तर पत्रास
कारण की, गेल्या आठवड्यात तुझे सर भेटले नगरमध्ये. अण्णांच्या
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यापासून ते इकडेच आहेत. मागच्या
गुरुवारी येथे आयोजित केलेल्या एका सभेसाठी ते आले होते. त्या निमित्ताने आमच्या भेटीचा योग आला आणि मग असंख्य आठवणीनी मनात गर्दी केली…
गम्मतच आहे ना ! म्हणजे बघ ना, आपण सुरुवातीला बोलायचो तेंव्हा तुझ्या बोलण्यात त्यांचा उल्लेख असायचा. पण तुझे 'बॉस' असल्यामुळे आणि ते ऑफिसात असल्यामुळे आपल्याला निवांत बोलता यायचे नाही. म्हणून त्यांचा राग यायचा तेंव्हा.. कितीदा तरी त्यांना 'खडूस' म्हणायचो आपण.. नंतर 'लेक सिटी' प्रकरणामुळे त्यांचे नाव पुन्हा कानावर आले. मग एक सच्चा आणि चळवळीत काम करणारा निर्भीड, तत्वनिष्ठ माणूस म्हणून त्यांची ओळख पटली. त्यांना ओळखायला लागल्यानंतरच्या पहिल्या वाढदिवशी फोन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बोलण्यावरून ते सरळमार्गी असल्याची खात्री पटली. नंतर कधी 'फेसबुक'वर तर कधी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत ते दिसू लागले. मग हळूहळू नंतर त्यांच्याविषयीचे मत बदलले आणि आधी 'खडूस' वाटलेल्या सरांबद्दल नंतर आदर वाटू लागला...
खुपदा वाटले कि त्यांना प्रत्यक्ष भेटावे. प्रथमच फोनवर बोललो
तेंव्हा त्यांनीही भेटीचे निमंत्रण दिलेले. पण, तिथे येउन त्यांना भेटायचे
तेव्हा टाळलेच. त्यांना भेटायला का होईना, पण हा आपल्या ऑफिसात मुद्दामून
आलाय असे वाटायला नको, म्हणून मग 'परवा' पर्यंत वाट पाहत राहिलो.
मध्यंतरीही त्यांचे बरेचदा नगरला येणे झाले. पण, भेटण्याचा योग आला नाही.
परवा मात्र त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग जुळला. येथे झालेल्या सभेत
त्यांचे प्रोत्साहित करणारे विचार ऐकले आणि त्यांच्याविषयी वाटणारा आदर
आणखी दुणावला. सभा संपल्यानंतर एका स्वयंसेवी कार्यकर्त्याच्या घरी ते थोडा
वेळ थांबले होते. तेथेच आमची भेट झाली.गम्मतच आहे ना ! म्हणजे बघ ना, आपण सुरुवातीला बोलायचो तेंव्हा तुझ्या बोलण्यात त्यांचा उल्लेख असायचा. पण तुझे 'बॉस' असल्यामुळे आणि ते ऑफिसात असल्यामुळे आपल्याला निवांत बोलता यायचे नाही. म्हणून त्यांचा राग यायचा तेंव्हा.. कितीदा तरी त्यांना 'खडूस' म्हणायचो आपण.. नंतर 'लेक सिटी' प्रकरणामुळे त्यांचे नाव पुन्हा कानावर आले. मग एक सच्चा आणि चळवळीत काम करणारा निर्भीड, तत्वनिष्ठ माणूस म्हणून त्यांची ओळख पटली. त्यांना ओळखायला लागल्यानंतरच्या पहिल्या वाढदिवशी फोन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बोलण्यावरून ते सरळमार्गी असल्याची खात्री पटली. नंतर कधी 'फेसबुक'वर तर कधी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत ते दिसू लागले. मग हळूहळू नंतर त्यांच्याविषयीचे मत बदलले आणि आधी 'खडूस' वाटलेल्या सरांबद्दल नंतर आदर वाटू लागला...
तुझा मित्र,
……
……
0 टिप्पण्या