती नाही ओलांडता येत.. आणि ओलांडायची
पण नाहीय… म्हणून हा 'पोस्टप्रपंच'. असो.!<br />
</div>
बाकी तु सांग. कसा
आहेस? काय सुरु आहे? (हे तुलाच विचारायला लागणार ना रे? म्हणजे आताशा
'तो'देखील ब्लांक होतो तुझ्याबद्दल काही विचारले कि.) बर चल आता. खूप कामं
आहेत, मी पळतो. काळजी घे स्वतःची. एकतर्फी का होईना, पण तुझ्याशी संवाद
साधायचा एवढाच तर एक मार्ग आहे आता. त्यामुळे मी भेटेन इथेच तुला. चल बाय.
काळजी घे.<br />
<br /></div>
<div style="text-align: justify;">
तुझा मित्र,<br />
……<br />
<br /></div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-79676038387063923402013-04-13T01:10:00.000+05:302014-02-15T13:14:19.673+05:30'अजब'च आहे...!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgHrHgDAtRstvM8YtgqfZYKYXQxkcHWum90kIKf6r5Zs_mC06gjoMDProewMKIBQ9Izt6O18xKIWpqQoZwL7iVRQnB3plB77_LoKwN0bU9bGmKnG7xo2jBrO8cLJOrdDNKaDxVWV_ZglWI/s1600/common-man.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgHrHgDAtRstvM8YtgqfZYKYXQxkcHWum90kIKf6r5Zs_mC06gjoMDProewMKIBQ9Izt6O18xKIWpqQoZwL7iVRQnB3plB77_LoKwN0bU9bGmKnG7xo2jBrO8cLJOrdDNKaDxVWV_ZglWI/s1600/common-man.jpg" height="200" width="168" /></a></div>
<br />
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;"> परवा आर. के. लक्ष्मण आले होते नगरमधे. म्हणजे शहरात नाही हो. जिल्ह्यात कुठेतरी येउन गेले. हल्ली त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांचा 'कॉमन Man' आपल्याला भेटत नाही. पण ते येउन गेल्याचे पेपरात वाचले आणि झोपी गेलो. रात्री त्यांचा 'कॉमन Man'च माझ्या स्वप्नात आला. मी विचारले ''कसा आहेस रे बाबा ? सगळे काही ठीक आहे ना ?'' नेहेमीप्रमाणे सुस्कारा टाकत तो उद्गारला, ''ठीक कसले, इथे तर सगळे 'अजब'च आहे...'' मला कळेना, हा असा काय बोलतोय. मग त्यानेच हा खुलासा केला…</span></div>
<div style="text-align: justify;">
<b><br /></b></div>
<div style="text-align: justify;">
<b><br /></b></div>
<div style="text-align: justify;">
<b></b></div>
<div style="text-align: justify;">
<b> १ )</b> गेल्या शनिवारी भर दुपारी प्रचंड गर्दीसमोर एका गुंडाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. जेथे खून झाला त्या घटनास्थळापासून पोलिस ठाणे अवघ्या २ किलोमीटर अंतरावर आहे. पण पोलिसांना घटनास्थळ गाठायला तब्बल पाऊण तास लागला. आता खून होऊन ८ दिवस झाले तरी मारेक-यांना अटक झालेली नाही. शिवाय खुनाचे नेमके कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वातावरण तर इतके तणावग्रस्त आहे की पुन्हा टोळीयुद्ध केंव्हा भडकेल याची शाश्वती नाही. दुसरीकडे या तापलेल्या तव्यावर राजकारणी लोक आपली पोळी भाजायला टपलेले. एरवी अशा गुंडांकडून 'मलिदा' गोळा करण्यासाठी त्यांच्या मागे मागे फिरणा-या पोलिसांना आता हेच आरोपी सापडत नाहीत ?<b> अजब आहे.!!</b></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<b> २)</b> अलीकडेच त्याने एक 'बी' ग्रेड संघटना सोडून 'पक्ष'प्रवेश केला. आता पक्ष चालवायचा म्हणजे बक्कळ पैसा पाहिजे. मग तो कोणत्याही मार्गाने आला तरी चालेल. तसा या कामात 'हा' चांगलाच मुरलेला. तरबेज शिका-यासारखे एखादे सावज 'स्कॅण्डल' मध्ये अडकवायचे आणि मग कारवाईचा धाक दाखवून पक्षासाठी 'निधी' जमवायचा, हा याचा नित्याचा उद्योग. त्याकरिता सोबत असलेल्या 'सी' ग्रेड संघटनांना हाताशी धरायचे अन् प्रशासनावर दबाव आणायचा. पण असे किती दिवस चालणार? शेराला सव्वाशेर हा भेटतोच की कधीतरी. मग आपल्याच 'मागण्या' कुठेतरी 'रेकोर्ड' होतात आणि आपसूकपणे दुसऱ्यांना गजाआड करायला निघालेल्या 'खंडणी'बहाद्दरावर गजाआड जायची वेळ येते. पण तरीही पुन्हा 'साव' असल्याचा 'आव' आणून 'मी नाही त्यातला' म्हणायचे. अडचणीत आल्यानंतर 'बोरूबहाद्दरां'ना पाठीशी उभे राहण्यासाठी विनवण्या करायच्या. छे छे छे. !! पण मी म्हणतो, अटकपूर्व जामीन घेतलेला नसताना 'या' आरोपीचा फोन सुरु आहे. कोणत्या तरी कार्यक्रमाला त्याने जाहीर हजेरी लावल्याचा फोटो पेपरमध्ये छापून येतो. मग 'हा' (खंडणी)बहाद्दर पोलिसांना सापडत कसा नाही ?<b> अजब आहे.!!</b></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<b> 3)</b> अहो साहेब.! सरकार तुमचे, सत्ता तुमची आणि साहजिकच 'दबंग'गिरीही तुमचीच.! तरीही असे वागता ? एकीकडे दुष्काळामुळे जनतेवर उपाशी मरायची वेळ आलीय, अन तुम्ही मात्र 'पुरस्कारांचे सोहळे' साजरे करण्यात मग्न.! अजब आहे.! काहीही म्हणा, पण 'देवस्थान'ने सुरु केलेल्या पाण्याच्या Tanker's वर जाहिरातबाजी छान केलीत हो तुम्ही. अहो, सरकार तुमचे, 'टगेगिरी' तुमची आणि तुम्ही चक्क 'गांधीगिरी' करता ? हे शोभत नाही राव. अहो तुमच्या हक्काचे पाणी मिळणारच की तुम्हाला. त्यासाठी 'टग्या'ला एक फोन फिरवला असतात तरी देखील भागले असते. पण तुम्ही जनतेसाठी (?) रस्त्यावर आलात. तुम्हालाच यावे लागणार, कारण विरोधक आहेतच कुठे तुम्हाला ? आमच्यामुळे पाणी आले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतलीत तुम्ही. वाव्वा ! तुम्हालाच आले राव हे ! आता काय तर म्हणे प्रशासनाला गांभीर्य नाही. म्हणून तुमच्याच राज्यात तुम्हीच मोर्चे काढता ?<b> हाहाहा अजबच आहे.!!</b></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<b> ४)</b> काय मेधाताई ? तुम्ही पुन्हा एकदा उपोषणाला बसलात म्हणे ! हो हो. कारण अजून तरी कुठल्या channel वर किंवा पेपरात ते छापून आल्याचे आम्ही पाहिले अथवा वाचलेले नाही. तसेही तुमची दखल घ्यायला त्यांना वेळ कुठे आहे म्हणा ? आम्ही आपले तुमच्याच चळवळीतील एका कार्यकर्त्याने फेसबुकवर लिहिलेले स्टेट्स वाचले. तुमच्या उपोषणाचा नववा दिवस आहे, असे म्हणत होते ते. त्या 'स्टेटस'वर पडलेला 'प्रतिक्रियांचा पाऊस'ही पहिला आम्ही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे न सगळ्यांना. मग तुम्ही, तुमचे उपोषण, तुमची चळवळ हा किती घाणेरडा प्रकार आहे, हे त्या 'पावसा'मुळे आम्हाला कळाले. आणि बरे का मेधाताई, तुम्हाला प्रसिद्धीची हाव आहे, याचा 'साक्षात्कार'ही आम्हाला याच पावसामुळे झाला. बाकी तुम्ही कशासाठी उपोषणाला बसलात, त्याची दखल अजून कोणी घेतली की नाही, याचे आम्हाला काही घेणे देणे नाही. पण आम्ही आपले 'मत' व्यक्त करण्याचा अधिकार मात्र गाजवणार म्हणजे गाजवणार. दुसरे येतेच काय हो आम्हाला ? </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<b>खरच, हे सगळे अजबच आहे.!!</b><br />
<b> </b></div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-11561583970962904422013-01-06T13:11:00.000+05:302014-04-05T12:59:33.324+05:30'सरफरोशी' कि तमन्ना...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhfoA0EHhqbtE5FPIc3Dtb0hpcEfm4njDWMKnlaWZEJXLHFWEMoxCYD4z9gvc-DybCn6ZRBMBToTX8XNhz-7BoYmGtGwWYAmY9ghNba6vxCUQN38w_M2kuwy8idX-N1iOUcWX3GfhBTEHs/s1600/Amir+Khan-2.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhfoA0EHhqbtE5FPIc3Dtb0hpcEfm4njDWMKnlaWZEJXLHFWEMoxCYD4z9gvc-DybCn6ZRBMBToTX8XNhz-7BoYmGtGwWYAmY9ghNba6vxCUQN38w_M2kuwy8idX-N1iOUcWX3GfhBTEHs/s1600/Amir+Khan-2.jpg" height="200" width="177" /></a></div>
है लिये हथियार दुश्मन ताक में बैठा उधर<br />
और हम तैय्यार है सीना लिये अपना इधर<br />
खून से खेलेंगे होली गर वतन मुश्किल में है<br />
'सरफरोशी' कि तमन्ना अब हमारे दिलमें है !!१!!<br />
<br />
हाथ जिनमे हो जुनून कटते नही तलवार से<br />
सर जो उठ जाते है वो झुकते नही ललकार से<br />
हाथ जिनमे हो जुनून कटते नही तलवार से<br />
सर जो उठ जाते है वो झुकते नही ललकार से<br />
और भडकेगा जो शोला सा हमारे दिल मे है<br />
'सरफरोशी' कि तमन्ना अब हमारे दिलमें है !!२!!<br />
<br />
हम तो घर से निकले हि थे बांधके सरपे कफन<br />
जा-हथेली भर लिये लो भर चले है ये कदम<br />
जिंदगी तो अपनी मेहमान मौत कि मेहफिल मे है<br />
'सरफरोशी' कि तमन्ना अब हमारे दिलमें है !!३!!<br />
<br />
दिलमे तुफानोंकी टोली और नसोंमे इन्किलाब<br />
होश दुश्मन के उडा देंगे हमे रोको न आप<br />
दूर रेह पाये जो हमसे दम कहा मंजिल मे है<br />
'सरफरोशी' कि तमन्ना अब हमारे दिलमें है<br />
'सरफरोशी' कि तमन्ना अब हमारे दिलमें है !!४!!<br />
<br />
<span style="color: red;">(फिल्म : रंग दे बसंती)</span><br />
<br />
<div style="color: #20124d; line-height: normal;">
<span style="line-height: 28px;"><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;">'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..!! </span></span></div>
<div style="color: #20124d; line-height: normal;">
<span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 28px;">आणि </span><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;">'पत्रकार दिना'च्या शुभेच्छा.!!</span></div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-61304303220255325892012-11-08T14:52:00.000+05:302014-04-05T13:04:56.260+05:30'खाकी वर्दी' असुरक्षित ?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQ6g_cNtZLd3WtCJA7GZFPPfblvmuXX9Z6GD0KnwK2ncVzfDsihhGUajsY71feO9ZEdSrnzUvCSRMS2mGc1n6LwlqrQ52IWJo0Vv3hc7wSCdMeap8UeGcdjaXn9P7uv5_WSJ7_o4zqc8Q/s1600/police_maharashtra_190.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQ6g_cNtZLd3WtCJA7GZFPPfblvmuXX9Z6GD0KnwK2ncVzfDsihhGUajsY71feO9ZEdSrnzUvCSRMS2mGc1n6LwlqrQ52IWJo0Vv3hc7wSCdMeap8UeGcdjaXn9P7uv5_WSJ7_o4zqc8Q/s1600/police_maharashtra_190.jpg" height="200" width="200" /></a></div>
<span style="line-height: 115%;"> <span style="color: #990000;">'कानून के हाथ' बहोत लंबे होते है, इन हाथोंसे मुजरीम कभी बच नही सकता, असे डायलॉग मी लहानपणी चित्रपटात ऐकले होते. लहानपणापासून 'खाकी वर्दी'चे कुतूहल असल्याने ते मनावर कोरले गेलेले आहेत. पण कालच्या घटनेने मात्र माझ्या या समजुतीला तडा गेला. कोण कुठला एक राजकीय कार्यकर्ता येतो काय आणि पोलीस ठाण्याच्या आवारात सर्वांसमक्ष एका कॉन्स्टेबलला धमकावतो काय. </span></span><span lang="MR" style="color: #990000; font-family: Mangal,serif; line-height: 115%;">हे सगळे पाहून मला आपण नगरमध्ये आहोत कि ‘युपी-बिहार’मध्ये? असा
प्रश्न पडला. </span><span style="color: #990000;">एकूणच या घटनेतून पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसच सुरक्षित नसल्याचे अधोरेखित झाले.</span><span style="color: #990000;"> कॉन्स्टेबलला धमकावणाऱ्या 'त्या' मुजोर कार्यकर्त्यावर जी कारवाई व्हायची ती होईलच. पण किमान सध्या सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या पोलिसांची 'प्रतिमा' जपण्याचे काम होईल कि नाही ?</span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<br />
<span style="line-height: 115%;"> ‘</span><span lang="MR" style="font-family: Mangal,serif; line-height: 115%;">लॉकअप</span><span style="line-height: 115%;">’</span><span lang="MR" style="font-family: Mangal,serif; line-height: 115%;">मधील आरोपींना भेटायला आलेल्या राजकीय पक्षाच्या एका
युवक कार्यकर्त्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच एका कॉन्स्टेबला धमकावले. हा प्रकार
बुधवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात घडला. ‘अंगावरील वर्दी काढ, आणि
समोर ये, मग तुला दाखवतो’ असे खुले आव्हान त्या मुजोर कार्यकर्त्याने पोलिसाला
दिले. वरून तेथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला उपदेशाचे डोस पाजले. त्या
अधिकाऱ्याने मात्र या कार्यकर्त्याला निव्वळ शांत राहण्याची विनंती करीत या
प्रकरणावर पडदा पाडला.</span><span style="line-height: 115%;"></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="font-family: Mangal,serif; line-height: 115%;"> त्याचे झाले असे, पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरच पोलिसांची सुमो
गाडी उभी होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक वरिष्ठ दर्जाचे अधिकारी
न्यायालयीन कामकाजासाठी एका पोलीस कॉन्स्टेबल आणि वाहनचालकासोबत निघाले. चालक
सुमोत बसून गाडी रिव्हर्स घेत होता. तितक्यात एक पांढ-या रंगाची मारुती स्विफ्ट
कार पोलीस ठाण्याच्या आवारात शिरली आणि सुमोच्या एकदम पाठीमागे येऊन उभी राहिली.
त्यामुळे सुमोचालकाला गाडी मागे घेता येईना. म्हणून सुमोत बसलेल्या पोलिस कॉन्स्टेबलने
खाली उतरून ‘स्विफ्ट’च्या चालकाला कार मागे घ्यायला सांगितली. पण त्याने कार मागे
घेतली नाही. त्या पोलिसाने पुन्हा एकदा कार मागे घ्यायला सागितले. तरीही कार जागची
हलली नाही.</span><span style="line-height: 115%;"></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="font-family: Mangal,serif; line-height: 115%;"> त्यामुळे त्या पोलिसाने पुन्हा एकदा (यावेळी जरबेच्या आवाजात) कार
मागे घ्यायला सांगितली. पोलिसाला चिडलेले पाहून कारचा चालकही तावातावाने बाहेर
आला. सफेद खादीचे कपडे घातलेला हा चालक एका प्रादेशिक पक्षाचा युवक कार्यकर्ता
(याचे काही अवैध धंदे असल्याचेही समजते) आहे. कार मागे
घ्यायला सांगणाऱ्या पोलिसावर तो युवक कार्यकर्ता चिडला. ‘मला ओळखले नाहीस का?
पोलीस ठाण्यात येना-या सर्वसामान्य माणसांना अशी वागणूक देतात का? तुला कायदा कळतो
का?’ असे म्हणत आवाज वाढविला. त्यावर त्या पोलिसाने ‘तुला फक्त गाडी मागे घ्यायला
सांगितली, एवढे चिडायला काय झाले?’ असे विचारले. त्यावर चिडून तो युवक कार्यकर्ता
पोलिस कॉन्स्टेबलवर धाऊन गेला. ‘मला एकेरीची भाषा वापरतोस. एवढा शहाणा झालास का?
आम्ही काय पाकिस्तानातून आलोय का? कोण कुठले पोलीस, बाहेरून येतात आणि आमच्यावर
रुबाब गाजवितात.’ असे म्हणत त्याने कॉन्स्टेबललाच अपशब्द सुनावले.</span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="font-family: Mangal,serif; line-height: 115%;"> एव्हाना त्या कार्यकर्त्याचा ‘आव्वाज’ ऐकून वरिष्ठ अधिकारी बाहेर आले.
त्यांनी काय झाले म्हणून विचारणा केली. त्यावर पोलिस कॉन्स्टेबलने मी त्याला गाडी
मागे घ्यायला सांगितले असा खुलासा केला. त्यावर तो युवक कार्यकर्ता पुन्हा भडकला.
‘अजूनही मला ओळखले नाहीस का?’ असे म्हणत ‘तुझा बक्कल नंबर सांग. मी एसपी’कडेच
तक्रार करतो’ अशी धमकीवजा इशारा त्याने दिला. त्या पोलिसानेही बक्कल नंबर आणि नाव
सांगत ‘काय करायचे ते कर’, असे सुनावले. त्यामुळे पुन्हा चिडून त्या
कार्यकर्त्याने थेट धमकीच दिली. ‘तुला वर्दीचा माज चढलाय. एकदा ही वर्दी उतरव आणि
समोर ये. मग बघू कोणात किती दम आहे ते. (वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाहून) याला एकदा
माझ्या एरियात नेमणूक द्या, मग याचा बेत पाहतो’ असे धमकावले.</span><span style="line-height: 115%;"></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="font-family: Mangal,serif; line-height: 115%;"> आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्याला शांत
करीत पोलीस कॉन्स्टेबललाच ‘गेट लॉस्ट’ असे सुनावले. त्यामुळे तो कॉन्स्टेबल गुपचूप
गाडीत जाऊन बसला. नंतर त्या अधिकाऱ्याने युवा कार्यकर्त्याला गाडी मागे घेण्याची
विनंती केली. मग त्या कार्यकर्त्याने ‘स्टाईल’मध्ये आपली कार मागे घेतली आणि
दुसरीकडे लावली. त्याच्या कारच्या मागे आणि पुढे दोन्ही बाजूला नंबर प्लेटच
नव्हती. मागच्या बाजूला असलेल्या काचेवर भगव्या रंगातील वाघाच्या जबड्याचे चित्र मात्र
होते. त्यावरून तो कोणत्या पक्षाचा असावा, याचा अंदाज येतो. मग ते वरिष्ठ अधिकारी
आपल्या कामासाठी सुमोतून बाहेर निघून गेले.</span><span style="line-height: 115%;"></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="font-family: Mangal,serif; line-height: 115%;"> ते निघून जाताच हा युवा कार्यकर्ता विजयी अविर्भावात पोलीस ठाण्यात
शिरला. सर्वांसमक्ष ‘लॉकअप’मध्ये असलेल्या त्याच्या आरोपी मित्रांना जाऊन भेटला.
त्यांच्यासोबत त्याने चार-पाच मिनिटे गप्पा मारल्या. हे करीत असताना पोलीस ठाण्यात
असलेल्या एकाही पोलिसाने त्याला अडविण्याचे अगर विरोध करण्याचा बाणेदारपणा दाखवला
नाही. मग तो कार्यकर्ता ‘लॉकअप’मधील आरोपींना ‘घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे’
असे सांगत दिमाखात बाहेर आला. जाता-जाता गेटवर असलेल्या पोलिसांनाही त्याने उपदेशाचे
डोस पाजले. ‘तुम्हाला मानवी हक्क आयोग कळतो का? कि तो देखील आम्हीच शिकवायचा?
आमच्या पोरांना लौकर सोडा. त्यांचा लौकर जामीन करा’, असे सांगितले. ते पोलिस एकदम्म
चिडीच्चूप.! मग ज्या ‘स्टाईल’ने हा युवा कार्यकर्ता आला, त्याच ‘स्टाईल’ने पुन्हा
कारमधून निघूनही गेला.</span><span style="line-height: 115%;"></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span style="line-height: 115%;"></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="font-family: Mangal,serif; line-height: 115%;"> या घटनेत जर युवक कार्यकर्त्याला गाडी मागे घ्यायला सांगणे चुकीचे होते तर
त्याला संबधित पोलिसाच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करता आली असती. परंतु तसे न
करता सर्वांसमक्ष पोलिसालाच धमकावत त्याने फक्त ‘चमकोगिरी’ केली. आणि पोलीसही फक्त पाहत बसले. तोफखान्याचे
निरीक्षक सध्या रजेवर आहेत. जेंव्हा हा प्रकार घडला तेंव्हा प्रभारी निरीक्षकही
ठाण्यात नव्हते. त्यामुळे उपस्थित असलेल्या पोलिसांनी कोणतीही भूमिका घेतली नाही.
ज्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासमोर हा प्रकार घडला, त्याने फक्त ‘त्याचे (युवक
कार्यकर्त्याचे) वागणे चुकीचे होते, मात्र आम्ही शांत बसलो असे समजू नका. एकदा आमच्या
टप्प्यात आल्यावर त्याला चांगला धडा शिकवू आणि वर्दीची ताकद दाखवू’ असे म्हणत
सारवासारव करण्याचा पर्यंत केला.</span><span style="line-height: 115%;"></span></div>
<div style="text-align: justify;">
<span lang="MR" style="font-family: Mangal,serif; line-height: 115%;"> हे सगळे पाहून मला मात्र मी नगरमध्ये आहे कि ‘युपी-बिहार’मध्ये असा
प्रश्न पडला.</span> पोलिस ठाण्याच्या आवारात कोणीतरी कार्यकर्ता येतो काय, आणि चक्क पोलिस अधिका-यासमोर कॉन्स्टेबलला धमकावतो काय? एकूणच या घटनेतून पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसच सुरक्षित नसल्याचे अधोरेखित झाले. गुरुवारच्या वृत्तपत्रामध्ये याबाबतचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर वेगवेगळ्या स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. कोणाचे मत होते कि त्या कार्यकर्त्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उठणे-बसणे असेल. तो पोलिसांना चिरीमिरी देत असेल... वगैरे-वगैरे. ते काहीही असो. अशा पद्धतीने पोलिस ठाण्यात येऊन 'दादागिरी' करणे चुकीचेच आहे. अलीकडेच वाचनात आले होते कि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल असलेला कायदा आणखी कडक करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सूचना दिल्या आहेत. त्या कायद्याचे काय होईल तेंव्हा होइलच. पण किमान सध्या तरी पोलिसांची 'प्रतिमा' जपण्याचे काम होईल कि नाही ? पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसच असुरक्षित असतील, तर तिथे सर्वसामान्यांचे काय सांगावे ?</div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-67741161881224388572012-05-13T23:52:00.000+05:302019-01-03T20:54:06.884+05:30कॉन्फिडन्स हो तो ‘नत्थु’ जैसा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="color: #660000; line-height: 115%;"><span style="font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"> ‘आपले शरीर हे पंचमहाभुतांनी बनलेले असून आयुष्य हे
क्षणभंगुर आहे. त्यामुळे मृत्युची मला अजिबात फिकीर नाही. कधीतरी हा देह मातीतच
मिसळणार आहे. पण बुद्धीबळामुळे कॅन्सरविरुध्द लढण्याची जिद्द मला मिळाली. या
खेळामुळे संयम, एकाग्रता व सकारात्मक विचार हे गुण आता अंगी बाणले आहेत. आयुष्यात
येणाऱ्या किरकोळ अपयशामुळे हताश होणाऱ्या तरुण पिढीने बेहोश होऊन बुद्धिबळ खेळावे,
मगच त्यांना लढण्यातला आनंद कळेल’</span></span><span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="color: #444444; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"><br /></span></span><br />
<br />
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="color: #444444; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"> गेल्या महिन्यात नगरमध्ये
राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे वार्तांकन
करण्यासाठी गेलो असता एक ‘वल्ली’ मला भेटली. ‘नत्थु बाबुराव सोमवंशी’ असे त्या ‘व्यक्ती’चे
नाव. स्पर्धेच्या उद्घाटनाला थोडा वेळ होता, म्हणून मी सभागृहाबाहेर एका बाकावर
बसलो होतो. हे सोमवंशी देखील माझ्या शेजारीच बसलेले होते. स्पर्धेसाठी येणारे बरेच
जण त्यांच्या जवळ येत आणि खुशाली विचारत. मी सहज सोमवंशी (हे नाव नंतर संभाषण
झाल्यावर मला समजले) यांच्याकडे नजर टाकली. व्यक्ती तशी सर्वसाधारणच. डोक्यावरचे
केस पांढरे झालेले अन् चेहरा सुरकुतलेला. मात्र समोरच्या व्यक्तीने तब्येतीची
ख्यालीखुशाली विचारली कि त्यावर स्मितहास्य उमटे. त्यावरून अंदाज आला कि हे महाशय
बुद्धिबळ स्पर्धेत नेहेमी सहभागी होत असावेत. आणि त्यांचे वय पाहता सगळेजण त्यांची
आदराने चौकशी करत असावेत. त्यांनी माझाकडे पाहून देखील स्मितहास्य केले आणि
गप्पांना सुरुवात झाली.</span></span><br />
</div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="color: #444444; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"> सोमवंशी यांचे एक
मित्रही आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत
सहभागी होण्यासाठी नगरमध्ये आलेल्या ‘नत्थु बाबुराव सोमवंशी’ यांचा एक व्यक्ती ते
बुद्धिबळपटू म्हणून आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला
तोंड देत वयाच्या ५२ व्या वर्षीही बुद्धीबळाच्या पटाशी अतूट नाते जोपासणा-या सोमवंशी
यांची जगण्याची जिद्द माझ्यासाठी एक औत्सुक्य ठरले आहे. त्यांच्याकडे पाहून
आजूबाजूच्या लोकांनाही जीवन कसे जगावे याचा गुरुमंत्र मिळत आहे. त्यामुळे त्यांना
भेटणारा प्रत्येकजण ‘कॉन्फिडन्स हो तो नत्थु जैसा, नही तो ना हो’ असे म्हणताना दिसतो.</span></span><br />
</div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="color: #444444; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"> सोमवंशी यांचे मुळ
गाव जळगाव जिल्ह्यातील बाळद (ता. पाचोरा). अकरावीत असल्यापासून त्यांना बुद्धिबळाची
प्रचंड आवड आहे. सन १९७६ सालापासून ते सातत्याने बुद्धिबळ खेळतात. सध्या त्यांचे
आंतरराष्ट्रीय मानांकन १५५५ असे आहे. स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षणाची पदवी घेऊन
ते सध्या औरंगाबाद येथील जलविज्ञान प्रकल्प विभागात शाखा अभियंता पदावर कार्यरत
आहेत. लहानपणी आई-वडिलांनी मोलमजुरी करून सोमवंशी भावंडांना शिकविले. बुद्धिमत्ता
तल्लख असल्यामुळे इयत्ता चौथी ते सातवीपर्यंतच्या परीक्षेत ते तालुक्यात पाहिले
आले. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत तर थेट गुणवत्ता यादीत झळकले. या गुणांच्या
आधारावर त्यांना औरंगाबादला अकरावीमध्ये प्रवेश मिळाला. औरंगाबादला ते संत तुकाराम
मागासवर्गीय वसतिगृहात राहिले. अकरावी सायन्समध्ये असताच त्यांचे मन बुद्धिबळ
खेळाकडे आकर्षित झाले. मग औरंगाबादेतील वरिष्ठ बुद्धीबळपटू पोपटभाई पटेल
यांच्याकडे त्यांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. त्यानंतर विविध स्पर्धांतून
खेळायला सुरुवात केली.</span></span><br />
</div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="color: #444444; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"> नत्थु सोमवंशी यांची
मोठी मुलगी एम. डी. रेडिओलॉजिष्ट व छोटी मुलगी एम.बी.बी.एस. आहे. तर मुलगा एम. डी.
रेडिओलॉजिष्ट च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. नोकरीच्या निमित्ताने माजलगाव, बीड,
लातूर, औरंगाबाद येथे ते राहिले. घर व नोकरी सांभाळून बुद्धिबळाचा छंद त्यांनी
मनापासून जोपासला. बारावीच्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र व गणिताच्या विनामूल्य
शिकवण्या दिल्या. त्यांच्याकडे शिकवणी घेतलेले कितीतरी विद्यार्थी आज
डॉक्टर-इंजिनिअर आहेत. पण याचा जरादेखील गर्व सोमवंशी यांना नाही. ज्ञान हे
दिल्यामुळेच वाढते, असे ते म्हणतात. गेल्या वर्षी पोटदुखीचा त्रास झाल्याने
सोमवंशी यांना दवाखान्यात जावे लागले. डॉक्टरांनी त्यांच्या पोटातील मोठ्या
आतड्याला कॅन्सर असल्याचे निदान केले. २२ ऑक्टोबर २०११ या दिवशी त्यांच्यावर
शस्त्रक्रिया करण्यात आली. तेंव्हापासून आतापर्यंत </span></span><span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="color: #444444; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">त्यांच्यावर
</span></span><span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="color: #444444; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">२८ वेळा रेडिएशन व ११ वेळा
केमोथेरपी करण्यात आली आहे. मात्र डोक्यावरचे केस गळणे तर सोडाच, हा कॅन्सर
माझा केसदेखील वाकडा करू शकणार नाही, असा </span></span><span style="color: #444444;">ठाम </span><span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="color: #444444; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">विश्वास सोमवंशी बोलून दाखवितात.</span></span><br />
</div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="color: #444444; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"> बुद्धिबळाशिवाय
वाचनाची त्यांना अफाट आवड आहे. आतापर्यंत ४ हजार पुस्तके त्यांनी वाचली आहेत.
त्यापैकी मक्झीम गॉर्कीचे ‘आई’, सलमान रश्दी यांचे ‘स्याटनिक व्हर्सेस’, तस्लिमा
नसरीन यांचे ‘लज्जा’ ही पुस्तके त्यांना विशेष आवडली आहेत. ‘माझा साक्षात्कारी
हृदयरोग’ या पुस्तकामुळे सकारात्मक विचार आपल्यात मुरले, अशी प्रांजळ कबुली ते
देतात. अनेकदा इच्छा असूनही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑफिसमधून त्यांना
सुट्टी मिळत नाही, मात्र विद्यार्थ्यांना व शेजारच्या मुलांना बुद्धिबळाचे डाव
शिकवण्यात ते तासनतास रमतात. ‘आपले शरीर हे पंचमहाभुतांनी बनलेले असून आयुष्य हे
क्षणभंगुर आहे. त्यामुळे मृत्युची मला अजिबात फिकीर नाही. कधीतरी हा देह मातीतच
मिसळणार आहे. पण बुद्धीबळामुळे मला कॅन्सरविरुध्द लढण्याची जिद्द मला मिळाली. या
खेळामुळे संयम, एकाग्रता व सकारात्मक विचार हे गुण आता अंगी बाणले आहेत. आयुष्यात
येणाऱ्या किरकोळ अपयशामुळे हताश होणाऱ्या तरुण पिढीने बेहोश होऊन बुद्धिबळ खेळावे,
मगच त्यांना लढण्यातला आनंद कळेल’ असे सोमवंशी सांगतात.</span><span style="font-family: "mangal"; font-size: 10pt;"><o:p></o:p></span></span></div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-58824313496061694022012-03-10T23:44:00.001+05:302014-04-05T12:46:07.692+05:30तुझे डोळा माझी दृष्टी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhYSlJ6pfMKHBV_Isuf7LJ7HvvGcZSZ5wwlrN86-1NnnNL8Mme7QfBQSrTSSsjY_kd_uWP1VU41ejep8vrD7lYvb3LA_TduWiVFeV9yIFPln2z9RRyn4peGg5UjDP3jyOkbfwfF9jsqHP8/s1600/figures-eyes-ears.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhYSlJ6pfMKHBV_Isuf7LJ7HvvGcZSZ5wwlrN86-1NnnNL8Mme7QfBQSrTSSsjY_kd_uWP1VU41ejep8vrD7lYvb3LA_TduWiVFeV9yIFPln2z9RRyn4peGg5UjDP3jyOkbfwfF9jsqHP8/s1600/figures-eyes-ears.jpg" height="120" width="200" /></a></div>
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="color: #990000; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> नियतीने त्यांच्या
आयुष्यात भरभरून फक्त अंधारच दिला असला म्हणून काय झाले.? परंतु जन्माची जोडीदार
म्हणून लाभलेल्या त्या दोघींनी मात्र आपल्या अंध पतीराजांच्या आयुष्यात प्रकाशाचा कवडसा निर्माण
केला आहे. ही कहाणी आहे पल्लवी गोरख दरंदले व आशा शाम कोकणे या दोघींची. अंध
जोडीदारासोबत सुखाचा संसार करून समाजातील डोळस असलेल्यांपुढे एक वेगळा आदर्श या
दोघींनी उभा केला आहे.</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><br /></span></span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> पल्लवीचे माहेर
नाशिकचे. घरात आई-वडील व एक भाऊ. पल्लवीचे शिक्षण जेमतेमच. लग्नाचे वय झाल्यानंतर
आई-वडिलांनी मुलगा पाहायला सुरुवात केली. परंतु पल्लवी उजव्या हाताने अपंग
असल्याने तिचे लग्न लौकर जमेना. म्हणून नात्यातल्याच एकाने नगर जिल्ह्यातील
(लांडेवाडी, सोनई, ता. नेवासा) गोरख दरंदलेचे स्थळ सुचविले. मुलगा अपंग (अंध) असला
तरी स्वत:च्या पायावर उभा आहे, एवढे पुष्कळ होते. सन २००६ मध्ये गोरख अन् पल्लवीचे
लग्न झाले.</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> गोरखच्या घरात आई-वडील
व एक भाऊ. गोरखला वयाच्या ८ व्या वर्षी अंधत्व आले. परंतु त्याला जन्माची जोडीदार
म्हणून लाभलेल्या पल्लवीने त्याचा संसार नेटाने सावरलाय. लग्नानंतर दोघांच्या
संसारवेलीवर एक फुलही उमलले. मुलगा केतन आपल्यासारखा अपंग नाही, याचा दोघांना कोण
आनंद. पल्लवीच्या येण्याने माझ्या आयुष्यात प्रकाश आला, असे गोरख सांगतो. गोरख
सध्या ‘साईबन’मध्ये रोपे तयार करण्याचे काम करतोय. अंध सेवा मंडळाच्या
सदस्यांसाठीही त्याची धडपड सुरु असते. पल्लवीनेही साईबन मध्ये मोलमजुरीचे काम
केले. संसार टिकविण्यासाठी काडी-काडी जमविली. वृध्द सासूलादेखील आता ती सांभाळतेय.
गोरखचा भाऊ गावाकडे टपरी चालवीत असला तरी त्याचा मुलगा यांच्याकडेच शिक्षणासाठी
राहतोय.</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> डोळस मुलींनी
अंधांसोबत लग्न करायची तयारी दर्शविली पाहिजे, कारण अंध देखील संधी मिळाली तर
आयुष्यात यशस्वी होऊ शकतात, असे पल्लवीला वाटते. तर धर्मपत्नी म्हणून घरात आलेली पल्लवीच
आता माझी दृष्टी झाली आहे, असे गोरख सांगतो.</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> आशाची कहाणीदेखील
काहीशी अशीच. तिचे माहेर औरंगाबादचे (वाळुंज एमआयडीसी) शिक्षण आठवीपर्यंत. लग्नाचे
वय झाल्यानंतर तिच्या मामांनी नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील निवडूंगा
येथील शाम गोविंद कोकणे याचे स्थळ आणले. मुलाचे घरदार चांगले असून तो एका शाळेत
शिपाई म्हणून नोकरीला आहे, असे मामांनी सांगितले. त्यामुळे आशा लग्नाला तयार झाली.
परंतु लग्नाची तारीख जवळ आल्यानंतर तिला कळले कि नव-या मुलाला दिसायला थोडे कमी
आहे. त्यामुळे आशाने सुरुवातीला या लग्नाला नकार दिला. परंतु तुझ्या नशिबात अंधच असेल
तर कशाला नाही म्हणतेस, अशी समजूत तिच्या घरच्यांनी काढली. म्हणून ती लग्नाला तयार
झाली. अन् २०० मध्ये त्यांचा विवाह झाला.</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> शामच्या घरात
आई-वडील, भाऊ अन् बहिण असा परिवार. लग्नानंतर वर्षभराने श्यामची दृष्टी अजूनच
कमजोर झाली. त्यात शामचा स्वभाव चिडचिडा असल्यामुळे त्याचे आशासोबत खटके उडू
लागले. भांडणाला कंटाळून आशा माहेरी निघून गेली. शामच्या चिडचिड्या स्वभावामुळे
त्याचे आता घरच्यांसोबत देखील वाद होऊ लागले. हे वाद विकोपाला जाऊन एकदा घरच्यांनी
शामला मारहाण केली. मग शामने आशाला फोन करून ‘माझ्यासाठी परत ये, यापुढे
तुझ्यासोबत भांडणार नाही’ अशी विनवणी केली. आणि मग आशा पुन्हा सासरी आली. पण
घरातल्या कुरबुरींमुळे थोड्या दिवसांतच त्यांना वेगळे होऊन बाहेर पडावे लागले.</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center;">
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><i>‘प्रेमाची स्वामिनी
तू दास्य नव्हे ते,</i></span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center;">
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><i>सेवेचे प्रकट रूप
उघड विरहते,</i></span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center;">
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><i>मानबिंदू तोच तुझा
सावर दोरी,</i></span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center;">
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><i>महिला तू माता तू
आदिम शक्ती’</i></span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> या
पद्यपंक्तीप्रमाणेच आशाने शामच्या संसाराची दोरी सावरली. अजूनही कधी-कधी
त्यांच्यात वाद होतात. पण आता अंध सेवा मंडळाच्या अध्यक्षा कमलाताई आपटे व संभाजी
भोर त्यांना वडिलकीच्या नात्याने समजावतात.</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span lang="MR" style="line-height: 115%;"><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> माणूस दृष्टीहीन
किंवा अपंग असला तरी समाजाने मात्र त्यांच्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे.
त्यामुळे ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात, असा विश्वास पल्लवी दरंदले व आशा कोकणे
यांनी व्यक्त केला आहे. आजकाल मुली अपंग, अंध मुलांची स्थळे नाकारतात, हे योग्य नाही.
अंध व्यक्तीही माणूसच असते. असा संदेश जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पल्लवी व
आशा यांनी आजकालच्या युवतींना दिला आहे. या दोघींच्याही संसाराचा प्रवास समाजातील
डोळस व्यक्तींच्या दृष्टीने ‘दीपस्तंभा’सारखा आहे.</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<o:p><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> </span></o:p><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 115%;">दृष्टीहीन
व्यक्तींना समाजात उभे राहताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. परंतु आमच्या
पत्नीचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सुख-दुखा:त साथ देत जगण्याचे बळ त्यांनी
आम्हाला दिलं अन् आमच्या अंधकारमय आयुष्यात प्रकाशाचा कवडसा निर्माण केला. अशी
पत्नी मिळायला जन्मोजन्मीचं भाग्य लागतं, असे गोरख अन् शाम सांगतात.</span><br />
</div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 115%;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: justify;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 115%;"><i><span style="color: #990000;">(ही स्टोरी 'जागतिक महिला दिना'निमित्त </span></i></span><i style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 18px;"><span style="color: #990000;">दि. ८ मार्च २०१२ रोजी </span></i><i style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 115%;"><span style="color: #990000;">'दिव्य मराठी'मध्ये प्रसिद्ध झालेली आहे.)</span></i></div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-43293681736923975642012-01-06T11:14:00.000+05:302014-04-05T13:06:47.506+05:30एक 'पत्रकार' होने के नाते...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div style="background-color: white;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg71sYEIgzUETrQ6qnd3qSMHOn7mjvmJTiVj2QZAVSn8BslALQ1XVz3wIV6HMZ2L0A90rFAKPfNtJ5dJl4c91-0ZRA7paa8NzxkWDp0uD0et3pBlKMdAjJ3Yp9Fj1tzbfMf8HRKKeNumKM/s1600/Amir+Khan-2.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg71sYEIgzUETrQ6qnd3qSMHOn7mjvmJTiVj2QZAVSn8BslALQ1XVz3wIV6HMZ2L0A90rFAKPfNtJ5dJl4c91-0ZRA7paa8NzxkWDp0uD0et3pBlKMdAjJ3Yp9Fj1tzbfMf8HRKKeNumKM/s1600/Amir+Khan-2.jpg" height="200" width="177" /></a></div>
</div>
<div style="font-family: arial; line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #660000;">Dev Speaks...</span></div>
<div style="color: black; font-family: arial; line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<br /></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">मुद्दा ये नही हैं कि मैं जीतूंगा या हार जाऊंगा..</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">मुद्दा ये भी नही हैं कि मैं जीउंगा...</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">या मार दिया जाऊंगा...</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">मुद्दा ये हैं...</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">कि एक 'पत्रकार' होने के नाते...</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">मेरा जो 'फर्ज' हैं...</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">उसे मैं 'इमानदारी' से निभा रहा हु , या नही...</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">एक 'इन्सान' होनेके नाते...</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">'सत्य' के लिये..</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">सत्य कि विजय के लिये...</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">मैं 'लढ' रहा हु या नही...</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">सामने विजय हो, या पराजय...</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">'योद्धा' का धर्म हैं लढना !!</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">आखरी सांस तक..</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">खून के आखरी बूंद तक लढना...</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">'सत्य' और 'इन्साफ' के लिये...</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">सतत 'संघर्ष' करते रहना...!!!</span></div>
<div style="line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><br /></span></div>
<div style="color: black; line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="line-height: 28px;"><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;">'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.!! </span></span></div>
<div style="color: black; line-height: normal; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 28px;">आणि </span><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;">'पत्रकार दिना'च्या शुभेच्छा.!!</span></div>
<br /></div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-52019502775236816082011-07-26T20:43:00.003+05:302014-01-17T13:05:57.886+05:30'राधा' -एक अनाकलनीय गुढ<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgPeiQGXcrrsTsqJ8rkrJOEabY5fx6x9nQ4uhGwd5FbnHFCG7kMByCiDGI7EDiS4Vnu59fE83oOoTKxCDyv5yu0VOeVZDT-mjmEO6Y18UkWgFuDyYA3Yy7EFFomCmc1jtjb30R4DWL-ggI/s1600/Radha-Krishna.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgPeiQGXcrrsTsqJ8rkrJOEabY5fx6x9nQ4uhGwd5FbnHFCG7kMByCiDGI7EDiS4Vnu59fE83oOoTKxCDyv5yu0VOeVZDT-mjmEO6Y18UkWgFuDyYA3Yy7EFFomCmc1jtjb30R4DWL-ggI/s1600/Radha-Krishna.jpg" height="150" width="200" /></a></div>
<br />
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: red;"> </span> <span class="Apple-style-span" style="color: #660000;"> राधा-कृष्णाच्या ‘अनामिक’ आणि हुरहूर लावणाऱ्या नात्याचं गुढ कित्येक वर्षांपासून अनेकांना पडलेलं आहे. या नात्याबाबत अनेक दंतकथा देखील सांगितल्या जातात. पण ते नातं पूर्णपणे कधी कुणाला उलगडल्याचं आजवर तरी ऐकिवात नाही. मनात असंख्य विचारांचं काहूर उठविणाऱ्या या नात्याचे पदर उलगडणारा एक लेख काही दिवसांपूर्वी वाचनात आला होता. आज सहजच जुनी कागदपत्र चाळताना तो पुन्हा गवसला. लेख वाचला अन ‘व. पुं.’च्या त्या वाक्याची पुन्हा आठवण आली. ‘जिवंतपणी मरण अनुभावायचं असेल तर माणसाने प्रेम करावं. कारण प्रेमात आणि मरणात ‘स्व’ उरत नाही.' राधेने श्रीकृष्णावर असच प्रेम केलं असेल का.? 'राधा-कृष्णा'च्या या अनोख्या प्रेमाबद्दल कुणाला आणखी काही ठाऊक असेल किंवा वाचनात आले असेल तर नक्की 'शेअर' करा.</span></div>
<br />
<div style="text-align: justify;">
</div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #e06666;"> </span><i> <span class="Apple-style-span" style="color: #660000;"> मला सापडलेल्या या लेखाचे मुळ लेखक कोण ते आता आठवत नाही. मात्र वाचकांसाठी हा लेख इथे ‘कॉपी-पेस्ट’ केला आहे. जसाच्या तसा..</span></i></div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444;"><br />
</span></div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444;"> श्रीकृष्णाचा विचार राधेवाचून करता येत नाही. आणि राधेचाही विचार श्रीकृष्णावाचून करता येत नाही. राधा म्हटली कि श्रीकृष्ण आलाच आणि श्रीकृष्ण म्हटला कि राधा आलीच. भारतीयांच्या मनामनात राधा श्रीकृष्णासमवेत मोठ्या मानाने वावरते आहे. त्याच्या सोबतीने विहार करण्याचे भाग्य तिला लाभलेले आहे. कृष्णासमवेत ती सावलीसारखी उभी आहे. ती खरी भाग्यशाली आहे. कारण ते भाग्य रुक्मिणीला नाही. त्याची धर्मपत्नी असूनसुद्धा.</span></div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444;"> ‘राधा श्रीकृष्णाची कोण’ हा प्रश्न आतापर्यंत अनेक विचारवंतांना पडलेला आहे. तिच कृष्णाशी नातं कोणतं ? माता ? प्रेयसी ? भगिनी ? भार्या ? कि सखी ? तिच नाव कृष्णाशी जोडले गेले आहे ते कृष्णावरील अनन्य अशा भक्तीभावामुळे. म्हणूनच ‘राधा-कृष्णा'ची जोडी अजोड आहे. ‘राधा-कृष्ण’ एकच आहेत, राधा हे कृष्णाचच स्रीरूप आहे व कृष्णच राधेचं पुरुषरूप आहे’, अशा आख्यायिका ऐकायला मिळतात.</span></div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444;"> राधा-कृष्णाच्या प्रीतीचा वसंत एकदाच आला आणि गेला. पण काहीतरी सतत धमधमते-फुलते मागे ठेऊन गेला. भारतीय पातिव्रत्याच्या कडकडीत सोवळेपणाला कायमचे आव्हान देत, राधेने एकनिष्ठ प्रीतीचे, चांदण्यांनी पूर्ण भरलेले, रंगलेले पूर्ण सौंदर्य उघडे केले. प्रीतीचा लालभडक रंग राधेमुळे सौम्य निळा, रुपेरी झाला. या निळ्या प्रीतीला सामावून घेताना कृष्णाचे व्यक्तिमत्व आकाशाएवढे विस्तारले. रात्रीप्रमाणे ते अतीव मृदू व गुढ झाले. राधा-कृष्णाच्या प्रीतीमुळे भारतीय प्रीतीकथेला नवा कोवळेपणा आला. संसारी भाराने कधीही शिळा न होणारा भाव तिला मिळाला. प्रीतीच्या परिपुर्तीला चिरतारुण्य अपेक्षित असते. ते साधण्यासाठीच या आदर्श प्रेमिकेने जणू श्रीकृष्णाच्या विरहाने स्वतःला बांधून घेतले.</span></div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444;"> या राधेला कृष्णावाचून काही सुचतच नाही. मोरमुकुटधारी, दीड पायावर उभा राहणारा ‘वेणुधर’ म्हणजे तिचं सर्वस्व. त्याच्या ध्यासात, त्याच्या श्वासात झोकून देण एवढच तिला ठाऊक. ज्याच्यात आपण गुंतत आहोत, त्याच्याशी आपलं काय नातं असा प्रश्न कधी तिला पडला नाही. नव्हे, तिच्या दृष्टीने तो गौण होता. राधा कृष्णापेक्षा वयाने मोठी होती. तथापि वयाचा हा अडसर त्यांच्या प्रीतीच्या आड कधीच आला नाही. लोकापवादाची पर्वा तिने कधीच केली नाही. कृष्णाशी एकरूप होण, त्याच्यात आपलं अस्तित्व विरघळून टाकण, एवढच तिला ठाऊक. तेच तिच्या जीवनाचं उद्दिष्ट होत.</span></div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444;"> राधेला 'रासेश्वरी' अस म्हटलं जात ते खरच आहे. राधेसारख कुणी नाचलं नाही. 'तिच्यासारखा नाच अद्याप कुणाला जमला नाही', अस म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. कृष्ण ‘खेळिया’ खरा पण खेळता-खेळता तोच तिच्या हातचं खेळणे बनला आणि पुढे तर तिच्या चरणाचा दास झाला. ‘तुझ्यावाचून तरीही अर्धा’ अशी स्पष्ट कबुलीच दिली त्याने तिला. म्हणूनच ‘बिन राधा, कृष्ण आधा’ अस म्हणतात.</span></div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444;"> राधा म्हणजे अविरत प्रेमाची धारा. प्रीतीच्या या धारेत विषयवासनेला थारा नाही. या धारेला रोखण कुणालाही शक्य झालं नाही. पुढे वाहते ती धारा आणि विषयवासनेकडून उलट फिरते ती राधा. तथापि राधा हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होऊन बसलं. परंपरेने कृष्णाला द्रौपदीशी जखडून टाकलं आणि व्यावहारिक नीतीची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला. पण पुढे पुराणात राधा आली आणि तिने हे सारे बांध फोडले. वय, विवाहबंधन काही काहीच त्यांच्या प्रीतीला अडवू शकले नाही. अति मृदू आणि अति दृढ अस ते 'सखा-सखी'चं नातं होतं. हे नातं हीच प्रेमाची अंतिम आणि असीम अवस्था होतं. उभयंताच्या प्रेमात आडकाठी निर्माण करणारी अनेक कारणे होती. कृष्णेशी संबंध आला तेंव्हा कृष्णाची वृत्ती अनावर झालेली नव्हती. तिच्याशी असलेले त्याचे नाते त्याच्या दृष्टीने सहज आणि अंतिम स्वरूपाचे होते. त्याच्यापुढे त्याला जायचेच नव्हते.</span></div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444;"> राधा कृष्णाची कथा ‘रोमिओ-ज्युलियट’, ‘लैला-मजनू’ यांच्या प्रीतीकथेहून सर्वस्वी वेगळी आहे. समाजाचा विरोध होऊन वा कालांतराने मावळून एकतर त्याचं मिलन झालेलं आहे किंवा त्यांनी आत्महत्या केलेली आहे. राधा-कृष्णाच्या प्रीतीत अस काहीच घडण असंभवनीय होत. कारण राधेचं आधीच लग्न झालेलं होत. रायाण-गोपाशी-अनयाशी. त्यामुळे कृष्णाशी आपण विवाहबध्द होऊ शकणार नाही, याची तिला मनोमन कल्पना असावी. कृष्णाशी विवाह करण्यास समाजाने विरोध केला असता तरी तिने तो मानला नसता. परंतु तिचे कृष्णाबरोबरचे संबंध हे ‘सखा-सखी’ पातळीवरचे होते. आणि तिला देखील त्यापुढे जायचे नव्हते. त्यामुळेच तिने आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारला नाही.</span></div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444;"> आणि राधेने आत्महत्या तरी का करावी ? कृष्णाशी विवाहबध्द होता येत नाही, याबद्दल तिला अतीव दुखः झालं असेल. पण तिने ते अनावर होऊ दिले नाही. अपेक्षाभंगाचं दुख: पचवायला फार मोठ मनोबल लागतं. अशा मनोबलाच्या अभावी ज्यांना जीवन जगण कठीण वाटतं, तेच आत्महत्या करण्याची पळवाट शोधतात. आत्महत्या हे नैराश्य आणि वैफल्यग्रस्त परिस्थितीचं द्योतक आहे.</span></div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444;"> कृष्ण मथुरेला गेल्यावर तो परत येण्याची शक्यता नाही, याची तिला पूर्ण कल्पना होती. तरी तो परत येईल, या आशेवर ती त्याची प्रतीक्षा करीत राहिली. पण अश्रू ढाळीत बसली नाही. त्याच्या स्मृतीत जेवढ म्हणून मग्न राहता येईल तेवढ मग्न राहिली. एखाद्याच्या आठवणीत आत्ममग्न असण, हा निरंतर चालणारा प्रवास असतो. त्यातून मिळणारा आनंद अलौकिक असतो. त्यात दुरावलेपनाची भावना असली तरी ती सुसह्य असते.</span></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-87513813492052041972011-07-19T15:31:00.007+05:302015-08-03T21:41:21.393+05:30अशीही 'चमकोगिरी'<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6pt; text-align: justify;">
<div style="line-height: normal;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhA9iLQ_6G_EYcjI5bASrvCEwugSSKzkjsHdc7yHB6mMRgyDL8hDyaTHBp49MEL8N6LkI-76fleiPIDmzb_Awyb56jjw8BurSaOJO0_hg0TlVUndrOOyu_hAAa9K6T94jBZ0RYrA1h0u7Q/s1600/police-uniforms-250x250.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhA9iLQ_6G_EYcjI5bASrvCEwugSSKzkjsHdc7yHB6mMRgyDL8hDyaTHBp49MEL8N6LkI-76fleiPIDmzb_Awyb56jjw8BurSaOJO0_hg0TlVUndrOOyu_hAAa9K6T94jBZ0RYrA1h0u7Q/s200/police-uniforms-250x250.jpg" width="200" /></a></div>
<span lang="MR"><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> <span class="Apple-style-span" style="color: red;"> </span></span></span><span class="Apple-style-span" style="line-height: 18px;"><span style="color: red; line-height: 115%;"> </span><span class="Apple-style-span" style="color: #660000;"><span lang="MR" style="font-family: Mangal, serif; line-height: 115%;">त्याचे उत्तर ऐकून मी विस्मयचकित झालो. मनोमन त्या मित्राला हात जोडले. त्याच्या दृष्टीने यात</span><span class="apple-converted-space"><span style="line-height: 115%;"> </span></span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="font-family: Mangal, serif; line-height: 115%;">विशेष</span><span style="line-height: 115%;">’<span class="apple-converted-space"> </span></span><span lang="MR" style="font-family: Mangal, serif; line-height: 115%;">असे काही नसेलही. पण त्या युवतीसाठी मात्र</span><span style="line-height: 115%;"> ‘</span><span lang="MR" style="font-family: Mangal, serif; line-height: 115%;">तो</span><span style="line-height: 115%;">’<span class="apple-converted-space"> </span></span><span lang="MR" style="font-family: Mangal, serif; line-height: 115%;">देवच होता ना.</span><span style="line-height: 115%;">? </span><span lang="MR" style="font-family: Mangal, serif; line-height: 115%;">तिची भाषा समजून घेणारा सहप्रवासीही नगरचाच होता. कपड्यांचा व्यापारी असल्यामुळे त्याची भारतभर भ्रमंती असते. त्यामुळे त्याला बंगाली भाषा समजत होती. या जागरूक सहप्रवाशांमुळेच तर त्या युवतीची खरी सुटका झाली. नाहीतर बिचारी अबला कुठल्या नरकात ढकलली जाणार होती कुणास ठाऊक...</span><span style="line-height: 115%;">?</span></span></span><br />
<br />
<br />
<br />
<br />
</div>
<div style="margin-bottom: 0.0001pt; margin-left: 0cm; margin-right: 0cm; margin-top: 0cm; text-align: justify;">
<span style="color: black; font-size: 13.5pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6.0pt; text-align: justify;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">कुठलीही ओळख-पाळख नसताना</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">कसलेही देणे-घेणे नसताना</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">खोल गर्तेत बुडणाऱ्याला सहजपणे मदतीचा हात देऊन त्याचा </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">जीव वाचविणाऱ्या</span><span style="line-height: 115%;">’</span><span lang="MR" style="line-height: 115%;">ला तुम्ही काय म्हणाल.</span><span style="line-height: 115%;">?</span><span style="line-height: 115%;"><o:p></o:p></span></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6.0pt; text-align: justify;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span class="Apple-style-span" style="color: #444444;"><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">देवदूत.</span><span style="line-height: 115%;">? </span><span lang="MR" style="line-height: 115%;">मित्र.</span><span style="line-height: 115%;">? </span></span><span class="Apple-style-span" style="color: #444444;"><span lang="MR" style="line-height: 115%;">कि आणखी काही..</span><span style="line-height: 115%;">? </span></span><span class="Apple-style-span" style="color: #444444;"><span lang="MR" style="line-height: 115%;">तुम्ही काहीही म्हणा. पण </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">ज्या</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">व्यक्तीचा जीव वाचला </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">ती</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">मात्र मदतीचा हात देणाऱ्याला प्रत्यक्ष भगवंतच मानेल.</span><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">आणि</span><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">या सगळ्या </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">कृती</span><span style="line-height: 115%;">’</span><span lang="MR" style="line-height: 115%;">चे (म्हणजे एखाद्याचा जीव वाचविण्याचे) श्रेय जर कुणी तिसराच लाटायला पाहत असेल तर 'त्याला' तुम्ही काय म्हणाल.</span><span style="line-height: 115%;">? </span><span lang="MR" style="line-height: 115%;">असो त्याला देखील तुम्ही काहीही म्हणा</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">पण काल घडलेल्या या </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">चमकोगिरी</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">प्रकरणाची सविस्तर हकीकत ऐकलीत तर तुम्ही देखील अचंबित व्हाल..</span></span></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6.0pt; text-align: justify;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">त्याचे झाले असे</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">कि एका वर्तमानपत्रात काम करणारा माझा एक मित्र नेहेमीप्रमाणे नगरला येण्यासाठी रेल्वेने निघाला. श्रीरामपूरहून </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">आझाद हिंद एक्सप्रेस</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">मध्ये तो बसला. रेल्वेच्या डब्यात त्याच्यासोबत काही सहप्रवासी देखील होते. रेल्वे सुरु झाली आणि काही वेळाने समोरच्या बाकावर बसलेली एक युवती </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">हेल्प हेल्प</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">म्हणून रडायला लागली. तिच्यासोबत असेलल्या ४० वर्षांच्या इसमाने तिला </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">गप्प</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">बसायला सांगितले. तशी ती आणखीनच रडायला लागली.</span><span style="line-height: 115%;"><o:p></o:p></span></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6.0pt; text-align: justify;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">असे बराच वेळ चालल्यानंतर माझ्या त्या मित्राने युवतीसोबत असलेल्या इसमाकडे चौकशी केली. पण नेमका काय प्रकार आहे ते काही केल्या लक्षात येईना. म्हणून माझ्या मित्राने त्या युवतीलाच रडण्याचे कारण विचारले. पण दुर्दैव असे कि तिला मराठी</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">हिंदी अन इंग्रजी या भाषा येत नव्हत्या. ती बहुधा </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">बंगाली</span><span style="line-height: 115%;">’</span><span lang="MR" style="line-height: 115%;">तून बोलत असावी असे माझ्या मित्राने मनाशी ताडले. बराच वेळापासून चाललेला हा प्रकार पाहून </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">दाल में कुच कला</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">असल्याचे त्याच्या लक्षात आले. एव्हाना त्या मुलीने रडून रडून अख्खा रेल्वेचा डबा डोक्यावर घेतला होता. तिचा आवाज ऐकून काही सहप्रवासी गोळा झाले. त्यापैकी एकाला बंगाली भाषा अवगत होती. त्याने </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">त्या</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">भेदरलेल्या युवतीशी संवाद साधला. त्यातून मग जो प्रकार सर्वांना कळला तो अक्षरशः </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">धक्कादायक</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">होता.</span><span style="line-height: 115%;"><o:p></o:p></span></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6.0pt; text-align: justify;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">आपल्या सोबत असलेली व्यक्ती आपल्याला पुण्याला वाममार्गाला लावण्यासाठी घेऊन जात असल्याचे तिने सांगितले. आपण मुळचे बांगलादेशी असून एका युवकाने प्रेमाच्या जाळ्यात फसवून आपल्याला कोलकात्याला आणले. तिथे या (सोबत असलेल्या) इसमाच्या ताब्यात देऊन पुण्यातील एका </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">आंटी</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">कडे पोचवायला सांगितले. असे सांगून ती युवती परत रडायला लागली.</span><span style="line-height: 115%;"><o:p></o:p></span></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6.0pt; text-align: justify;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">सहप्रवाशांनी त्या इसमाकडे याबाबत विचारणा केली असता तो गोंधळून गेला. सुरुवातीला त्याने उलटसुलट उत्तरे देऊन प्रवाशांची दिशाभूल करायचा प्रयत्न केला</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">परंतु नंतर मात्र तो पोपटासारखा बोलू लागला. आपण </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">फक्त</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">दलाल आहोत आणि या मुलीला कोलकात्याहून पुण्याला पोचवायची जबाबदारी आपल्यावर आहे. पान खाल्लेली एक जाडजूड </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">आंटी</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">रेल्वे स्टेशनवर येईल. तिच्याकडून नोटांनी भरलेली सुटकेस घ्यायची आणि मुलीला तिच्या हवाली करायचे</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">एवढेच आपल्याला माहित आहे</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">असे त्याने सांगितले.</span><span style="line-height: 115%;"><o:p></o:p></span></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6.0pt; text-align: justify;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">एकूणच सगळ्या प्रकारची कल्पना सहप्रवाशांना आली. त्यांनी त्या मुलीला धीर देत तिच्यासोबतच्या इसमाला चांगलाच बदडून काढला. काहींनी त्याच्या जवळचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तो स्वीच ऑफ केला.</span><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">या मार्गावरून रोजच प्रवास करीत असल्यामुळे माझ्या मित्राकडे </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">आरपीएफ पोलिसांचे</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">दूरध्वनी क्रमांक होते. त्याने या सगळ्या प्रकारची माहिती </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">आरपीएफ</span><span style="line-height: 115%;">’</span><span lang="MR" style="line-height: 115%;">चे पोलीस उपनिरीक्षक बैनिप्रसाद मीना यांना दिली. त्यांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आपल्या पथकासह नगरच्या रेल्वे स्टेशनवर सापळा रचला.</span><span style="line-height: 115%;"><o:p></o:p></span></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6.0pt; text-align: justify;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">दुपारी एक वाजण्याच्या सुमारास </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">आझाद हिंद एक्सप्रेस</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">स्टेशनवर आली आणि प्रवाशांनी त्या </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">दलाल</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">इसमाला मुलीसह आरपीएफ पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनीही त्या </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">दलाला</span><span style="line-height: 115%;">’</span><span lang="MR" style="line-height: 115%;">ला चांगलाच खाक्या दाखविला. तोपर्यंत उपनिरीक्षक मीना यांनी या घटनेची माहिती नगरच्या पोलीस अधीक्षकांना दिली होती. त्यांच्या विशेष पथकातील एक महिला उपनिरीक्षक देखील सहकार्यांसह घटनास्थळी येऊन ठेपल्या. मग आरपीएफ पोलिसांनी दलाल व युवतीसोबत असलेल्या सहप्रवाशांचे जाबजबाब घेतले. आणि युवतीची सुटका करून दलालाला पोलिसांच्या ताब्यात दिले.</span><span style="line-height: 115%;"><o:p></o:p></span></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6.0pt; text-align: justify;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">एव्हाना नगरमधील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देखील हि घटना समजलेली होती. त्यांनीही घटनास्थळी गर्दी केली. मीदेखील गेलो. तोवर माझा मित्र त्याच्या ऑफिसमध्ये पोचलासुद्धा होता. मी त्याला फोन केला असता जणू काहीच विशेष घडले नाहीय</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">असा तो बोलला. मी त्याला त्याने किती मोठे </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">पुंण्या</span><span style="line-height: 115%;">’</span><span lang="MR" style="line-height: 115%;">चे काम केले</span><span style="line-height: 115%;">’, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">याची कल्पना दिली. त्यावर तो कमालीच्या थंडपणे उत्तरला कि</span><span style="line-height: 115%;">, ‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">काही नाही रे</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">त्या असहाय्य युवतीच्या जागी माझ्या ओळखीची एखादी कोणी असती तरी मी हेच केले असते ना.</span><span style="line-height: 115%;">? </span><span lang="MR" style="line-height: 115%;">मग त्यात काय आहे एवढे.</span><span style="line-height: 115%;">? </span><span lang="MR" style="line-height: 115%;">तुला तर माहीतच आहे</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">माझा हा रोजचा प्रवास आहे. खूप अनुभव येतात. त्यामुळे खरेच यामध्ये विशेष असे काहीच नाही.'</span><span style="line-height: 115%;"><o:p></o:p></span></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6.0pt; text-align: justify;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">मी कमालीचा विस्मयचकित झालो. मनोमन त्याला हात जोडले. त्या मित्राच्या दृष्टीने यात </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">विशेष</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">असे काही नसेलही. पण त्या युवतीसाठी मात्र </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">तो</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">देवच होता ना.</span><span style="line-height: 115%;">? तिची </span><span lang="MR" style="line-height: 115%;">भाषा समजून घेणारा दुसरा सहप्रवासी नगरचाच होता. कपड्यांचा व्यापारी असल्यामुळे त्याची भारतभर भ्रमंती असते. त्यामुळे त्याला बंगाली भाषा अवगत होती. या जागरूक सहप्रवाशांमुळेच तर त्या युवतीची खरी सुटका झाली. नाहीतर ति बिचारी अबला कुठल्या नरकात ढकलली जाणार होती कुणास ठाऊक...</span><span style="line-height: 115%;">? </span><span lang="MR" style="line-height: 115%;">असो.</span><span style="line-height: 115%;"><o:p></o:p></span></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6.0pt; text-align: justify;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">एव्हाना नगरच्या पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधून तिथल्या रेल्वे स्टेशनवर सापळा रचला. सायंकाळी उशिरा पुन्हा माहिती घेतली असता ती </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">आंटी</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">काही मिळाली नाही</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">असे उत्तर मिळाले. ते तर अपेक्षितच होते म्हणा. कारण दलालाचा मोबाईल स्वीच ऑफ झाल्यावर काय समजायचे ते ती समजली असेलच ना.</span><span style="line-height: 115%;">?</span><span style="line-height: 115%;"><o:p></o:p></span></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6.0pt; text-align: justify;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">सायंकाळी मात्र एक अनपेक्षित घटना घडली. काही दिवसांपूर्वी मी क्राइम बीटची जबाबदारी बघत होतो. म्हणून एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा मला फोन आला. खूप दिवसांनी फोन आला म्हणून मी आधी थोडा चकित झालो. मग फोन रिसिव्ह करताच त्यांनी </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">दुपारचीच</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">घटना ठळक बातम्या सांगतात तशी मला सांगितली. अगदी त्यांच्या नेहेमीच्याच शैलीत. म्हणजे अगदी बातमीच्या </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">इंट्रो</span><span style="line-height: 115%;">’</span><span lang="MR" style="line-height: 115%;">सहित. ती अशी</span><span style="line-height: 115%;">, ‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">विशेष पथकातील पोलिसांनी एका बांगलादेशी युवतीची आज सुटका केली.</span><span style="line-height: 115%;"><o:p></o:p></span></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6.0pt; text-align: justify;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">मी म्हणालो</span><span style="line-height: 115%;">, ‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">ओके. पुढे.</span><span style="line-height: 115%;">?’</span><span style="line-height: 115%;"><o:p></o:p></span></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6.0pt; text-align: justify;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #444444; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">सदर</span><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">कारवाई</span><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">रेल्वे पोलिसांच्या मदतीने केल्याचे ते सांगतील</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">असे उत्तर मला त्यांच्याकडून अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. फक्त दलालाला अटक केल्याचे त्यांनी सांगितले. मग मीच विचारले कि </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">पुण्यात सापळा रचला होता ना.</span><span style="line-height: 115%;">?’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">त्यावर ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. मी 'बातमी घेतो'</span><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">असे सांगून फोन ठेवला..!</span><span style="line-height: 115%;"><o:p></o:p></span></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="margin-bottom: 6.0pt; text-align: justify;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span class="Apple-style-span" style="color: #444444;"><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">असो</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">तर या गुन्ह्याचा तपास यथावकाश पुढे होईलच. तशी हि घटना काही अगदीच नवीन नाही. पुण्या-मुंबईत तर अशा कितीतरी मुलींची कुंटणखाण्यात</span><span style="line-height: 115%;"> </span><span lang="MR" style="line-height: 115%;">विक्री होते. त्या घटनांचा तपास जसा होतो</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">तसेच </span><span style="line-height: 115%;">'</span><span lang="MR" style="line-height: 115%;">या</span><span style="line-height: 115%;">' </span><span lang="MR" style="line-height: 115%;">गुन्ह्याचेहि होईल</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">यात शंका नाही. कदाचित </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">लाल फिती</span><span style="line-height: 115%;">’</span><span lang="MR" style="line-height: 115%;">तून सुटका झाल्यावर ती मुलगी तिच्या घरी पोचेलही.</span><span lang="MR" style="line-height: 115%;"> </span></span><span class="Apple-style-span" style="color: #444444;"><span lang="MR" style="line-height: 115%;">पण या घटनेतून एक नवा अनुभव मात्र वाट्याला आला.</span></span></span><br />
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><span class="Apple-style-span" style="color: #444444;"><span lang="MR" style="line-height: 115%;"> वाममार्गाच्या खोल गर्तेत बुडणाऱ्या मुलीची सुटका करूनही काहीच </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">विशेष</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">केले नसल्याचे सांगणारा 'तो' मित्र कुठे </span><span style="line-height: 115%;">? </span><span lang="MR" style="line-height: 115%;">आणि </span><span style="line-height: 115%;">‘</span><span lang="MR" style="line-height: 115%;">चमकोगिरी</span><span style="line-height: 115%;">’ </span><span lang="MR" style="line-height: 115%;">करीत त्या घटनेचे श्रेय लाटणारे हे </span><span lang="MR" style="line-height: 115%;">'</span><span lang="MR" style="line-height: 115%;">खाकी वर्दी'तले अधिकारी कुठे.</span></span><span class="Apple-style-span" style="color: #444444;"><span style="line-height: 115%;">? </span><span lang="MR" style="line-height: 115%;">त्यांनी श्रेय घ्यावे किंवा नाही</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">हा मुद्दा आता सोडू. पण निदान या गुन्ह्याचा पुढील तपास </span></span><span class="Apple-style-span" style="color: #444444; line-height: 18px;">व्यवस्थित </span><span class="Apple-style-span" style="color: #444444;"><span lang="MR" style="line-height: 115%;">व्हावा</span><span style="line-height: 115%;">, </span><span lang="MR" style="line-height: 115%;">त्या </span><span style="line-height: 115%;">'</span><span lang="MR" style="line-height: 115%;">आंटी</span><span style="line-height: 115%;">'</span><span lang="MR" style="line-height: 115%;">सह इतर आरोपिंनाही अटक व्हावी. त्या आरोपिंना कठोर शिक्षा झाली तर तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच त्याचे श्रेय जाईलच ना.</span><span style="line-height: 115%;">? </span><span lang="MR" style="line-height: 115%;">मग आताच हा </span><span style="line-height: 115%;">'</span><span lang="MR" style="line-height: 115%;">अट्टाहास</span><span style="line-height: 115%;">' </span><span lang="MR" style="line-height: 115%;">कशासाठी.</span><span lang="MR" style="line-height: 115%;"> </span></span></span></div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><br />
</span></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-50016548726889147802011-06-19T12:49:00.000+05:302014-04-05T13:11:53.874+05:30शिर्डीतील वाढती गुन्हेगारी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial;"></span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: justify;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjP1H82smT3A12i8fNk0LYk7GYiwPQ3XlEKsLwPLD5oKA3Ce_JLGHrfaGcFnjQFyx2UPxCRJldGz04S0LyMZdypBIAjIbXBLl8708vWPaAHYQ5S01f41ipty_eMep4eyz0zJN0X-r7uZQo/s1600/Crime+280.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjP1H82smT3A12i8fNk0LYk7GYiwPQ3XlEKsLwPLD5oKA3Ce_JLGHrfaGcFnjQFyx2UPxCRJldGz04S0LyMZdypBIAjIbXBLl8708vWPaAHYQ5S01f41ipty_eMep4eyz0zJN0X-r7uZQo/s1600/Crime+280.jpg" height="200" width="200" /></a> <span class="Apple-style-span" style="color: #660000;"> गेल्या आठवड्यात 'पाप्या शेख' या गुंडाने पाटणी व गोंदकर या दोघा तरुणांचा आपल्या २० साथीदारांच्या मदतीने खून केला. रात्री अकरा वाजता दोघांना उचलून नेले. हिंदी चित्रपटातील व्हिलनप्रमाणे १७ जण रात्रभर दोघांना मारत होते. त्यांच्या वेदना ऐकून गुंडांना आनंद होत होता. नंतर त्यांचे मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आले.या घटनेमुळे संपूर्ण नगर जिल्हा हादरला. जगाला 'श्रद्धा आणि सबुरी'चा संदेश देणा-या बाबांची शिर्डी गुन्हेगारीच्या विळख्यात सापडली आहे. हि गुन्हेगारी कशी आणि कुणाच्या मदतीने फोफावली त्याचे <span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 28px;">वास्तवदर्शी चित्रण </span>'लोकसत्ता'चे जेष्ठ बातमीदार अशोक तुपे यांनी यांनी केले आहे. १८ जूनच्या अंकात ते प्रसिध्द झाले आहे. हे 'वृत्त-विश्लेषण' <span id="6_TRN_2k">जसेच्या तसे...</span></span></div>
<div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: justify;">
<span id="6_TRN_2k"></span> </div>
<div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: justify;">
केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी शिर्डीतील साई मंदिराच्या बाहेरील सुरक्षेबद्दल पंधरा दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त केली होती. ‘गुंडा’बद्दल श्रद्धा आणि सबुरी बाळगणाऱ्या पोलिसांनी त्याचीही फारशी दखल घेतलेली नसल्याचेच आता उघड झाले. भडकलेल्या टोळीयुद्धातील मुडदे पडणे अद्याप बंद झालेले नसून राज्याच्या गृहविभागाच्या अब्रूचे पुरते धिंडवडे निघाले आहेत.</div>
<div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: justify;">
साईबाबा मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे की नाही हे गृहविभागाने जाहीर केलेले नाही, देशात कुठेही बॉम्बस्फोट झाले की शिर्डीत रेड अलर्ट जाहीर केला जातो. मंदिर सुरक्षेसाठी आतापर्यंत शेकडय़ाने बैठका झाल्या, पण आता गुंडांच्या टोळ्यांमधील वैमनस्यातून होणारा गोळीबार, अंमली पदाथार्ंची तस्करी, गावठी पिस्तुलांच्या विक्रीचे बनलेले केंद्र, खंडणीची वसुली, किरकोळ कारणावरून केला जाणारा खूनखराबा यामुळे भाविक अक्षरक्ष: गॅसवर आहेत.</div>
<div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: justify;">
पोलिसांकडून हप्त्यापोटी गुंडाना अभय मिळत असल्याने गुन्हेगारी बोकाळली आहे. धार्मिक पर्यटन विकासाच्या बाजारगप्पा मारणारांना भक्तांच्या सुरक्षेचे घेणे-देणे नाही. रचित पाटणी व प्रवीण गोंदकर या दोघा तरुणांची किरकोळ कारणावरून गुंडाच्या २० जणांच्या टोळक्याने निर्घृण हत्या केल्यानंतर आता राज्य सरकारला जाग आली आहे. उद्या (शनिवारी) राज्याचे पोलीस महासंचालक अजित पारसनीस शिर्डीत येत असून त्यांनी शांतता, सुव्यवस्था व मंदिर परिसराच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बैठक आयोजित केली आहे.</div>
<div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: justify;">
साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज सरासरी पन्नास हजारांहून अधिक भाविक येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी साईबाबा संस्थानने ७०० कर्मचारी तैनात केलेले असून राज्य सरकारने एक पोलीस अधिकारी दिला आहे. मंदिराच्या आत संस्थानची, तर बाहेर शिर्डी पोलीस ठाण्याची सुरक्षा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून शिर्डी हे खिसेकापूंचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनले आहे. भाविकांचा खिसा कापला गेला की सुरक्षारक्षकांकडे तक्रार होते, त्याला पोलीस ठाण्यात नेले जाते, तेथे फिर्याद घेण्याऐवजी केवळ तक्रार लिहून घेतली जाते. भाविक पुन्हा तक्रारीचा पाठपुरावा करीत नाही. लाखो रुपयांच्या खिसे कापण्याचा धंदा राजरोस चालतो.</div>
<div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: justify;">
पाप्या शेख या गुंडाने या व्यवसायात आपले साम्राज्य उभे केले आहे. देशभरातून आलेल्या खिसेकापूंना पाप्याची परवानगी घेऊनच खिसा कापावा लागतो. त्यातून पन्नास टक्के रक्कम पाप्या घेतो. स्थानिक गुंडाची पन्नासजणांची टोळी हा धंदा करते. दररोज पाप्या खिसे कापून मिळालेल्या पैशाचे वाटप करतो. काही सुरक्षारक्षक व पोलिसांशी त्याचे लागेबांधे आहेत. सुरक्षा अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांवर आता लोक ‘हप्तेखोरी’चे राजरोस आरोप करत आहेत. सहा टोळ्या कार्यरत असूनही त्यांना पकडले गेलेले नाही. आता त्यांच्यामध्ये टोळीयुद्ध सुरु झाले असून एकमेकांवर गोळीबार करून मुडदे पाडले जात आहेत.</div>
<div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: justify;">
‘चप्पलचोरी’चा नवा उद्योगही सुरु झाला असून दररोज हजारो चपला चोरीला जातात. चोरलेल्या जुन्या चपला मुंबईला जातात. तेथे त्यांना फिनिशिंग करून नव्या बनविल्या जातात. परप्रांतीय गुन्हेगार पिस्तुलांची विक्री करतात. तसेच अंमली पदार्थाच्या तस्करीचेही केंद्र बनले आहे. त्यामुळे आता भक्तांना अतिरेक्यांनी नव्हे तर गुंडांनी गॅसवर ठेवले आहे. खिसेकापूंनी आता आपले कार्यक्षेत्र श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी व राहाता असे केले असून गुंडांचा नवा ट्रॅग्लर तयार झाला आहे. त्यांच्या टोळ्यांकडे शेकडय़ाने गावठी कट्टे आहेत. पोलिसांना त्याचे सोयरसुतक नाही. शनिशिंगणापूर, वेरूळ- अजिंठा, त्र्यंबकेश्वर येथे शिर्डीहून प्रवासी वाहतूक चालते. हजारो वाहने या उद्योगात आहेत. त्यातून पोलीस खोऱ्याने पैसा ओढत आहेत.</div>
<div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: justify;">
अधिकारी पोलीस महासंचालकांपासून ते अधीक्षकांपर्यंतचे पाहुणे, मंत्री दर्शनाकरिता शिर्डीत आले की त्यांची बडदास्त ठेवतात. व्ही.आय.पी. कोटय़ातून दर्शन घडवितात. हॉटेलमध्ये जेवणाची-राहण्याची व्यवस्था करतात. त्यामुळे स्थानिक अधिकारी वरिष्ठांच्या गळ्यातील ताईत बनतात. त्यांना हात लावणे अधीक्षकांना कठीण होते. त्यात राजकीय नेत्यांच्या वाडय़ावर हजेरी लावली की राजकीय वरदहस्त मिळतो. त्यामुळे त्यांचा सर्वत्र दबदबा आहे. आता काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिर्डीत केलेल्या बेनामी गुंतवणुकीचे व्यवहारही सांभाळण्याचा उद्योग ते करतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची दक्षता घेण्यास पोलिसांना फुरसत नाही. बाबांच्या दर्शनासाठी मंत्री व वरिष्ठ अधिकारी आले की सुरक्षेच्या बैठका घेतात, शेकडय़ाने अशा बैठका झाल्या, फार्स अजूनही सुरू आहे.</div>
<div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: justify;">
गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी नुकतीच सुरक्षेच्या प्रश्नावर बैठक घेतली. संस्थान ‘व्हॅन्टेज’ कंपनीची साडेचार कोटींची सुरक्षा यंत्रणा बसवत आहे. पोलीस महासंचालकांनी त्याला संमती दिली आहे. त्यांचे प्रात्यक्षिक चिदंबरम यांच्यासमोर झाले. मंदिराला अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नापेक्षा बाहेरील पाच किलोमीटर परिसरातील सुरक्षा यंत्रणेकडे त्यांनी लक्ष वेधले. पोलीस महानिरीक्षक उद्धव कांबळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्याकडे त्यांनी त्यासंदर्भात खुलासा मागविला. राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. आता मंजुरीसाठी स्वत: केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी बोलणार आहेत.</div>
<div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: justify;">
या घटनेला पंधरा दिवस उलटले असताना 'पाप्या शेख' या गुंडाने पाटणी व गोंदकर या दोघा तरुणांचा आपल्या २० साथीदारांच्या मदतीने खून केला. रात्री अकरा वाजता दोघांना उचलून नेले. हिंदी चित्रपटातील व्हिलनप्रमाणे १७ जण रात्रभर दोघांना मारत होते. त्यांच्या वेदना ऐकून गुंडांना आनंद होत होता. त्यानंतर नग्न अवस्थेत त्यांचे मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आले. या घटनेने गावकऱ्यांना संताप अनावर झाला. पोलिसांविरूद्ध आंदोलन झाले. आता सात-आठ गुंडांना अटक झाली. आणखी दहा गुन्हेगार बाहेर आहेत. पाप्या शेखवर नाशिकवर हल्ला झाला. त्यात त्याचा ‘गणेश’चा मुलगा मारला गेला. हल्लेखोर भूषण मोरेची माहिती दिली नाही. या किरकोळ कारणावरून केवळ संशयाच्या आधारे दोघांना मारून टाकण्यात आले. वादग्रस्त पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे यांना रजेवर पाठविण्यात आले असून त्यांची बदली करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी दिले आहे. गावकऱ्यांच्या दणक्यामुळे वरिष्ठांना जाग आली आहे. </div>
<div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: justify;">
बाबांच्या पावनभूमीतील गुंडांच्या साम्राज्याने राज्याच्या पोलीस दलाची अब्रू गेली. ती सावरण्याकरिता आता पोलीस महासंचालक अजित पारसनीस हे शिर्डीत येत आहेत. गुन्हेगारांचे देशव्यापी सिडींकेट उद्ध्वस्त करणे हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.</div>
<br /></div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-8785034369545561162011-05-13T23:10:00.012+05:302014-02-15T13:29:45.840+05:30'लव्ह लेटर'<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNprkzILLMj3sZysbJ1iG4Pdc_LVag9mG9dfsCKnxV8LOXn7KMU6OgTVqi9nrwjsGW2XO4cq-sb87S1C2sCePop9fiYufTlVb7Ywj9onvWQPl9dMli10ZbCLNoG3MrXcbTvro-dZsmap8/s1600/friends-forever-11.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNprkzILLMj3sZysbJ1iG4Pdc_LVag9mG9dfsCKnxV8LOXn7KMU6OgTVqi9nrwjsGW2XO4cq-sb87S1C2sCePop9fiYufTlVb7Ywj9onvWQPl9dMli10ZbCLNoG3MrXcbTvro-dZsmap8/s1600/friends-forever-11.jpg" height="133" width="200" /></a></div>
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;"></span><br />
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;"><span class="Apple-style-span" style="font-family: 'Times New Roman'; line-height: normal;"><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;"><span class="Apple-style-span" style="color: black;"> </span></span></span><span class="Apple-style-span" style="font-family: 'Times New Roman'; line-height: normal;"><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;"><span class="Apple-style-span" style="color: black;"> </span></span></span><span class="Apple-style-span" style="color: #660000;"><span class="Apple-style-span" style="font-family: 'Times New Roman'; line-height: normal;"><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;"><span class="Apple-style-span" style="font-family: 'Times New Roman'; line-height: normal;"><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;"><span class="Apple-style-span">आपलं सर्वांचं पहिलं प्रेम </span></span></span><span class="Apple-style-span" style="font-family: 'Times New Roman'; line-height: normal;"><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">'चिवित्र'च </span><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">असत. असं म्हणतात कि ''<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, Geneva, sans-serif; font-size: 15px; line-height: 23px;">रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, प</span><span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, Geneva, sans-serif; font-size: 15px; line-height: 23px;">टलि पाहिजे अंतरीची खुण." हि खुण पटते अनेकदा. पण समोरच्याकडे 'प्रेम' व्यक्त करायचं धाडसच होत नाही. </span>कधी कधी असं होत </span><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">कि </span><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">आपलं 'प्रेम' जडलंय हे ज्याच्यावर जडलं त्याला कळतही नाही. मग अशा वेळी करायचं. तर त्याला/तिला 'प्रेमपत्र' लिहायचं. अशी अनेक पत्र लिहिली जातात पण ती 'त्या' व्यक्तीला द्यायचं धाडस होत नाही. भीती वाटते कि आपल 'प्रेम' त्या व्यक्तीला कळलच नाही तर...? मग हि पत्र तशीच राहतात.. </span></span>पण आता </span></span><span class="Apple-style-span" style="font-family: 'Times New Roman'; line-height: normal;"><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">हे प्रेम </span></span><span class="Apple-style-span" style="font-family: 'Times New Roman'; line-height: normal;"><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">व्यक्त करण्याची संधी 'लोकसत्ता'ने दिलीय.</span></span></span></span></div>
<span class="Apple-style-span" style="color: #660000; font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;"> अंह...</span><br />
<div style="margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px;">
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: #660000;"><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;"> हे प्रेम फक्त प्रियकर-प्रेयसी यांच्यातलं नाही. </span><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">ते कुणाचही असू शकत. असच एका वेड्या मैत्रिणीने (अनामिकेने) आपल्या वेड्या मित्राला लिहिलेलं हे पत्र... खूप आवडलं. </span><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 16px;">अगदी मनापासून. </span><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">म्हणून तुमच्यासाठी. </span><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 16px;">अगदी </span><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">जस्सच्या तस्स....</span></span></div>
</div>
<br />
<div style="text-align: center;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 28px;"><span class="Apple-style-span" style="font-size: large;">यु आर माय बेस्ट फ्रेंड..!</span></span><br />
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;"><br />
</span><br />
<div style="text-align: left;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;"> प्रिय मित्रा,</span></div>
</div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">
<div style="text-align: justify;">
आज पहिल्यांदा तुला पत्र लिहित आहे. (काही नाही. म्हटलं बघू तुला आवडत का ते ?) माहित नाही तुला कधी सांगितलं कि नाही. पण आज मनापासून सांगावसं वाटतंय. तुझ्यासारखा मित्र मिळायला खूप मोठ भाग्य लागतं.</div>
</div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">
<div style="text-align: justify;">
मला जेंव्हा तुझी गरज होती, तेंव्हा फक्त तूच माझ्यासोबत होतास. जेंव्हा मी खूप दु:खात होते, तेंव्हा केवळ तूच सोबत होतास आणि मला माहितीये यापुढे पण असशील. तेंव्हा मनाने खचलेल्या या मैत्रिणीला तूच आधार दिलास. माझ्या शंभर चुका माफ करण्याचा समजूतदारपणा जर प्रत्येकामध्ये असता तर भांडणे कधी झालीच नसती. (पण माझी या बाबतीत तक्रार आहे. तू माझ्याशी कधीच भांडत नाहीस.) तुझ्यासारखा समजूतदारपणा कोणामध्येच नाही. (उगाचच नाही म्हटल असं, खरंच आहे ते.) तुझ मलाच नाही तर सगळ्यांनाच समजून घेण मला खूप आवडतं. संकटात जसा नेहेमी तूच पाठीशी होतास आणि मी मूर्खपणा केल्यावर जाब विचारायला पण तूच होतास. तसा जाब कधी विचारलाच नाहीस तू. त्याची पण वाट बघत्येय मी. अरे हक्क आहे तो तुझा.</div>
</div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">
<div style="text-align: justify;">
कदाचित आपण एकत्र असणे काही जणांना रुचणार नाही, तरीदेखील आपण एकत्र राहू. कारण मला इतर मित्र- मैत्रिणी आहेत रे... पण तुझी जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. कधीच नाही. खरंच तू वेगळाच आहेस.</div>
</div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">
<div style="text-align: justify;">
</div>
</div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">
<div style="text-align: justify;">
तुझीच मैत्रीण,</div>
</div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">
<div style="text-align: justify;">
अनामिका.</div>
<br />
<i><span class="Apple-style-span" style="color: red;">(हे पत्र आजच्या 'लोकसत्ता'मध्ये प्रसिध्द झालेले आहे.)</span></i></div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-89009445800813360442011-04-21T13:42:00.005+05:302015-08-03T21:42:22.695+05:30गाव करील ते राव काय करील?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgW2KgdPhK4PibIdQBNok56jgVGjCviKkE4Sdq0eflqJiGps76zcEHDaST6_USoafiOqDC-9s9Ma3dZuvLebC8_lC8eCCj1Sbcvz5d09NsvVZVn-O4s9sVOheYYLrcEFwS0JUUj9pbQ6PY/s1600/lagaan-aug14.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="179" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgW2KgdPhK4PibIdQBNok56jgVGjCviKkE4Sdq0eflqJiGps76zcEHDaST6_USoafiOqDC-9s9Ma3dZuvLebC8_lC8eCCj1Sbcvz5d09NsvVZVn-O4s9sVOheYYLrcEFwS0JUUj9pbQ6PY/s320/lagaan-aug14.jpg" width="320" /></a></div>
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;"></span><br />
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;"><span class="Apple-style-span" style="color: #660000;"> स्थानिक पुढा-यांच्या किंवा शासनाच्या भरवशावर बसले तर विकासकामे पार पडण्यास वर्षानुवर्षे लागतात. सर्वसाधारणपणे छोट्या-छोट्या गावातील ग्रामस्थांना येणारा हा नित्याचा अनुभव. परंतु नेवासा तालुक्यातील घोडेगाव मात्र याला अपवाद ठरले आहे. या गावातील ग्रामस्थांनी (विशेषत: तरुण वर्गाने) नुकत्याच हाती घेतलेल्या सत्कार्यामुळे 'गाव करील ते राव काय करील?' असेच सध्या म्हणावे लागत आहे.</span></span></div>
<br />
<div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
<div>
<div style="text-align: justify;">
जागृत देवस्थान 'घोडेश्वरी देवी' हे घोडेगावचे ग्रामदैवत. या देवीचे एक पुरातनकालीन हेमाडपंथी मंदिर गावात आहे. दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवात आणि चैत्र कृष्ण पंचमीला तेथे देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो रुपयांची उलाढाल होते. राजकीय दृष्टीकोनातूनही घोडेगावला नेवासा तालुक्यात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे उपआवार, जनावरांचा आठवडे बाजार (प्रामुख्याने म्हैस आणि बैलांचा), जवळच असलेले शनीशिंगणापूर, ही घोडेगावची मुख्य ओळख. पण कित्येक वर्षे उलटूनही या मंदिराच्या विकासाला लागलेले ग्रहण मात्र सुटले नाही.</div>
</div>
<div>
<div style="text-align: justify;">
गावात आणि तालुक्यात अनेकदा राजकीय सत्तांतर झाले. दर निवडणुकीला गावच्या विकासासोबत मंदिराच्या विकासाचाही सूर आळविला गेला, परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही. त्यामुळे मंदिराच्या विकासासाठी गावातील तरुणाईनेच पुढाकार घेतला आणि १५ फेब्रुवारीला प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली. मात्र हे सत्कार्य करीत असताना वर्षानुवर्षे आश्वासनांचे गाजर दाखविणा-या पुढारी किंवा शासनापुढे या तरुणाईने हात पसरले नाहीत. स्वकष्टातून आलेल्या मिळकती मधील 'खारीचा वाटा' बाजूला काढून त्यातून हे सत्कार्य तडीस न्यायचा या तरुणाईचा मानस आहे.</div>
</div>
<div>
<div>
<div style="text-align: justify;">
'घोडेश्वरी देवी मंदिर विकास समिती'च्या माध्यमातून या मंदिर परिसराचा विकास सध्या सुरु आहे. मंदिराभोवती संरक्षक भिंत, आतील परिसराचे सुशोभिकरण, बगीचा, वाहनतळ आणि प्रवेशद्वार असे या कामाचे स्वरूप आहे. त्यासाठी कमीत कमी सुमारे २० ते २२ लाख रुपयांचा (अंदाजे) खर्च अपेक्षित आहे. गावातील कुठलेही धार्मिक कार्य (मग ते यात्रोत्सव असो किंवा नवरात्रोत्सव) असो, वर्गणी आलीच आणि घोडेगावात तर वर्गणीला तोटाच नाही. एकट्या आठवडे बाजारात लाखो रुपयांची वर्गणी गोळा होते. गावकरी या मार्गाने गेले असते तर मंदिराचे काम केंव्हाच पूर्णत्वास गेले असते.</div>
</div>
<div>
<div style="text-align: justify;">
पण घोडेगावकरांनी या मंदिराचा विकास करायचा, मात्र त्यासाठी 'बाहेरच्या' लोकांपुढे हात पसरायचे नाही, मदतीसाठी कोणावर सक्ती करायची नाही, असे ठरविले. ज्याची इच्छा असेल तो मदत देईल, या भावनेतून काम सुरु झाले. मंदिराच्या विकासकामात आपापला 'खारीचा वाटा' टाकण्यासाठी इतर ग्रामस्थही मग पुढे आले. कुणी रोख रकमेच्या स्वरुपात, कुणी बांधकाम साहित्याच्या स्वरुपात मदत दिली आणि सत्कार्यात सहभागी झाले.</div>
</div>
<div>
<div style="text-align: justify;">
बांधकामासाठी लागणारे दगड, विटा, वाळू, सिमेंट, स्टील, ग्रील, रंग, <span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">खिळे</span>, असे साहित्य गोळा झाले. ज्या गावक-यांनी अशी मदत दिली, त्यांची नावे रोज सायंकाळी ध्वनीक्षेपकावरून जाहीर केली जातात. कुणाला 'गुप्तदान' <span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">करायचे</span> असेल तर त्याचेही नाव 'गुप्त' देणगीदारांच्या यादीत नोंदविले जाते. ज्यांना यापैकी काही शक्य झाले नाही ते प्रत्यक्ष श्रमदान करायला पुढे आले. एखाद्या दिवशी कामावर कुणी नसले तर गावातील 'तरुणाई' स्वत: उन्हात राबते. त्यामुळे या कामाने आता वेग घेतला असून संरक्षक भिंतीचे काम आता प्रगतीपथावर आहे.</div>
</div>
</div>
<div>
<div>
<div style="text-align: justify;">
'घोडेश्वरी देवी'चा यात्रोत्सव २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. तसे पाहता २० लाख रुपयांची रक्कम काही थोडी नाही. मात्र ग्रामदेवतेवर निष्ठा ठेवून सत्कार्यासाठी पुढे आलेली 'तरुणाई' देखील आपल्या निश्चयावर तितकीच ठाम आहे. लोकसेवकांच्या स्थानिक निधीतून किंवा शासकीय योजनेतून पार पडलेल्या विकासकामांचे श्रेय घेणारी मंडळी आपण पाहतो. परंतु घोडेगावची झपाटलेली तरुणाई मात्र वेगळीच. त्यांना प्रसिद्धी अजिबात नकोय.</div>
</div>
<div>
<div style="text-align: justify;">
या 'तरुणाई'सोबत संवाद साधला असता, ''आम्हाला एकाच ध्यासाने झपाटलंय, ते म्हणजे ग्रामदेवतेच्या मंदिराचे सुशोभिकरण आणि विकास. त्याकरिता शासकीय योजनेची खैरात किंवा पुढा-यांचा पैसा आम्हाला नको. 'आई घोडेश्वरी'चा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. मनात अढळ आत्मविश्वास आहे आणि हे स्वप्न साकार करण्याची ताकद देखील आमच्या मनगटात आहे.'' असे ते सांगतात. आणखी काय हवे. सत्कार्यासाठी जर गाव एकत्र आले तर अशक्य काय आहे. एकीकडे आजकालच्या युवकांना विकासाचे घेणे-देणे नाही, असा टोमणा मारला जातो. परंतु घोडेगावच्या तरुणांनी मात्र आपल्या कृतीतून परिसरात आणि इतर गावांपुढे <span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 20px;">नवा</span> आदर्श उभा केला आहे.</div>
</div>
<div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
<div>
<div style="text-align: justify;">
<i><span class="Apple-style-span" style="color: red;">(</span><span style="color: red;">हे </span></i><i><span class="Apple-style-span" style="color: red;">सदर आजच्या 'लोकमत' मध्ये प्रकाशित झाले आहे.)</span></i></div>
</div>
</div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-48192826384641907602011-04-04T17:28:00.003+05:302014-04-05T12:51:42.438+05:30'बातमी'चा परिणाम...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 24px;"></span></div>
<div style="text-align: justify;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiOv1BnjWGE_rizgP-D5kH-dzQ10i3YzOYm_lY67OUo-2jka4EmzewcVzJIQPKIYB2afgjxnxCqD31pjjVQi-nUfn0yHKkXSgBoFwln4M7NO6quq393vWFwkvjPRcPANpaBJayHSusH37o/s1600/nib.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiOv1BnjWGE_rizgP-D5kH-dzQ10i3YzOYm_lY67OUo-2jka4EmzewcVzJIQPKIYB2afgjxnxCqD31pjjVQi-nUfn0yHKkXSgBoFwln4M7NO6quq393vWFwkvjPRcPANpaBJayHSusH37o/s1600/nib.jpg" height="200" width="160" /></a><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 24px;"><span class="Apple-style-span" style="font-family: 'Times New Roman'; line-height: normal;"><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 24px;"><span class="Apple-style-span" style="color: #cc0000;"> </span><span class="Apple-style-span" style="color: #660000;"> काही दिवसांपूर्वी दुचाकी वाहने चोरणा-या टोळ्यांनी नगर जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. याबाबत अधिक अभ्यास केला असता जिल्ह्यात सरासरी दिवसाला २ दुचाकी वाहने चोरीला जातात, असे लक्षात आले.</span></span></span></span></div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 24px;"><span class="Apple-style-span" style="font-family: 'Times New Roman'; line-height: normal;"><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 24px;"><span class="Apple-style-span" style="color: #cc0000;"> </span></span></span><span class="Apple-style-span" style="font-family: 'Times New Roman'; line-height: normal;"><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 24px;">दुचाकी वाहन चोरांच्या </span></span><span class="Apple-style-span" style="font-family: 'Times New Roman'; line-height: normal;"><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 24px;">'या' </span></span><span class="Apple-style-span" style="font-family: 'Times New Roman'; line-height: normal;"><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 24px;">टोळ्यांनी पोलिसांपुढे देखील कडवे आव्हान निर्माण केले होते. या टोळ्यांची कार्यपद्धती नेमकी कशी आहे ? तसेच चोरीला गेलेल्या दुचाकी वाहनांचे पुढे काय होते ? याबाबत 'लोकमत'मधून 'प्रकाशझोत' टाकण्यात आला. या अभ्यासपूर्ण वृत्ताची जिल्हा पोलीस प्रमुखांनी गंभीर दखल घेतली आणि 'या' टोळ्या गजाआड करण्यासाठी एक 'विशेष पोलीस पथक' स्थापन केले. परिणामी 'लोकमत'मध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर सातव्या दिवशीच पोलिसांच्या विशेष पथकाने एक दुचाकी वाहन चोरांची टोळी गजाआड केली. या टोळीकडून सुमारे १०० हून अधिक दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. यामुळे काही काळापुरते जिल्ह्यातून दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण कमी झाले होते. </span></span></span></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 24px;"></span></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<br /></div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-4469660347607743292010-12-17T15:40:00.005+05:302014-02-15T13:09:48.303+05:30नमस्तुभ्यम्...!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgF1kuN9NThdnFhU0aQsrqXVOa-5xvu8aSTctUgt4cgDivDh9l6xV55Hqa-13GyExjuZN-IlWdhtMW-65_poAtFR1SvcK7j05jrwlVgqSmD_1ifYbeWGfndmCur6Z-wl4HIJRoRyFsM4ss/s1600/pandurang-shastri-athavale.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgF1kuN9NThdnFhU0aQsrqXVOa-5xvu8aSTctUgt4cgDivDh9l6xV55Hqa-13GyExjuZN-IlWdhtMW-65_poAtFR1SvcK7j05jrwlVgqSmD_1ifYbeWGfndmCur6Z-wl4HIJRoRyFsM4ss/s1600/pandurang-shastri-athavale.jpg" height="166" width="200" /></a><span class="Apple-style-span" style="font-family: 'ARIAL UNICODE MS', mangal, raghu8;"><span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 28px;"><span class="Apple-style-span" style="color: purple;">सौजन्य: महाराष्ट्र टाइम्स, मुंब</span></span></span>ई<br />
<br />
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="color: red; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> </span><span class="Apple-style-span" style="color: #660000; font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले म्हणजेच 'दादा' यांच्या नव्वदाव्या जयंतीनिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वाध्याय परिवार सज्ज झालाय. २० डिसेंबर २०१० रोजी जगभरातील ८ लाख 'स्वाध्यायी' नवी मुंबई येथील तळोजा एमआयडीसी मैदानात एकत्र येत आहे. कृतज्ञतापूर्वक नमस्कार करण्याच्या या कार्यक्रमाचे नाव आहे<span class="Apple-style-span"> </span><span class="Apple-style-span">“</span><span class="Apple-style-span">नमस्तुभ्यम्</span><span class="Apple-style-span">”...!</span> </span></div>
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"><br />
</span><br />
<br />
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> भ्रांत-ईश्वरवादाच्या भोव-यात फसलेला, अंधश्रध्देमध्ये अडकलेला, व्यसनांनी गुरफटलेला, परिस्थीतीपूढे हतबल झालेला, अस्मिताशून्य बनलेल्या समाजाला वर कसं आणणार, हा प्रश्न प्रत्येक विचारवंताला पडतो. मग समाज परिवर्तनाची चक्र फिरू लागतात. अनेक विचारवंत वित्त अथवा मदतीतून माणसालावर आणण्यचा प्रयत्न करताना दिसतात पण यातून फार मोठे परिवर्तन घडल्याचे दिसून येत नाही अथवा ते मर्यादीत काळापूरता टिकते. तेव्हा समाज परिवर्तन हे त्याचा केंद्र बिंदू असलेल्या माणसाच्या विचार परिवर्तनातून शक्य होऊ शकतं हे ओळखून दादांनी स्वाध्यायातून विचार परिवर्तन घडवले.</span></div>
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"></span><br />
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> भगवंत केवळ आकाशात नाही, मंदिरात नाही तर माणसा-माणसाच्या ह्रदयात आहे, त्याला जागं केलं की माणसातलं माणूसपण जागृत होईल, या विचाराने श्रीमद्भग्वदगीतेच्या आधारावर त्रिकालसंध्येद्वारे लाखोंच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला. पण हे परिवर्तन दिसतं तितकं सोप नाही. १९४२ पासून सुरू झालेल्या या कार्यच्या सुरवातीच्या काळात दादांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यात सगळ्यात कठीण म्हणजे दादांचे अयाचक व्रत. तरीही केवळ भगवंतावर अनन्य विश्वासाच्या जोरवर निस्वार्थ संबंधातून दादांनी हे परिवर्तन समाजात घडवून आणले.</span></div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> आज सरकार अथवा अन्य कोणाच्याही मदतीशिवाय भारतातील हजारोंगावं आदर्श गावं बनली आहेत. अमृतालयम्, मत्स्यगंधा, वृक्षमंदिर या सारख्या प्रयोगातून भारतातील हजारोंगावात बदल घडून आला आहे. हे सर्व करून ही दादांनी स्वत:ला कधी गुरू म्हणवून घेतलं नाही. ते केवळ परिवारातील मोठा भाऊ या नात्याने दादा म्हणूनच सगळ्यांमध्ये फिरले. जागतिक तत्त्वज्ञानाचा अभ्यासक असलेले दादा ख-या अर्थाने अॅक्टिवीस्ट फिलॉसॉफर आहेत. म्हणून दादांच्या प्रति कृतज्ञतेने नमस्कार करण्यासाठी स्वाध्यायी एकत्र येत आहे.</span></div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif;"> स्वाध्याय परिवारात दिवाळीसारखे वातावरण आहे. मुंबईतील अनेक रेल्वे स्थानंकावर सजावट करण्यात आली आहे. १८ डिसेंबर रोजी मुबई, नवीमुंबई, ठाणे शहर परिसरातील ११ विविध ठिकाणांपासून जवळपास ३,५०० स्कुटर-मोटार बाईक्स यांचे संचलन स्वाध्यायी युवक करणार आहेत. नमस्तुभ्यम् मध्ये ८३००० तरूण नृत्यातून आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. स्वाध्यायी हे नुसतेच नमस्कार करण्यासाठी येत नसून त्यांनी ९० लाखलोकांपर्यंत त्रिकालसंध्येचा विचार पोहचवला आहे, तसेच ११ डिसेंबर रोजी हजारो गावांमध्ये स्वच्छता करण्यात आली आहे. धनश्री तळवळकर (दीदींच्या) नेतृत्वासहित असा कृतीपूर्ण नमस्कार करून लाखो लोक या स्वाध्याय पंढरीच्या 'पांडुरंगा'ला वंदन करयाला शिस्तबध्द पध्दतीने येऊन कार्यक्रम पार पाडतील यात शंकाच नाही.</span></div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-9085286941258927422.post-5722962357692330212010-11-09T15:32:00.009+05:302018-06-18T20:27:13.448+05:30'त्या' प्रसंगाची रुख-रुख...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhwsaCTJVLkj9hS67O8JPz_r1i59U5I94_NyOGeQzQQPD6ZN7GAVEA-xBgDYy00Vl5l68g_5ye8SYj0HCe5HVbaHXzyh1B9MMm5Es4GYQFpGoCaxMC5k2n0ZkNUzzmbeWX0353aUiSx7Lc/s1600/shani-shinganapur-1.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="133" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhwsaCTJVLkj9hS67O8JPz_r1i59U5I94_NyOGeQzQQPD6ZN7GAVEA-xBgDYy00Vl5l68g_5ye8SYj0HCe5HVbaHXzyh1B9MMm5Es4GYQFpGoCaxMC5k2n0ZkNUzzmbeWX0353aUiSx7Lc/s1600/shani-shinganapur-1.jpg" width="200" /></a></div>
<span style="color: #cc0000;"></span><br />
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-style-span"><span style="color: #cc0000;"> </span><span style="color: #660000;"> आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात. ज्यावेळी नेमकं काय करावं कळत नाही. आपल्याला नेमकी परिस्थिती ठावूक नसते, अन ती जाणून घेऊन काही करण्याइतपत वेळही नसे. त्यामुळे आपण बघ्याची भूमिका घेतो. आपल्या या भूमिकेचा नकळत कोणाला फटका बसला आणि भविष्यात पुन्हा तो प्रसंग आठवला कि मग वाईट वाटत. 'त्या क्षणी आपण असं करायला हवं होत.' किंवा 'तसं केलं असत तर किती बर झालं असत' असं सारखं वाटत राहत. पण वेळ कधीच निघून गेलेली असते. मग उगाचच मनाला चूट-पुट लागून राहते...! 'तो' प्रसंग आठवला कि मन खात राहात. काल माझही असच झालं... किंबहुना अजूनही 'तो' क्षण आठवला कि स्वताचीच चीड येते. मी असा कसा वागलो तेच कळत नाही. </span></span><span class="Apple-style-span"><span style="color: #660000;">अपराधीपणाची भावना हेच मोठ दुखः..!</span></span></div>
<br />
<br />
<div style="text-align: justify;">
त्याच झालं असं. काल शनिवार होता. नेहेमीप्रमाणे मी शनी-शिंगणापूरला गेलो. मात्र काल शनी-आमावस्या असल्यामुळे माझ्यासोबत आणखी 2 मित्र आले होते. भाविकांचीही नेहेमीपेक्षा थोडी जास्तच गर्दी होती. गावात प्रवेश केला आणि ''महेश नमस्ते. आज पायी आलात वाटते.'' असा आवाज कानी पडला. मी आवाजाच्या दिशेने पहिले तर सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब माने दृष्टीस पडले. पोलिसांच्या जीपमध्ये बसून ते एका माणसासोबत काहीतरी बोलत होते. मला पाहिले म्हणून त्यांनीच आवाज दिला होता. मी त्यांच्याकडे जाऊन दर्शनासाठी आल्याचे सांगितले. तर जवळ उभ्या असलेल्या माणसाकडे बघत म्हणाले, ''बघा तुम्ही म्हणता ना शनी-शिंगणापूरात चोरी होत नाही ? हा घ्या पुरावा.'' मी काही न समजल्याने त्या माणसाकडे पाहिले.</div>
<div style="text-align: justify;">
''याचे पाकीट मारलेय कोणीतरी.''- मानेंनी खुलासा केला.</div>
<div style="text-align: justify;">
''काय ? म्हणजे कसे काय ?'' मी विचारले.</div>
<div style="text-align: justify;">
माझी उत्सुकता फारशी ताणून न धरता मानेंनी उत्तर दिले, "कोणीतरी पाकीट मारले हो. असे नेहेमीच होत असते पण तुम्ही लोक मान्य करत नाही. हे घ्या उदाहरण."</div>
<div style="text-align: justify;">
मानेंनी हे मुद्दाम मला सांगितले. त्यालाही कारण होते.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
गेल्या आठवड्यात शनी-शिंगनापुरात '३५ हजारांची चोरी' झाली होती. हरियाणातून आलेल्या भाविकांचा ३५ हजारांचा मुद्देमाल त्यांच्यासोबतच आलेल्या एका भामट्याने लंपास केला होता. हि घटना माझ्या शनी-शिंगणापुरातील एका मित्राने मला मोबाईल वरून कळवली. माझा दृष्टीने हि मोठी 'बातमी' होती, कारण सहसा ( सहसा काय कधीच) शनी-शिंगणापुरात चोरी होत नाही, असा सर्वांचा समज (किंवा श्रद्धा ) आहे. आणि झालीच तर त्या चोराला लगेचच शिक्षाही होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. आणि गुलशन कुमारच्या 'सूर्यपुत्र शनिदेव' या चित्रपटानेही हे ठासून सांगितले. या चित्रपटामुळेच रात्रीतून 'शनी- शिंगणापूर' जगाच्या नकाशावर आले. या गावातील घरांना दरवाजे नाहीत, कारण लोकांच्या संपत्तीचे रक्षण शनिदेवच करतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे लोकांची/भाविकांची गर्दी वाढत गेली. आणि अवघ्या ४-५ वर्षात शनी-शिंगणापूरचा कायापालट झाला. छोटेसे गाव कायमचे गजबजून गेले.</div>
<div style="text-align: justify;">
मला आठवतंय... लहानपणी चैत्री पाडव्याला आणि शनी-आमावस्या असेल तर येथे मोठी यात्रा भरायची. परिसरातून लोक सहकुटुंब शनिदेवाच्या दर्शनासाठी यायचे. तेंव्हा हा परिसर फारसा विकसित नव्हता. वर्षातून यात्रेचे हे ३ दिवस सोडले तर अगदी निर्मनुष्य असायचा हा परिसर. सभोवताली दाट झाडीही होती. त्यावेळी दर्शन घेताना मन प्रसन्न होऊन जायचे. आता खूप बदल झालाय... असो. तर याठिकाणी 'चोरी होत नाही' हे लहानपणापासून ऐकत आलेलो. पण माझ्या दादाची चप्पल मात्र दोन-तीनदा गेलीय बरे येथून. आई म्हणायची ''जाऊ देत.. देवाच्या दारात काही हरवले तर चांगले असते.'' पण मला प्रश्न पडायचा, चप्पल हरवेल कशी? ती सजीव थोडीच आहे? असो यामुळेच कि काय म्हणा पण शनी-शिंगणापुरात '३५ हजारांची चोरी' झाल्याचे ऐकून मीही चकित झालो होतो.</div>
<div style="text-align: justify;">
त्या मित्राच्याच मोबाईलवरून मी ज्यांचा मुद्देमाल चोरीस गेला त्या भाविकांसोबत बोललो. आणि खरेच ते लुबाडले गेल्याचे लक्षात आलावर त्यांना पोलिसांत जायचा सल्लाही दिला. त्या मित्रालाही त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात पाठवले. पण पोलीस त्यांची फिर्याद नोंदवून घेईनात. म्हणून मी सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब माने यांना फोन करून गुन्हा दाखल करून घेण्याची विनंती केली. त्यावेळी ते पोलीस ठाण्याच्या बाहेर होते पण त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून गुन्हा दाखल करून घ्यायला सांगितले. अन ''ही बातमी'' दुस-या दिवशी सर्वच वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर झळकली...! (माझ्या " आश्चर्यम: शनि-शिंगणापुरात चोरी" या ब्लॉगमध्ये याबाबत लिहिले आहे.) त्यावेळी मानेंनी मला सांगितले होते कि, ही घटना नवीन नाही. शनी-शिंगणापुरात रोज अशा कितीतरी लहान-मोठ्या चोऱ्या होतात. पण कोणी त्याबाबत फिर्याद दाखल करायला येत नाही. कोणी पोलीस ठाण्याचा पत्ता विचारलाच तर त्याला शनी-देवाचा महिमा सांगून पोलिसात जाण्यापासून परावृत्त केले जाते. स्थानिक पुढा-यांचाही यात बरेचदा हस्तक्षेप होतो. गुन्हा दाखल झाला तर नाहक गावाची बदनामी होईल, भाविकांच्या संख्येवर त्याचा परिणाम होईल आणि 'आर्थिक गणित' कोलमडेल, असा त्यामागचा हेतू...!</div>
<div style="text-align: justify;">
असो, ...म्हणून आज माने मला सांगत होते 'हा घ्या पुरावा'.!</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मी भानावर येऊन त्या भाविकाकडे पाहिले. तो मानेंकडे पाहत होता. अंगात प्यांट-शर्ट आणि हातात घडी केलेला टॉवेल, अशा वेशात तो मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहत होता.</div>
<div style="text-align: justify;">
मी त्याला विचारले, 'काय हो, तुमचे पाकीट चोरीला गेलेय का?' त्याने माझ्याकडे न पाहता फक्त होकारार्थी मान हलवली.</div>
<div style="text-align: justify;">
माने म्हणाले, 'पाहिलंत.. अन तुम्ही म्हणता शनी-शिंगणापुरात चोरी होत नाही.' मीही विचारात पडलो होतो. तोवर पुढे गेलेल्या मित्रांनी मला आवाज दिला. म्हणून मी मानेंचा निरोप घेऊन पुढे चालू लागलो.</div>
<div style="text-align: justify;">
५-६ पावलं चाललो असेल तोवर मानेंची जीप मागून येऊन पुढे निघून गेली. मी मागे वळून पाहिलं तर तो भाविक पडलेला चेहरा करून मानेंच्या जीपकडे पाहत होता. मी न राहवून परत त्याच्याकडे गेलो.</div>
<div style="text-align: justify;">
''तुमचे पाकीट खरेच चोरीला गेलेय का?' मी विचारले.</div>
<div style="text-align: justify;">
त्याने पुन्हा होकारार्थी मान हलवली.</div>
<div style="text-align: justify;">
'तुम्ही कुठून आलात?' मी पुन्हा प्रश्न केला.</div>
<div style="text-align: justify;">
'परभणीहून' एवढे बोलून तो गप्प बसला.</div>
<div style="text-align: justify;">
मीच विचारले, 'तुम्ही कुठल्या गाळ्यावर पूजा घेण्यासाठी थांबला होतात?'</div>
<div style="text-align: justify;">
'८ नंबर' असे सांगून तो रडायला लागला.</div>
<div style="text-align: justify;">
काय करावे मला कळेना. 'तुमच्या पाकिटात किती पैसे होते?' मी म्हणालो.</div>
<div style="text-align: justify;">
त्याने फक्त २ बोटे केली. 'दोनशे?' मी विचारले. त्याने नकारार्थी मान हलवली.</div>
<div style="text-align: justify;">
'मग दोन हजार?' असे विचारल्यावर त्याने होकारार्थी मान हलवली.</div>
<div style="text-align: justify;">
पण तो रडायचा थांबेना अन मलाही काय करावे ते सुचेना. पुन्हा मित्रांनी आवाज दिला म्हणून मी निघालो. पण परत त्या माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आला म्हणून मागे बघितले. तो तिथेच उभा राहून डोळे पुसत होता. मी परत त्याच्याकडे गेलो अन म्हणालो, "तुम्ही चिंता करू नका. तुमचे पाकीट आपण शोधून काढू." पण त्याचे अश्रू थांबेनात. मित्र थांबलेले म्हणून मी त्याला म्हणालो, "तुम्ही १० मिनिट थांबा, मी आलोच दर्शन घेऊन". त्याने होकारार्थी मन हलवली. अन मीही निघालो.</div>
<div style="text-align: justify;">
दर्शन झाले.. पण तो माणूस काही डोळ्यापुढून जात नव्हता. आज थोडे घाईतच निघालो अन तो माणूस बसला होता तिथे आलो, पण त्याचा मात्र आता तिथे पत्ता नव्हता. इकडे-तिकडे बघितले पण तो दिसेना. शेजारी दुकानात चौकशी केली पण काही उपयोग झाला नाही. तोवर मागून मित्रही येऊन पोचले. कुणाला शोधतोय असे विचारल्यावर मी त्या माणसाबद्दल सांगितले. 'जाऊ देत' म्हणून त्यांनी निघायची घाई केली. माझा मात्र पाय निघवेना. 'तुम्ही व्हा पुढे, मी नंतर येतो' म्हणालो तर 'आता एवढ्या गर्दीत कुठे शोधणार आहेस त्याला ?' असे म्हणून मित्र रिक्श्यामध्ये जाऊन बसले. २-५ मिनिट उभा राहिल्यानंतर माझाही नाईलाज झाला. मीही रिक्षाकडे गेलो आणि घरी आलो.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पण त्या माणसाचा रडवेला चेहरा काही केल्या डोळ्यांपुढून जाईना. पुन्हा बाईक काढली आणि शनी-शिंगणापूर गाठले. थोडा वेळ शोधाशोधहि केली, पण गर्दी वाढत चालली होती त्यामुळे उपयोग नव्हता. न राहवून स. पो. नि. मानेंना फोन करून त्या माणसाबद्दल विचारले. ते म्हणाले त्याला सोनई पोलीस स्टेशनला येऊन रीतसर फिर्याद द्यायला सांगितले आहे, गुन्हा दाखल झाल्यावर बघू. मी नाईलाज झाल्याने पुन्हा माघारी आलो. दिवसभर त्या माणसाचाच विचार डोक्यात घोळत होता. मग मात्र स्वताचाच राग यायला लागला. बिचा-याचे पाकीट चोरीला गेले, होते नव्हते सगळे पैसेही गेले. आता तो परत कसा गेला असेल? त्याने काय खाल्लं असेल ? तो पोलिसात गेला असेल म्हणून दोन-तीनदा पोलीस स्टेशनलाही फोन लाऊन पाहिला, पण तो आलाच नसल्याचे समजले. मग अजूनच वाईट वाटायला लागले. त्याच वेळी मित्रांना घेऊन तो भाविक ज्या दुकानात उतरला होता तिकडे गेलो असतो तर कदाचित काहीतरी उपयोग झाला असता. किंवा मानेंना सोबत घेऊन गेलो असतो आणि त्या दुकानदारालाच 'पोलिसी खाक्या' दाखवला असता तर पाकीट मिळाले पण असते. तेवढ्यासाठी गुन्हाच कशाला दाखल करायला हवा. आणि नसतेच मिळाले पाकीट तर आम्ही पैसे गोळा करून त्याच्या परत जाण्याची सोय केली असती न..?<br />
त्या भाविकाचे पुढे काय झाले असेल.? तो काय विचार करत असेल ? बिचारा परभणीहून इतक्या लांबून दर्शनासाठी आला होता. शनी-शिंगणापुरात चोरी होत नाही समजून किती विश्वासाने त्याने कपडे दुकानात ठेवले होते. त्याच्या विश्वासाला किती मोठा तडा गेला..! ज्या भामट्याने पाकीट चोरले त्याला भविष्यात शिक्षा होईल कि नाही माहित नाही. पण मानेंना हाताशी धरून त्या दुकानदाराला धडा शिकवला असता तर पुन्हा दुसर्या कुणाचे पाकीट तरी चोरीला गेले नसते. पण आता विचार करून काय उपयोग...?</div>
<div style="text-align: justify;">
दिवसभर चैन पडले नाही. त्या माणसाचे पुढे काय झाले असेल..? हाच विचार मनात घोळत होता. माझच चुकले. त्याच्यापेक्षा दर्शन इतके महत्वाचे होते का? अन थोडा उशीर झाला असता तर काही बिघडले असते का? पण त्याच्या श्रद्धेला तडा जाऊ द्यायला नको होता. आपल्या हातून आज मोठे पाप घडले असे वाटायला लागले. माझी अक्कल त्या क्षणी कुठे चरायला गेली होती असे वाटायला लागले. आता विचार करून काहीच उपयोग नाही हे लक्षात आल्यावर तर अजूनच वाईट वाटले. विचार करतच रात्री झोपी गेलो...</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
...पहाटे पहाटे एक स्वप्न पडले. मी मित्रांसोबत शनी-शिंगणापुरला गेलो... सकाळी घडलेलाच प्रसंग... जसाच्या तसा... पण शेवट मात्र चटका लावून गेला... तो माणूस पाकीट चोरीला गेले म्हणून पायीच घरी निघालाय... मीहि त्याच्या मागे चाललोय... अन वेशीबाहेर आलावर त्याने मागे वळून पाहिलं... वेशीकडे बघून हात जोडले... रडत रडतच म्हणाला.. "हे शेवटचं. परत कधीच तुझ्या दर्शनाला येणार नाही.. जगात देव राहिलाच नाही.." अन पुन्हा चालायला लागला... मागे वळून न पाहता...</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अलार्म वाजल्याने मला जाग आली.</div>
<div style="text-align: justify;">
अजूनही मनात विचारचक्र चाललंय...</div>
<div style="text-align: justify;">
तो माणूस खरच असं म्हणाला असेल का ?....</div>
</div>
maheshpatarehttp://www.blogger.com/profile/15954226665877783985noreply@blogger.com1